Editor

लसीकरणात महाराष्ट्राची पुन्हा विक्रमी कामगिरी दिवसभरात सुमारे आठ लाख नागरिकांचे लसीकरण

मुंबई : प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने पुन्हा एकदा आतापर्यंतची विक्रमी उच्चांकी कामगिरी आज नोंदविली. रात्री आठपर्यंत दिवसभरात ७ लाख ९६ हजार ७३८ नागरिकांचे लसीकरण करून नवा विक्रम केला. अंतीम आकडेवारी येईपर्यंत लसीकरणाची संख्या ८ लाखावर जाईल. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वोच्च आकडेवारी आहे. …

Read More »

अमित शाह यांना पाठविलेल्या पत्रातील या ३० साखर कारखान्यांवर येणार संक्रात? जरंडेश्वरप्रमाणे इतर साखर कारखान्यांच्या विक्री गैरव्यवहाराबाबत कारवाई करण्याची चंद्रकांत पाटील यांची मागणी

पुणे : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवून राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची कवडीमोलाने विक्री करून झालेल्या गैरव्यवहारावर कारवाई करण्याची विनंती केली. जरंडेश्वर साखर कारखाना विक्रीबाबत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईचे त्यांनी स्वागत केले व त्याच पद्धतीने कारवाई होण्यासाठी ३० साखर …

Read More »

ते वृत्त दिशाभूल करणारे; तिन्ही कृषी कायदे रद्द झाले पाहिजेत हीच पक्षाची भूमिका राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांचा खुलासा

मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारने आणलेल्या तिन्ही कृषी कायदे पूर्णत: रद्द करण्याऐवजी त्यातील शेतकऱ्यांना अडचणीचे वाटणारे मुद्दे वगळून राज्यात सुधारीत कायदा आणावा असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी डि.वाय.पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाच्या उद्घाटनानंतर दूरचित्रवाणीच्या प्रतिनिधींशी बोलताना केली. त्यावर विविध तर्क-वितर्क लढविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांनी यासंदर्भात …

Read More »

नीती आयोगाच्या माजी सल्लागाराकडून पंतप्रधान मोदींवर टीकेचा भडीभार आर्थिक निती आणि कोविड परिस्थितीवरून डॉ.अरिंदम चौधरीचा हल्लाबोल

मुंबई: प्रतिनिधी देशाच्या नियोजन आयोगाचे नाव बदलून नीती आयोगाची स्थापना केल्यानंतर आर्थिक आणि इतर क्षेत्रातील तज्ञांची सदस्य म्हणून नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. या अनेक सदस्यांच्या समिचीचे सल्लागार असलेले आणि आयआयपीएम संस्थेचे संस्थापक कि-नोट स्पीकर डॉ.अरिंदम चौधरी यांनी केंद्रातील भाजपा सरकार आणि पंतप्रधान मोदींच्या धोरणा विरोधात सोशल मिडीयातून चांगलाच …

Read More »

राफेलप्रकरणी फ्रांसमध्ये चौकशी होवू शकते तर देशात मोदी सरकार का घाबरते? राफेल घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करा !: नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी राफेल फायटर जेटच्या व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याची बाब उघड करून काँग्रेसने या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी लावून धरली होती. परंतु मोदी सरकारने हे प्रकरण चौकशीविनाच गुंडाळले. हा संपूर्ण व्यवहारच संशयास्पद असल्याने फ्रान्स सरकारने आता या राफेल घोटाळ्याच्या चौकशीला सुरुवात केली आहे. या प्रकरणात करोडो रुपयांचा घोटाळा झाला असून फ्रान्समध्ये …

Read More »

१२ वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार मार्क या पध्दतीने ; शासन निर्णय जारी १० वी, ११ वीचे मार्कावरून मिळणार १२ वीला गुण

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील १२ वीच्या विद्यार्थ्यांची परिक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेत या विद्यार्थ्यांचे मुल्यांकन करून उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे परिक्षा न घेता मुल्यांकन कसे होणार याबाबतची उत्सुकता विद्यार्थ्यांसह विद्यार्थ्यांनाही होती. त्यानुसार १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या मुल्यांकनासाठी १० आणि ११ वी परिक्षेतील गुण ग्राह्य धरण्यात येणार …

Read More »

मनपाच्या शाळांमध्ये आयबीचा अभ्यासक्रम होणार सुरु पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन

मुंबई : प्रतिनिधी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सीबीएसई आणि आयसीएसई अभ्यासक्रमाचे मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळू लागले आहे. मनपाच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी आता लॉटरी काढावी लागली, यातच या शाळांचे यश असून प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे प्रतिपादन पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. …

Read More »

भाजपा म्हणते, मराठा आरक्षण कायद्याची प्रक्रिया राज्यालाच करावी लागणार आमदार अॅड आशिष शेलार यांचे प्रतिपादन

मुंबई: प्रतिनिधी घटनेच्या १०२ व्या दुरुस्तीनंतर एखादा समाज मागास वर्ग सूचित टाकण्याचा अधिकार केंद्र सरकारचा असला तरी राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोग गठीत करुन मराठा समाज मागास असल्याचा अहवाल पाठविल्याशिवाय केंद्र सरकारची प्रक्रिया पुर्ण होऊ शकत नाही. तसेच संबंधित जात मागास ठरल्यानंतर आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारचाच असल्याचे प्रतिपादन …

Read More »

राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी दिले हे उत्तर त्या निवडणूका न्यायालयाच्या आदेशाने मात्र कोरोनामुळे निवडणूका पुढे ढकलण्याची विनंती

ुंबई : प्रतिनिधी नुकतेच विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेणे, ओबीसींच्या रिक्त जागांसाठी घेण्यात येत असलेल्या निवडणूकांना स्थगिती देणे आणि अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याच्या अनुषंगाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहित उचित कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेच तिसऱ्या लाटेचा इशारा …

Read More »

राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपाचे राजकारण आघाडीत मतभेद नाहीत; विधानसभेचा अध्यक्ष काँग्रेसचाच- नाना पटोले

मुंबई : प्रतिनिधी विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशानात व्हावी ही महाविकास आघाडीचीही इच्छा आहे. परंतु या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष राज्यपालांच्या खांद्यावर बंदुक ठेवून राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करत म्हणाले की, पण त्याला आम्ही भिक घालत नाही. सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता आमदारांच्या कोविड चाचण्या झाल्यानंतरच …

Read More »