Editor

सुधीर मुनगंटीवार माहिती, बांबू आधारित व्यवसायामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणार शेतकऱ्यांना प्रशिक्षणही देणार

बांबू आधारित व्यवसायाकरिता नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार असून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. मंत्रालयातील परिषद सभागृह येथे बांबू उत्पादक शेतक-यांच्या विविध विषयासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी …

Read More »

दीपक केसरकर यांची स्पष्टोक्ती, विद्यार्थ्यांच्या सुरक्षा उपाययोजनांशी तडजोड नाही विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी शालेय शिक्षण विभागामार्फत विविध उपाययोजना

शालेय विद्यार्थिनींसोबत घडणाऱ्या दुर्देवी घटना रोखण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे. याचाच एक भाग म्हणून शालेय शिक्षण आणि महिला व बालविकास विभागाच्या एकत्रित प्रयत्नांतून या उपाययोजनांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. यासाठी महिला व बालविकास आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला असून लवकरच त्यातील निष्कर्षांवर चर्चा करुन उपाययोजनांचे सशक्तीकरण …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, महाराजांचा नवा पुतळा उभारणार, समितीची स्थापना वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत निर्णय

मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या दुर्दैवी घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम मनिषा …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागितली, अखेर माफी त्याच ठिकाणी दुसरा पुतळा उभारणार

मालवणमधील शिवाजी महाराज पुतळा आठ महिन्यातच कोसळून पडला. या पुतळा प्रकरणावरून राज्यातील सर्व राजकिय पक्षांनी सत्ताधाऱांना धारेवर धरायला सुरुवात केली. तसेच या घटनेवरून राजकिय कुरघोडी नाट्याला सुरुवातही झाली. यावरून अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी प्रसारमाध्यमांशी बोलताना माफी मागितली. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांनी टोचले मोदी यांचे कान, बेटी बचाव नव्हे तर… महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांवरून मोदींना निशाणा

महिलांना संरक्षणाची नाही तर, त्यांना भयमुक्त वातावरण हवे आहे. आपल्या महिलांवर होणारा कोणताही अन्याय असह्य, वेदनादायी आणि अत्यंत निषेधार्ह आहे. आम्हाला ‘बेटी वाचवा’ ची गरज नाही तर ‘बेटीला समान हक्क मिळवून देण्याची’ गरज असल्याचे मत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. संपूर्ण …

Read More »

दिल्ली उच्च न्यायालयाने दिली बृजभूषण सिंगला आठवड्याची मुदत गुन्हा रद्दबातल करण्यासंदर्भात लेखी म्हणणे मांडा

दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी भाजपा नेते आणि भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी प्रमुख बृजभूषण शरण सिंग यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या लैंगिक छळाच्या गुन्हा अर्थात एफआयआर रद्दबातल ठरविण्यासंदर्भात म्हणणे सादर करण्यास आठवठाभराची मुदत दिली. मात्र आठवडाभराची मुदत देतना बृजभूषण सिंग यांनी यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढले. …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, …पुतळ्याप्रकरणी पंतप्रधान मोदींनी जाहीर माफी मागावी पंतप्रधान मोदींच्या उद्याच्या मुंबई दौऱ्यावेळी मविआचे निषेध आंदोलन

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट किल्ल्यावरील भव्य पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळल्याच्या घटनेचे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच या पुतळ्याचे उद्घाटन झाले होते, पण भाजपा युती सरकारला भ्रष्टाचाराची इतकी कीड लागली आहे की त्यांनी महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार केला. महाराजांचा पुतळा कोसळल्याने महाराष्ट्राच्या अस्मितेला …

Read More »

‘लाडकी बहीण’ विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची याचिका भाजपाची टीका काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा पुन्हा उघड झाल्याचा केशव उपाध्ये यांची टीका

लाडकी बहीण योजनेला महिला वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांकडून जाणूनबुजून योजनेच्या विरोधात मोहीम सुरू आहे. योजनेचे यश डोळ्यात खुपत असल्याने काँग्रेस नेते सुनील केदार यांचा कार्यकर्ता असलेल्या अनिल वडपल्लीवार याने लाडकी बहिण योजने विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. अनिल वडपल्लीवार यांच्या मार्फत काँग्रेस आणि महाविकास आघाडी, लाडकी बहिण …

Read More »

जयंत पाटील यांचा आरोप, राज्यात कणा नसलेले सरकार आहे हे सिद्ध होतंय तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून हत्या

तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांची हत्या केल्याची घटना हिंगोली जिल्ह्य़ातील वसमत तालुक्यात घडली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला जोरदार टीका केली आहे. राज्यात कणा नसलेले सरकार आहे हे सिद्ध होतंय असा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला. आपल्या एक्स हँडलवरून प्रतिक्रिया …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळाप्रकरणी नौदलाची चौकशी समिती संयुक्त तांत्रिक समिती केंद्रीय संरक्षण विभागाकडून नियुक्त

राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळा कोसळण्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी भारतीय नौदलाच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी, तांत्रिक तज्ज्ञ यांचा समावेश असलेली एक संयुक्त तांत्रिक समिती नियुक्त करण्यासंदर्भात केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले. मराठा नौदल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सागरी संरक्षण आणि सुरक्षेच्या वारशाचा गौरव करण्याच्या उद्देशाने, तसेच …

Read More »