Editor

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अधिक समन्वयाने काम करणार राज्य सरकारची संरक्षण दलांसोबत बैठकीनंतर दिली माहिती

भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दल आणि राज्य सरकार यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत वर्षा निवासस्थानी झाली. या बैठकीत राज्य सरकार संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यातील सुरक्षेवर आणि सज्जतेवर झालेल्या या बैठकीला …

Read More »

शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांचा ८ पीएमवरून खोचक टोला भारत-पाकिस्ताना शस्त्रसंधीनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आज देशाला संबोधित करणार

मागील महिन्यात पहलगाम येथील बैसरण व्हॅलीत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांना प्राणास मुकावे लागले. त्यानंतर या हल्ल्याचा बदला म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना विविध पद्धतीने इशारे देत त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची घोषणा केली. त्यानंतर ७ मेला भारतीय लष्कराने पाकिस्तानस्थित ९ दहशतवादी तळांवर हल्ले करत दहशतवादी तळ उद्धवस्त …

Read More »

महाराष्ट्र हरिजन सेवक संघ अध्यक्षपदी माजी आमदार मोहन जोशी पाच वर्षासाठी प्रदेशाध्यक्ष पदी केली नियुक्ती

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या हरिजन सेवक संघ, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांची पाच वर्षांकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शंकर कुमार संन्याल यांनी मोहन जोशी यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच दिले. हरिजन सेवक संघाच्या वतीने आदिवासी भागात वसतीगृहे आणि …

Read More »

लष्कराच्या ऑपरेशन सिंदूर ट्रेडमार्क मागणीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका रिलायन्सने मात्र अर्ज मागे घेतला

‘ऑपरेशन सिंदूर’ या शब्दासाठी अनेक ट्रेडमार्क अर्ज दाखल करण्याला आव्हान देणारी जनहित याचिका (पीआयएल) सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. जी भारताच्या पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या लष्करी कारवाईचे नाव आहे. भारत सरकारने या ऑपरेशनचे नाव सार्वजनिक केल्यानंतर लगेचच, रिलायन्ससह अनेक अर्जदारांनी मनोरंजन, शिक्षण, सांस्कृतिक आणि मीडिया सेवांचा समावेश असलेल्या वर्ग ४१ …

Read More »

भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधीनंतर शेअर बाजारात उसळी बीएसई २९७५ अंकानी तर एनएसई ९१६ अंकानी वाढला

बेंचमार्क शेअर बाजार निर्देशांक मोठ्या प्रमाणात तेजीनंतर बंद झाले, सेन्सेक्सने गेल्या वर्षातील सर्वोत्तम तेजी नोंदवली. भारत-पाकिस्तानमधील युद्धबंदीमुळे ही तेजी वाढली, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह निर्माण झाला. दिवस अखेर एस अँड पी बीएसई सेन्सेक्स २,९७५.४३ अंकांनी वाढून ८२,४२९.९० वर बंद झाला, तर एनएसई निफ्टी ५० ९१६.७० अंकांनी वाढून २४,९२४.७० वर बंद झाला. …

Read More »

क्रिकेटपटू विराट कोहली याची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर रोहित शर्मानंतर विराट कोहलीची निवृत्ती

रोहित शर्माने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर अवघ्या पाच दिवसांतच, विराट कोहलीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत त्याच्या कसोटी कारकिर्दीचा शेवट करत असल्याचे जाहिर केले. २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या भारताच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी या प्रदीर्घ स्वरूपातून निवृत्त होण्याची त्याची इच्छा निवडकर्त्यांना सांगितल्यानंतर ३६ वर्षीय खेळाडूची …

Read More »

डिजीएमओची स्पष्टोक्ती, हल्ला दहशतवाद्यांच्या विरोधात, पण पाकिस्तानची त्यांना मदत भारताची संरक्षण सामग्री अभेद्य

भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर पुढील चर्चेसाठी आज संध्याकाळी दोन्ही देशांच्या डिजीएमओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये बैठक होत आहे. तत्पूर्वी आज दुपारी भारतीय डिजीएमओच्या अधिकाऱ्यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना भारताने केलेला हल्ला फक्त दहशतवाद्यांच्या विरोधात होता. तो हल्ला कोणत्याही पाकिस्तानी सैन्याशी किंवा पाकिस्तान देशाच्या विरोधात नव्हता. पण पाकिस्तानी लष्कराने दुर्दैवाने दहशतवाद्यांच्या …

Read More »

राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल मंगळवारी होणार जाहीर या संकेतस्थळांवर पाहता येणार दहावीचा निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र अर्थात दहावी (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवारी १३ मे, २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता …

Read More »

डाळी तेलबियांच्या किमान आधारभूत किंमतीवर खरेदीसाठी बायोमेट्रिक फेस कृषी मंत्रालयाचा निर्णय

कृषी मंत्रालयाने पुढील खरीप २०२५-२६ हंगामापासून डाळी आणि तेलबियांच्या किमान आधारभूत किंमत (एमएसपी) खरेदीसाठी बायोमेट्रिक फेस ऑथेंटिकेशन आणि पॉइंट ऑफ सेल (पीओएस) मशीनचा वापर अनिवार्य केला आहे. विविध योजनांअंतर्गत खरेदीचा लाभ फक्त खऱ्या शेतकऱ्यांनाच मिळावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आधार कायदा, २०१६ च्या कलम ७ मुळे हे शक्य …

Read More »

शस्त्रसंधीमुळे आयपीएलचे सामने पुन्हा सुरु होणार १६ मेपासून आयपीएल सामने पुन्हा सुरु करण्याच्या विचारात बीसीसीआय

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय १६ मे पासून इंडियन प्रीमियर लीग – आयपीएल सामने पुन्हा सुरू करण्याचा आणि स्पर्धा ३० मे पर्यंत वाढवण्याचा विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे आठवडाभर स्थगिती दिल्यानंतर चालू हंगाम थांबवण्यात आला होता. उर्वरित सामन्यांसाठी चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबाद अशी …

Read More »