मुंबई : बी.निलेश विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज भाजपचे आमदार आणि मुख्य प्रतोद राज पुरोहित यांना आपली जागा बदलण्यास मज्जाव घातला आणि काही मीनिटांसाठी आपण शाळेत आहोत की असा भास सर्वच आमदारांना झाला… घटना अशी घडली की… राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे हे विरोध पक्षांनी मांडलेल्या मराठी शाळांबाबतच्या २९३ अन्वये …
Read More »अमिताभ बच्चन यांची प्रकृती अचानक बिघडली ठग्ज ऑफ हिंदोस्तानच्या चित्रकरणा दरम्यानची घटना
मुंबई : प्रतिनिधी बॅलिवुडचे शहेनशहा म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांची प्रकृती अचानक बिघडल्याने बॅालिवुडकरांसोबत जगभरातील त्यांच्या चाहत्यांच्या हृदयाचा ठोकाच चुकला. मागील काही दिवसांपासून अमिताभ राजस्थानमधील जोधपूरमध्ये ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र होते. उन्हाचा तडाखा आणि बदलतं वातावरण यांच्या परिणामामुळे अमिताभ यांची प्रकृती बिघडल्याचं सूत्रांकडून समजतं. अमिताभ …
Read More »भाऊचं स्ट्रगलर्स कँटींग जगावेगळी अत्यंयात्रा चित्रपटात चालविणार कँटींग
मुंबई : प्रतिनिधी विनोदी भूमिकांसोबतच धीरगंभीर भूमिकांनाही न्याय देण्यात यशस्वी ठरलेला अभिनेता भाऊ कदम सर्वांचाच आवडता बनला आहे. भाऊ सध्या विविधांगी विनोदी भूमिका साकारण्याला प्राधान्य देताना दिसतोय. ‘जगा वेगळी अंत्ययात्रा’ या चित्रपटातही प्रेक्षकांना एका भाऊ दिसणार आहे. या चित्रपटात भाऊने स्ट्रगलर्स कँटींगच सुरू केलं आहे. कितीही शिक्षण घेतलं तरी स्ट्रगल …
Read More »शाळांचे समायोजन केले, बंद नाही शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा खुलासा
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कमी पटसंख्या असेल्या १३०० शाळा बंद नाही तर त्यांचे १ किलोमीटर अंतराच्या परिसरातील इतर शाळांमध्ये समावेश करण्यात आलेले आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत असून त्यांच्या सहली, गँदरींग आदी गोष्टी होत असल्याने त्यांच्या अभ्यासाला गती मिळत असल्याचा दावा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला. तसेच या …
Read More »दूध भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा विधी व न्याय विभागाकडे प्रस्ताव पाठविल्याची अन्न व पुरवठा मंत्री बापट यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यात दिवसेंदिवस दूध भेसळीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे ओरिसा, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशच्या धर्तीवर राज्यातही दूध भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा करावी अशी मागणी भाजपचे आमदार अमित साटम यांनी लक्षवेधी सूचनेच्या वेळी केली. त्यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट म्हणाले की, याबाबत …
Read More »‘क्वॉर्टर’चा ट्रेलर व पोस्टर लाँच सोहळा संपन्न मानवी भावभावनांच चित्रण
मुंबई : प्रतिनिधी मराठी सिनेसृष्टीत आज खऱ्या अर्थाने क्रांती घडतेय असं म्हटलं तर त्यात काही वावगं ठरणार नाही. नव्या दमाचे, नव्या विचारांनी भारलेले, नावीन्याचा ध्यास घेतलेले आजच्या पिढीतील तरूण दिग्दर्शक नावीन्यपूर्ण प्रयोग करीत नव्या पिढीसाठी एक नवी वाट निर्माण करण्याचं कार्य मोठया निष्ठेने करीत आहेत. आजवर आपण केवळ सिनेमांचे ट्रेलर आणि पोस्टर …
Read More »ज्येष्ठ रंगकर्मींच्या मार्गदर्शनाने ‘बालरंगभूमी अभियान’ चळवळीची सुरुवात बालनाट्याच्या प्रयोगांना महाराष्ट्र शासनाचे अनुदान मिळविण्यासाठी प्रयत्न करणार
मुंबई : प्रतिनिधी बालरंगभूमीचा विकास घडवून नाट्यरसिकांना बालनाट्याचा आनंद देतानाच बालवयातच कलाकार-तंत्रज्ञांची पिढी घडविण्याच्या उद्देशाने आज मुंबईमध्ये ‘बालरंगभूमी अभियान’ संघटनेची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी वर्षाताई विनोद तावडे तसेच ज्येष्ठ रंगकर्मी विजय केंकरे, बालरंगभूमी अभियानाच्या अध्यक्षा कांचनताई सोनटक्के आणि नाट्यक्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आही उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून या बालरंगभूमी अभियानाची सुरुवात करण्यात आली …
Read More »शेतकऱ्यांच्या लाँगमार्चला यश शेतकऱ्यांना २००१ सालापासून कर्जमाफी देण्याचे सरकारचे मोर्चेकऱ्यांना आश्वासन
मुंबई : प्रतिनिधी नाशिकहून मुंबईला काढण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या लाँगमार्चला राज्य सरकारकडून तितकाच प्रतिसाद मिळाल्यामुळे सोमवारी शेतकऱ्यांच्या जवळजवळ सर्व मागण्या मान्य झाल्या. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना २००१ सालापासून कर्जमाफी मिळणार असून कुटुंबातील सर्व खातेदारांची कर्जमाफी होणार आहे. नाशिकहून निघालेला हा लाँगमार्च मुंबईकरांची तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी रविवारी रात्रीच आझाद मैदानावर आला. …
Read More »राज्यसभेच्या सहा जागांसाठी भाजपकडून ७ वा उमेदवार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसपैकी एकाचा उमेदवार अडचणीत
मुंबई : प्रतिनिधी राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत असून यातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी एका जागेवर उमेदवार दिला आहे. तर भाजपकडून तीन जागांसाठी चवथा उमेदवार महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना उमेदवारी देत विरोधक असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा यापैकी एका पक्षाचा उमेदवार धोक्यात आणला आहे. या सहाही जागांसाठी विधानसभेचे …
Read More »लाँग मार्चच्या मागण्यांकडे दुर्लक्ष कराल तर भस्मसात व्हाल विरोधी पक्षनेते विखे पाटील यांची राज्य सरकारला इशारा
मुंबई : प्रतिनिधी लाँग मार्चमधील आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या न्याय्य आहेत. सरकारने त्यांची तातडीने दखल घेऊन ठोस भूमिका घेतली पाहिजे. अन्यथा हा असंतोष, हा ज्वालामुखी, सरकारला भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिला. सोमवारी विधानसभेत कामकाज सुरू होताच विखे पाटील यांनी हजारो आदिवासी …
Read More »
Marathi e-Batmya