Editor

राज्यात सुरु असलेले सुडाचे राजकारण आज जरी जनता पहात असली तरी… नवाब मलिक यांच्यावरील कारवाईनंतर जयंत पाटील यांचा भाजपावर निशाणा

महाराष्ट्रात कधीच सुडाचे राजकारण नव्हते. मात्र सध्या राज्यात सुडाचे राजकारण सुरू आहे. आज जरी जनता हे पाहत असली तरी जनता योग्य वेळी मत व्यक्त करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी करमाळा येथे व्यक्त केला. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या तिसर्‍या दिवशी करमाळा येथे सभा झाली. …

Read More »

“नवाब मलिकांची अटक”… अनं फडणवीसांचा दिवाळीनंतरचा “बॉम्ब” जमीन खरेदी प्रकरणी अखेर अंडरवर्ल्डशी मलिकांचे संबध असल्याचे दाखवून दिलेच

राज्यात ड्रग्ज व्यापार आणि बनावट नोटांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपा आणि त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संबधाबाबत आणि फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या एका व्हिडिओचा फायनान्सर हा ड्रग्ज पेडलर असल्याचा आरोप केला होता. त्यावर दिवाळी झाल्यावर मलिकांचा बॉम्बगोळा फोडू असे प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते …

Read More »

केंद्र सरकारविरोधात बोलल्यानेच मंत्री नवाब मलिकांवर ईडीची कारवाई काँग्रेस पक्ष मंत्री नवाब मलिक यांच्या पाठीशी; केंद्राने महाराष्ट्राची बदनामी थांबवावी- नाना पटोले

राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर अंमलबजावणी संचलनालयाची (ईडी) कारवाई ही सुडबुद्धीने केलेली आहे. नवाब मलिक सातत्याने केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवत होते. केंद्र सरकारविरोधात आवाज उठवल्यानेच ईडीच्या माध्यमातून कारवाई केलेली असून आम्ही नवाब मलिक यांच्या पाठीशी असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. …

Read More »

सकाळी ७.३० वाजल्यापासून चौकशी, दुपारी ३ च्या सुमारास मंत्री मलिकांना ईडीकडून अटक पहाटे ४ वाजता ईडीचे अधिकारी मलिकांच्या घरी पोहोचले

मागील काही दिवसांपासून भाजपा नेते सातत्याने महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री ईडीच्या कोठडीत जाण्याच्या रांगेत असल्याचे सांगत होते. तसेच ईडीची कारवाई लवकरच होणार असल्याचा इशाराही देत होते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या कुर्ला येथील निवासस्थानी ईडीचे अधिकारी पोहचत मलिक यांना ईडी कार्यालयात येण्यास सांगितले. त्यानंतर …

Read More »

उपमुख्यमंत्री पवारांची यशस्वी मध्यस्थी: कर्मचारी संपाबाबत निर्णय उद्या जाहीर करणार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या रास्त, न्याय्य, व्यवहार्य मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार करण्याची ग्वाही

कर्मचाऱ्यांच्या हक्काचा विचार करताना राज्यंही चालले पाहिजे, शासकीय कर्मचाऱ्यांनी राज्याच्या हिताचा विचार करुन उद्यापासूनचा प्रस्तावित संप मागे घ्यावा,” असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले असून उपमुख्यमंत्र्यांनी केलेली यशस्वी मध्यस्थी आणि त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रस्तावित संप मागे घेण्याची तयारी असल्याचे, मात्र त्यापूर्वी कर्मचारी संघटनेतील सहकारी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून संप …

Read More »

संपामुळे झालेले नुकसान एसटी कामगारांकडून वसुल करणार नाही महामंडळाचा कोणताही निर्णय नाही- एसटी महामंडळाची स्पष्टोक्ती

एसटी संपामुळे महामंडळाचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान होत असले तरी हे नुकसान कर्तव्यावर रूजू झालेल्या कामगारांकडून वसुल करण्याचा महामंडळाने कोणताही निर्णय घेतलेला नाही, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी स्पष्टपणे सांगितले. एसटी महामंडळ राज्य शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. गेल्या तीन महिन्यांहून …

Read More »

न्यायालयाच्या दट्यानंतर नियम बदलला: बिगर लसवंतानाही लोकल प्रवासास मुभा कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

मुंबईसह महानगरातील कोरोनाच्या प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने ११ ऑगस्ट २०२१ रोजी ब्रेक द चेन अंतर्गत आदेश काढत मुंबई महानगरात लोकलने प्रवास करायचा असेल तर नागरीकांनी दोन लसमात्रा घेतलेल्या असणे बंधनकारक करत लसमात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झालेले असेल तर त्या नागरीकास लोकलने प्रवास करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या दट्यानंतर आज …

Read More »

शासकीय कर्मचाऱ्यांनाही लागू होणार राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना शासन सकारात्मक- राज्य वित्त मंत्री शंभुराज देसाई

राज्य शासकीय कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्या कर्मचा-यांच्या कुटूंबाला निवृत्ती वेतन आणि वैद्यकिय कारणास्तव कर्मचा-याने निवृत्ती घेतल्यास रुग्णता निवृत्ती वेतन लागू करणे. तसेच केंद्र शासनाच्या सेवानिवृत्ती योजनाप्रमाणे राज्य शासनाच्या कर्मचा-यांनाही योजना लागू करण्यासंदर्भात अभ्यासगटाद्वारे साकल्याने विचार करून शासनास शिफारस करण्यात येणार असल्याचे वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. राज्य …

Read More »

आमीर खान, मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते सोयाबीन डिजीटल शेती पुस्तकाचे प्रकाशन सोयाबिन डिजिटल शेती शाळा पूर्व मशागत ते कापणीपर्यंत' या पुस्तकाचे लोकार्पण

 राज्यात सोयाबिनचे क्षेत्र ४१ लाख हेक्टर असून सध्या शेतीक्षेत्रात सोयाबीन प्रथम क्रमांकाचे पीक आहे. त्याची उत्पादकता वाढविण्यासाठी सोयाबिन डिजीटल शेती शाळा हे पुस्तक ज्या भागात सोयाबिन क्षेत्र आहे. त्या शेतकऱ्यापर्यंत पोहचवू. या  पुस्तकात शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यात आली असून त्याचा लाभ शेतकऱ्यांना निश्चित होईल, असा विश्वास कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला. ‘सोयाबिन …

Read More »

दिशा सालियानच्या कुटुंबियांच्या आवाहनानंतरही चंद्रकांत पाटील यांचे भाकित मृत्यूचे सत्य सात मार्चनंतर बाहेर येईल

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेवून केलेल्या आरोपानंतर व्यथित झालेल्या दिशा सालियनच्या कुटुंबियानी आम्हाला शांतपणे जगू द्या, मुलगी गेल्याचे दु:ख काय असते ते तुम्हाला नाही कळणार, या सततच्या आरोपामुळे आम्हालाही काही करून घ्यायची इच्छा होत असून जर आमच्या जीवाला काही झाले तर त्यास जबाबदार हेच लोक राहतील असा …

Read More »