बहुचर्चित महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक २०२४ गुरुवारी विधानसभेत बहुमताने मंजूर झाले. सभागृहात, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरी नक्षलवाद आणि लोकशाहीविरोधी संघटनांना आळा घालण्याच्या उद्देशाने हे विधेयक मांडले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, हे विधेयक डाव्या पक्षांच्या आणि कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नाही, तर डाव्या विचारसरणीच्या अतिरेक्याविरुद्ध आहे आणि त्याचा गैरवापर होणार नाही, …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, गृहनिर्माण संस्था व संस्थांच्या सभासदांची लूट थांबवा प्रशिक्षणाच्या नावाखाली पैशांची उकळपट्टी
राज्यातील गृहनिर्माण संस्थांसाठी सहकार कायद्यात दुरुस्ती करण्याचे घाटत असून गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांना तीन तासाचे प्रशिक्षण अनिवार्य करण्यात येणार असल्याचे समजते. या प्रशिक्षणासाठी प्रत्येक सभासदाकडून १२० रुपये व संस्थेकडून १००० रुपये जमा करण्यात येत आहेत. राज्यात जवळपास १ लाख २० हजार गृहनिर्माण संस्था व सुमारे ४ कोटी सभासद आहेत. याचा विचार …
Read More »आशिष शेलार यांची घोषणा, गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा
१०० वर्षाहून अधिक मोठी परंपरा असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला “महाराष्ट्र राज्य महोत्सव” म्हणून आज घोषित करण्यात आले. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी ही घोषणा विधानसभेत केली. विधानसभेत निवेदन करताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव १८९३ साली लोकमान्य टिळकांनी सुरू केला, या उत्सवाची पार्श्वभूमी ही सामाजिक, राष्ट्रीय, …
Read More »शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, ठाकरे मगधहून आलेले, मराठीसाठी तेच लढत आहेत राज-उद्धव ठाकरे यांची युती झाली तरी फार काळ टीकणार नाही
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आणि बिहार मधील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या त्रिभाषा सुत्र आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या नावाखाली हिंदी भाषा लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यावरून मनसे प्रमुख आणि शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्रित येत राज्य सरकारच्या हिंदी निर्णयाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर राज्य सरकारने स्वतःच्या …
Read More »जयंत पाटील यांची मागणी, शासनाने शेतकर्यांना शेतीपंपासाठी तात्काळ वीज कनेक्शन द्या नदीकाठच्या शेतकऱ्यांना सौरऊर्जा प्रकल्पाची सक्ती करू नये अशी विधानसभेत केली मागणी
नदीकाठच्या शेतकऱ्यांना सौरऊर्जा प्रकल्पाची सक्ती करू नये व शासनाने त्यांना शेतीपंपासाठी तात्काळ वीज कनेक्शन द्यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे केली. यावेळी सभागृहात बोलताना आ. जयंत पाटील म्हणाले, वाळवा तालुक्यातील फाळकेवाडी, चंदवाडी येथील शेतकर्यांनी ६.५ किलोमीटर अंतरावरून वारणा नदीतून पाणी आणण्यासाठी २.५ कोटी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कर्नाक पुलाचे सिंदूर नामकरण, काळ्या इतिहासाच्या खुणा पुसल्या ऐतिहासिक सिंदूर (कर्नाक) पुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
दिडशे वर्षांपासून या पुलाला कर्नाक पूल म्हणून ओळख आहे. भारतीयांना फसविणारा आणि अत्याचार करणारा कर्नाक हा ब्रिटीश गव्हर्नर असल्याने त्याच्या काळ्या इतिहासाच्या खुणा पुसण्यासाठी कर्नाक पुलाचे सिंदूर नामकरण केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डी’ मेलो मार्गाला जोडणाऱ्या या सिंदूर (पूर्वीचे कर्नाक) …
Read More »मुद्दा मराठी माणसाच्या हक्काच्या घराचाः पण शिवसेनेच्या दोन गटात गद्दारीवरून रंगला वाद अनिल परब आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यात गद्दारीवरून एकमेकांना धमकी
मागील काही दिवसांपासून मराठी -अमराठीचा वाद सातत्याने चांगलाच रंगला आहे. त्यातच मराठी माणसांना मुंबईतील विविध सोसायट्यांमध्ये घरे नाकारण्याचा प्रकारातही चांगलीच वाढ होत आहे. या मुद्यावरून आज विधान परिषदेत शिवसेना उबाठाचे आमदार अनिल परब आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यात चांगलीच शाब्दीक वाक्ययुद्ध रंगल्याचे चित्र पाह्यला मिळाले. विधान परिषदेत यासंदर्भात शिवसेना उबाठाचे …
Read More »एशियन पेंट्सने विकला अझ्को नोबेल इंडियातील संपूर्ण हिस्सा डुलक्स पेंट कंपनीचे शेअर्स ७५४ कोटींना विकले
एशियन पेंट्सने अझ्को नोबेल इंडियामधील आपला संपूर्ण हिस्सा विकला आहे. कंपनीने डुलक्स पेंट निर्मात्याचे १७.९ लाख शेअर्स ७५४ कोटी रुपयांना विकले आहेत, असे सीएनबीसी-टीव्ही१८ च्या अहवालात म्हटले आहे. हा व्यवहार अझ्को नोबेल इंडियाच्या शेअर्सच्या ४.४२ टक्के इतका आहे. अहवालानुसार, एशियन पेंट्सने हा हिस्सा ३,६६२ रुपये प्रति शेअर या किमतीने विकला. …
Read More »अखेर युएईने मागितली आजीवन व्हिसावरून माफी रायद ग्रुपकडून स्पष्टीकरण जाहिर
विवादित ‘आजीवन युएई UAE गोल्डन व्हिसा’ च्या मध्यभागी असलेल्या दुबई-आधारित गटाने कथित नामांकन-आधारित निवासी प्रयत्नांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे, ज्यामध्ये सुमारे २३ लाख रुपये एवढी निश्चित Dh100,000 किंमतीचा संदर्भ समाविष्ट आहे, असे खलीज टाईम्सच्या अहवालात म्हटले आहे. “लाइफटाइम व्हिसा” व्यवस्थेच्या अशा दाव्याचे खंडन करणारे संघीय ओळख, नागरिकत्व, सीमाशुल्क आणि बंदरे …
Read More »या कंपन्यांनी जाहिर केला लाभांश डॉ रेड्डीज, डिफ्यून इंजिनिअर्स, व्हिल्स इंडियासह यासह अन्य कंपन्याचा समावेश
डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड, डिफ्यूजन इंजिनिअर्स लिमिटेड, व्हील्स इंडिया लिमिटेड आणि एलएमडब्ल्यू लिमिटेड यांचे शेअर्स गुरुवार, १० जुलै रोजी लाभांशासाठी एक्स-डेट होतील. १० रुपये दर्शनी मूल्य असलेली काटी पतंग लाईफस्टाईल लिमिटेड उद्या एक्स-राइट होतील. डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेडच्या बोर्डाने आर्थिक वर्ष २०२५ साठी प्रति शेअर ८ रुपये अंतिम लाभांश देण्याची …
Read More »
Marathi e-Batmya