Editor

राज्याची अर्थव्यवस्था जैसे थे कृषी आणि उद्योग वाढीत घट झाल्याचे आर्थिक अहवालात उघडकीस

मुंबईः प्रतिनिधी गतीमान सरकार पारदर्शी कारभाराचा नारा देत साडे चार वर्षापूर्वी सत्तेत आलेल्या भाजप-शिवसेना सरकारच्या कार्यकाळात राज्याच्या अर्थव्यवस्थेला ब्रेक लागला असून आर्थिक विकासाचा दर ७ टक्के इतकाच राखण्यात सरकारला यश आले आहे. तर राज्याच्या कृषी आणि उद्योगवाढीच्या टक्केवारीत घट झाली. तरीही यंदा मान्सून चांगला झाल्यानंतर या दोन्ही गोष्टीत वाढीची अपेक्षा …

Read More »

सरकारच्या चहापानावर बहिष्कार; विरोधी पक्षांचा निर्णय फडणवीस सरकार म्हणजे 'आभासी' सरकार - धनंजय मुंडे

मुंबईः प्रतिनिधी या सरकारने पाच वर्षांत ठोस काम केलेले नाही. फडणवीसांचे हे आभासी सरकार असल्याचा थेट आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. १७ जून दुष्काळ दिन साजरा केला जातो. त्याच दिवशी या सरकारने दुष्काळाकडे लक्ष दिलेले नाही. विशेष म्हणजे त्याच दिवशी पावसाळी अधिवेशन सुरु होत असून या …

Read More »

मंत्रिमंडळातील फेरबदल म्हणजे भ्रष्टाचार आणि अपयश दडपण्याचा प्रयत्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे टीकास्त्र

मुंबई: प्रतिनिधी भाजप-शिवसेना राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील फेरबदल म्हणजे भ्रष्टाचार आणि मागील साडेचार वर्षातील अपयश दडपण्याचा प्रयत्न असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. प्रकाश मेहता आणि इतर मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सरकार अडचणीत आले आहे. लोकायुक्त आणि न्यायालयांनी मंत्र्यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात कारवाईचे आदेश दिले. मात्र मुख्यमंत्र्यांची या मंत्र्यांवर …

Read More »

बडोले, सवरा,महेतांची कामगिरी खराब म्हणून नाही काढले दलित, आदीवासी मंत्र्यांच्या गच्छंतीवर मुख्यमंत्र्यांची सारवासारव

मुंबईः प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करताना १३ मंत्र्यांचा नव्याने समावेश करतानाच विद्यमान ३ मंत्री ३ राज्यमंत्र्यांची गच्छंती करण्यात आली. परंतु राजकुमार बडोले, विष्णू सवरा, प्रकाश महेता, राज्यमंत्री दिलीप कांबळे, प्रविण पोटे-पाटील आणि अम्बरीष आत्राम यांची कामगिरी खराब असल्याने काढले नाही. तर त्यांची कामगिरी चांगलीच असून ती आणखी चांगली व्हावी आणि …

Read More »

८ कँबिनेट मंत्र्यांसह ५ राज्यमंत्र्यांनी घेतली पदाची शपथ बडोले,सवरा, महेता यांच्यासह तीन राज्यमंत्र्यांना नारळ

मुंबईः प्रतिनिधी गेली अनेक महिने होणार होणार मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या चर्चेला आज रविवारी पूर्ण विराम मिळाला. विखे-पाटील, क्षिरसागर, कुटे, खाडे यांच्यासह ८ कँबिनेट मंत्र्यांनी तर सागर, महातेकर, सावे यांच्यासह ५ राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अन्य महत्वाच्या व्यक्तींच्या उपस्थितीत मंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल सी.विद्यासागर यांनी राजभवनात छोटेखानी झालेल्या समारंभात …

Read More »

मंत्रिमंडळ विस्तारात शेलार, विखे, कुटे, सावे, क्षिरसागर, बोंद्रेचा समावेश ? रविवारी सकाळी ११ वाजता राजभवनात होणार शपथविधी

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून होत असलेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या कोट्यातून राधाकृष्ण विखे-पाटील, आशिष शेलार, संजय कुटे, अतुल सावे आणि डॉ. अनिल बोंद्रे यांचा समावेश होणार आहे. तर शिवसेनेच्या कोट्यातून जयदत्त क्षिरसागर यांचा समावेश होणार असल्याची माहिती भाजपच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. खासदार सुजय विखे-पाटील यांच्या पाठोपाठ त्यांचे वडील …

Read More »

अखेर रिपाईचे अविनाश महातेकर मंत्री होणार केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूकीला सामोरे जाण्यास अवघे तीन महिने राहीले आहे. या निवडणूकीच्या दृष्टीने मतपेटी घट्ट करण्यासाठी मित्रपक्षांकडून दगाफटका होवू नये या उद्देशाने राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय जवळपास झाला आहे. त्यानुसार रिपाई (आठवले गट) यांच्या कोट्यातील मंत्रीपदासाठी रामदास आठवलेंना मुख्यमंत्र्यांनी विचारणा केली असता त्यांनी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत अविनाश …

Read More »

बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नवे विधिमंडळ पक्षनेते तर विजय वडेट्टीवार गटनेते

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभेचे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या ठिकाणी कोण असा प्रश्न चर्चिला जात होता. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील विखे-पाटील यांचे प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब थोरात यांची विधिमंडळ पक्षनेते पदी काँग्रेसने वर्णी लावली. तर सभागृहातील उपनेते असलेले विजय वडेट्टीवार यांची सभागृहाच्या नेते पदी निवड करण्यात आली …

Read More »

डॉ.तडवीच्या आत्महत्येने झोपलेले डॉक्टर कोलकात्यातील मारहाणीने जागे झाले कोलकाता येथील डॉक्टरच्या मारहाणीचा निषेधार्थ मार्डचे डॉक्टर संपावर

मुंबईः प्रतिनिधी नायर हॉस्पीटल येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय डॉ. पायल तडवीचा तिच्या जातीवरून बोलल्याने आत्महत्या करावी लागली. या आत्महत्येच्या घटनेवर झोपलेल्या डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने झोपेचे सोंग घेतले. मात्र कोलकाता येथील एका डॉक्टरला मारहाण केल्याच्या निषेधार्थ राज्यातील याच संघटनेने एकदिवसीय संपाचे हत्यार उपसल्याने डॉक्टरांच्या सामाजिक जाणीवेबद्दल उलटसुलट चर्चेला सुरुवात …

Read More »

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीने इच्छुकांच्या आशा पल्लवित मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला पुन्हा उधाण

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीतील विजयाने भाजपमध्ये एकच उत्साह वाढला. त्यातच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक आमदार भाजपच्या वाटेवर असल्याने या सर्वांना खुष करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर कोणतीच हालचाल झाली नाही. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी राज्यपाल सी.विद्यासागर यांची भेट घेतल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवित …

Read More »