मुंबई : प्रतिनिधी कोरेगांव भिमा येथे झालेली दंगल रोखण्यात गृह खात्याने अक्षम्य बेफिकिरपणा दाखविला आहे. ही घटना घडल्यानंतर राज्य सरकारकडून या भागातील इंटरनेट सेवा बंद करायला हवी होती. मात्र मराठा आणि दलित समाजात दंगल निर्माण करण्यासाठीच राज्य सरकारने ही दंगल पुरस्कृत केल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. …
Read More »इंदू मिल येथील डॉ. आंबेडकर स्मारकाच्या ७६३ कोटींच्या खर्चास मान्यता एमएमआरडीएच्या बैठकीत निर्णय
मुंबई : प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील नियोजित स्मारकाचे काम लवकरच सुरु होण्याची चिन्हे असून या स्मारकाच्या सुधारीत ७६३.०५ कोटी रूपयांच्या सुधारीत अंदाजित खर्चास एमएमआरडीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निर्णयाबरोबरच मेट्रो रेल्वेच्या वडाळा ते कासारवडवली या …
Read More »‘असेही एकदा व्हावे’म्हणत प्रथमच एकत्र आले उमेश-तेजश्री
मुंबई : प्रतिनिधी मराठी प्रेक्षकांना लवकरच आणखी एक नवी कोरी जोडी एकत्र पाहायला मिळणार आहे. छोट्या पडद्यावरील लाडकी सून जान्हवी म्हणजेच तेजश्री प्रधान आणि मराठी चित्रपटसृष्टी वैविध्यपूर्ण भूमिका साकारत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता उमेश कामत यांची प्रथमच जोडी जमली आहे. ‘असेही एकदा व्हावे’असंच काहीसं म्हणत उमेश आणि तेजश्री एकत्र …
Read More »उल्का-गणेश नव्या जोडीचा ‘ओढ’ १९ जानेवारीला महाराष्ट्रात प्रदर्शित होणार
मुंबई : प्रतिनिधी ‘झांसी की रानी’ या मालिकेत राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री उल्का गुप्ताची पावलं आता मराठी सिनेसृष्टीकडे वळली आहेत. पदार्पणातच मुख्य भूमिका साकारत उल्का रसिकांवर मोहिनी घालण्यासाठी सज्ज झाली आहे. आर. पी. प्रोडक्शन या संस्थेची निर्मिती असलेल्या ‘ओढ’ या आगामी मराठी चित्रपटात तिची जोडी गणेश तोवर या …
Read More »देशमुखांच्या आडून मुख्यमंत्र्यांचा पुन्हा स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नी आमदार आशिष देशमुखांची आत्मबळ यात्रा
मुंबई : प्रतिनिधी साधारणत: एक वर्षापूर्वी राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी आणे यांनी स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा उपस्थित करत राज्यात एकच राळ उ़़डवून दिली. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा भाजपचे नागपूरमधील आमदार आशिष देशमुख यांना पुढे करत पुन्हा एकदा विदर्भाचा मुद्दा राजकिय अजेंड्यावर आणल्याची चर्चा सध्या राजकिय वर्तुळात सुरु झाली असून …
Read More »नव्या वर्षात ११ हजार यात्रेकरूंना हज यात्रेची संधी अल्पसंख्याक राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यातून हज यात्रेसाठी तीनवेळा अर्ज करूनही जर हज यात्रेला जाण्याची संधी मिळाली नाही अशांना चवथ्यावेळी संधी देवून हज यात्रेला थेट पाठविणार आहे. त्याचबरोबर यंदाच्या वर्षी ११ हजार मुस्लिम बांधवांना हज यात्रेसाठी पाठविणार असल्याची माहिती राज्याच्या अल्पसंख्याक विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली. त्याचबरोबर राज्य हज समितीमार्फत प्रभावीपणे राबविल्या …
Read More »केंद्राकडे राज्य सरकार मागणार १६०० कोटी रूपयांची भरपाई अपेक्षेपेक्षा कमी कर तिजोरीत जमा
मुंबई : प्रतिनिधी एक देश एक करप्रणाली धोरणानुसार संपूर्ण देशभरात जीएसटी करप्रणाली लागू करण्यात आली. महाराष्ट्रातही या करप्रणालीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र सप्टेंबर, नोव्हेंबर, डिसेंबर अपेक्षेपेक्षा जीएसटी कराची कमी वसूली झाल्याने राज्याला एक हजार ६४७ कोटी रूपयांची तूट आल्याने या तूटीची भरपाई केंद्र सरकारकडे मागण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या …
Read More »केंद्राचे लक्ष वेधण्यासाठी आर्मी जवानांचे काम सुरु जेवण बंद आंदोलन उद्यापासून देशभरात आंदोलन
मुंबई : प्रतिनिधी देशभरातील ४१ आर्मी डेपोतील २५० सेवांसह उत्पादनांच्या निर्मितीचे खाजगीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाने घेतला. त्याच्या निषेधार्थ संरक्षण विभागातील जवळजवळ ४१ विभागातील कर्मचाऱ्यांनी काम सुरु जेवण बंद असे अभिनव आंदोलन उद्या ११ जानेवारी रोजी करणार असून देशभरातील लष्कराच्या कार्यालयात हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती एआयडीईएफचे …
Read More »एसआरए आणि धारावी प्रकल्पातील नागरीकांना ५०० क्षेत्रफळाच्या सदनिका द्या राज्यमंत्री वायकर, भाजप आमदारांच्या मागणीवर अभ्यास करण्यासाठी समिती
मुंबई : प्रतिनिधी बीडीडी चाळीच्या धर्तीवर शहरातील झोपडपट्ट्यामध्ये आणि धारावीतील रहिवाशांनाही ५०० चौ.फुटाची सदनिका देण्याची मागणी गृहनिर्माण मंत्री रविंद्र वायकर, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजप आमदार पराग अळवाणी यांनी मुख्यमंत्र्याकडे केली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी गृहनिर्माण विभागाला एक समिती स्थापन करण्याचे आदेश गृहनिर्माण विभागाला …
Read More »चित्रपटाच्या नफ्यातून उभारणार दोन चॅरिटेबल हॉस्पिटल्स पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचा निर्धार
मुंबई : संजय घावरे नेत्र शल्यविशारद पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने हे नाव आज केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर परदेशातही चांगलंच ज्ञात आहे. आजवर लाखों रुग्णांचे यशस्वी ऑपरेशन करून त्यांची नेत्रज्योत पुर्नप्रज्ज्वलीत करणाऱ्या डॉ. तात्याराव लहाने यांचं जीवनचरित्र ‘डॉ. तात्याराव लहाने – अंगार… पॉवर इज विदीन’ या चित्रपटाद्वारे लवकरच येणार आहे. समाजसेवी …
Read More »
Marathi e-Batmya