Breaking News

महिला वन अधिकारी आत्महत्या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी हरीसाल, ता. धारणी (जि. अमरावती) येथे कार्यरत वन परिक्षेत्र अधिकारी श्रीमती दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस जबाबदार अधिकाऱ्यावर त्वरित गुन्हे दाखल करून निलंबित करावे, अशी मागणी महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. श्रीमती दिपाली चव्हाण यांनी स्वत:च्या रिव्हॉल्वरने गोळ्या घालुन २५ मार्च, …

Read More »

फडणवीसांचा पलटवार, तो अहवाल कुंटेंनी नव्हे आव्हाड, मलिकांनी लिहिला गुन्हा घडण्याच्या शक्यतेचाही फोन टॅपिंगच्या कायद्यात समावेश

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काल जो अहवाल दिला, तो त्यांनी तयारच केलेला नाही. मी त्यांना ओळखतो, ते सरळमार्गी आहेत. हा अहवाल कदाचित जितेंद्र आव्हाड किंवा नवाब मलिक यांनी तयार केला असावा आणि त्यावर मुख्य सचिवांनी स्वाक्षरी केली असावी, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते …

Read More »

वेतन वाढ करा, आमदारांच्या स्वीय सहायकांचे विधानसभेच्या उपाध्यक्षांना साकडे मागणीची दखल घेत उपाध्यक्ष नरहरी झिरवळांनी पाठविली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे शिफारस

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील आमदारांच्या गाडीवरील ड्रायव्हर अर्थात वाहन चालकांच्या मानधनात वाढ केल्यानंतर आता स्वीय सहायकांनीही आपल्या वेतन वाढ करण्याच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या केल्या. या मागणीसाठी सर्व आमदारांच्या स्वीय सहायकांनी थेट विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना भेटून यासंदर्भातील मागण्यांचे निवेदन दिले. गेल्या काही महिन्यात महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली असून …

Read More »

परराष्ट्र मंत्रालयात इंटर्नशिप करण्याची संधी आंतरवासिता अर्थात इंटर्नशिप धोरण जाहीर

मुंबई : प्रतिनिधी परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील सर्व राज्याकरिता आंतरवासिता धोरण जाहीर केले आहे. अलिकडेच ऑगस्ट २०१६ मध्ये मंत्रालयाच्या आंतरवासिता धोरणासंबंधी प्रकाशित नियमांचा व्यापक आढावा घेण्यात आला असून त्याचा मुख्य उद्देश म्हणजे एम ए ई वरती जास्त लक्ष केंद्रित करणे, आंतरवासितांना जास्त वाव मिळवून देणे, तसेच मंत्रालयाने आंतरवासितेसाठी (internship) निवडलेले उमेदवारांत …

Read More »

मुख्य सचिवांच्या अहवालात फडणवीस, रश्मी शुक्लांचे पितळ उघडे: वाचा अहवाल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना अहवाल सादर

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा दावा आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अहवालाच्या आधारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत महाविकास आघाडी सरकारवर मोठ्या प्रमाणावर आरोप केले. तसेच या भ्रष्टाचारात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर संशयाची सुई फिरविण्यात आली. मात्र याप्रकरणी राज्याच्या मुख्य सचिवांनी तपासणी केला असता …

Read More »

कोरोना: कालच्या संख्येलाही टाकले मागे तर मुंबईत आजही ५ हजारापेक्षा अधिक ३५ हजार ९५२ नवे बाधित, २० हजार ४४४ बरे झाले तर १११ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी मागील वर्षभरातील सर्वाधिक बाधितांची संख्या राज्यात आढळून आल्यानंतर आज पुन्हा कालच्या संख्येला मागे टाकत तब्बल ३५ हजार ९५२ नवे बाधित राज्यात आढळून आले. मुंबईत आजही ५ हजार ५०५ इतके रूग्ण तर मुंबई उपनगरातील प्रमुख असलेल्या ठाणे मध्ये १४२९ रूग्ण, कल्याण डोंबिवलीत १०२७, नवी मुंबईत ७५६ इतके नवे बाधित …

Read More »

रश्मी शुक्ला भाजपाच्या एजंट असल्यानेच अपक्ष आमदारांवर दबाव आणला आमदार राजेंद्र याड्रावकर यांना धमकवल्याचा जितेंद्र आव्हाडांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी राज्यात विधानसभा निवडणूकीत भाजपाला १०५ जागा मिळाल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी कमी पडणाऱ्या आमदारांच्या व्यवस्थेसाठी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी थेट अपक्ष आमदारांना फोन करून भाजपाला पाठिंबा देण्यासाठी दबाव आणत होत्या. त्यासाठी शिरोळचे अपक्ष आमदार तथा महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर-पाटील यांना धमकाविल्याचा गौप्यस्फोट करत रश्मी शुक्ला या …

Read More »

कॅन्सर रूग्णांसाठी टाटा रूग्णालयाला म्हाडाच्या १०० सदनिका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी दुर्धर अशा कॅन्सर आजारावर उपचारासाठी देशभरातील विविध भागातून मुंबईतील टाटा रूग्णालयात येतात. मात्र येथे रूग्णांच्या आप्तेष्टांना राहण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने त्यांना परेल उड्डाणपुलाच्या खाली, फुटपाथवर कोठेही रहावे लागते. त्यामुळे रूग्णांच्या आप्तेष्टांची सोय व्हावी यासाठी म्हाडाकडून ३०० चौ.फुटाच्या १०० खोल्या टाटा रूग्णालयास देणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड …

Read More »

आम्ही राज्यपालांना भेटणार मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडीतील नेते भेटणार असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने विरोधकांकडून आरोप करण्यात येत असून महाराष्ट्राची बदनामी करून गोंधळाचे वातावरण निर्माण केले जात आहे. यापार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना वेळ देण्याबाबतची विचारणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. मात्र आज राज्यपाल मुंबईबाहेर आहेत. मात्र ते जर संध्याकाळी परत आले तर त्यांची आज संध्याकाळी भेट …

Read More »

देवेंद्र फडणवीसांची चौकशी करा ! युपीएच्या नेतृत्वाबद्दल चर्चा करण्याचा संजय राऊतांना अधिकार नाही-नाना पटोले

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रील सत्ता गेल्यापासून भारतीय जनता पक्षाचे राज्यातील नेते सैरभैर झाले असून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम ते करत आहेत. हा महाराष्ट्राचा अपमान असून भाजपाच्या या कृतीला लोक कंटाळले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बेछूट, बेलगाम आणि बालीश आरोप करत आहेत. सीडीआरबद्दलही ते विधानसभेत खोटे बोलले असून ते …

Read More »