Breaking News

राज ठाकरेंकडून अॅन्टालिया स्फोटकप्रकरणी “गुजरात कनेक्शन”चे संकेत केंद्र सरकारने तपासात हस्तक्षेप करावा

मुंबई : प्रतिनिधी प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अॅन्टालिया बंगल्याजवळ स्फोटकाने भरलेली गाडी आढळून आली. त्या गाडीत एक पत्र मिळाले असून त्या पत्रात मुकेश भैय्या, भाभी असे शब्दप्रयोग करत त्यांना उडविण्याची धमकी दिली. धमकी देणारा असा शब्दप्रयोग करू शकतो का? असा प्रश्न उपस्थित करत त्या पत्रातील भाषेचा टोन हा गुजराती …

Read More »

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे होणार होम क्वारंटाईन ? वर्षावर मुक्काम मंत्री आदित्य ठाकरे संपर्कात आल्याने निर्णय

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे एकच खळबळ माजली असतानाच मंत्री आदित्य ठाकरे यांचा कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आदित्यच्या संपर्कात आल्याने पुढील ८ ते १० दिवस होम क्वारंटाईन होणार असून हा संपूर्ण कालावधी मुख्यमंत्री वर्षा या शासकिय निवासस्थानी राहणार …

Read More »

मुख्यमंत्री कार्यालय म्हणते, परमबीर सिंग नावाचे पत्र मिळाले पण त्यावर सही नाही ई मेलवरून प्राप्त झाल्याने त्याची सत्यता तपासणार

मुंबई: प्रतिनिधी आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्या सही नसलेले पत्र समाजमाध्यमात व्हायरल झाल्याने त्यावर एकच राजकिय गदारोळ उडाला. या पत्रावर सही नसल्याने आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या ई-मेल पत्त्यावरून सदरचे पत्र मुख्यमंत्री कार्यालयास प्राप्त झाल्याचा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाने करत सदर पत्राची सत्यता तपासणार असल्याचे रात्री उशीराने प्रसारमाध्यमांना सांगितले. गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल …

Read More »

देशमुखांवरील आरोपाची केंद्रीय यंत्रणेमार्फत किंवा कोर्ट मॉनिटर तपास करा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी

नागपूर : प्रतिनिधी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि विद्यमान महासंचालक, होमगार्ड परमबीर सिंग यांनी लिहिलेले हे पत्र केवळ खळबळजनक नाही, तर अतिशय धक्कादायक आहे. एखादा विद्यमान अधिकारी थेट राज्याच्या गृहमंत्र्यांबद्दल अशाप्रकारचे पत्र लिहिण्याची ही महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांमार्फत वा न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास व्हावा …

Read More »

गृहमंत्री देशमुख म्हणाले, परमबीर सिंगाचा आरोप स्वत:चा बचावासाठी आरोप खोटे असल्याचा दावा

मुंबई: प्रतिनिधी महिन्याला १०० कोटी रूपये वसुली करून द्यावे आणि खासदार मोहन डेलकर मृत्यूप्रकरणाचा तपासावरून आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. परंतु परमबीर सिंग यांनी केलेले आरोप हे स्वत:च्या बचावासाठी करण्यात आलेले असून ते आरोप खोटे असल्याचा खुलासा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. विशेष …

Read More »

गृहमंत्री देशमुखांनी १०० कोटींचे टार्गेट दिले, हवे तर वाझेचा फोन तपासा आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांचे पत्र व्हायरल सत्येतेबाबत शंका

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकार आधीच पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि मनसुख हिरे मृत्युप्रकरणावरून आधीच अडचणीत आले असतानाच आयपीएस अधिकारी तथा तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचे एक पत्र व्हायरल झाले असून या पत्रात त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याला बीअरबार आणि हुक्का पार्लरवाल्यांकडून १०० कोटी रूपयांच्या खंडणी …

Read More »

आदित्य ठाकरेंना कोविडची लागण ट्विटरवरून दिली माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सुपुत्र तथा राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना कोविडची लागण झाली असून संपर्कात आलेल्या लोकांनी विलगीकरणात राहून स्वत:ची चाचणी करावी असे आवाहन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून केले. प्रकृती अस्वस्थामुळे आदित्य ठाकरे यांनी कोरोना चाचणी केली. त्या चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे …

Read More »

१५४ कोटी रूपयांचा कोविड लसीचा प्रकल्प मुंबईत कोविड लस उत्पादनामध्ये हाफकिन संस्थेने पुढाकार घ्यावा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशन आणि हैदराबाद येथील भारत बायोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत कोविड लसीचे उत्पादन करण्यात येणार असून त्यासाठी १५४ कोटी रुपये खर्चाचा नवीन उत्पादन प्रकल्प मुंबईत सुरु करण्याचे नियोजन केले आहे. देशातील काही राज्यातील वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी मिळावी, लसीकरणाचा वेग वाढवता यावा याकरिता हाफकिनला लस उत्पादन …

Read More »

१० वी, १२ वीच्या परिक्षेसाठी मंत्री गायकवाड यांनी केल्या या घोषणा प्रात्यक्षिक परिक्षा होणार लेखीनंतर: शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोरोनामुळे सर्वच शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे वर्ग ऑनलाईन घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा लिखाण सराव कमी झाला असल्याने यंदाच्या १० वी आणि १२ वीच्या परिक्षेचा कालावधी ३० मिनिटांनी वाढविण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी देत परिक्षा ऑफलाईनच होणार असल्याचे स्पष्ट केले. मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघात आयोजित …

Read More »

आता खासगी कार्यालये, आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थितीचे आदेश वाढत्या कोरोना संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाने कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये (आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत. सामाजिक अंतर राखणे सोईस्कर होण्याकरिता उत्पादन क्षेत्रास पाळ्यांमध्ये (शिफ्टमध्ये) वाढ करण्याची मुभा …

Read More »