Breaking News

मोदी सरकारची सात वर्षे म्हणजे सर्वसामान्यांचे प्रचंड हाल आणि महामारीतील अपयश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी सात वर्षात नोटाबंदी झाली… जीएसटी लावण्यात आली… कोरोनासारखी महामारी हाताळता आली नाही… लोकांचे हाल झाले… बेरोजगारी वाढली… नोकर्‍या गेल्या… लोकं जीव गमावत आहेत…तरीही भाजप सरकारची ७ वर्ष साजरी करणार होती अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष …

Read More »

भाजपप्रणित राज्यातच “मोदी मॉडेल”चा फज्जा ! काँग्रेस प्रवक्ते अनंत गाडगीळ यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने ज्या ‘गुजरात मॉडेल’ चा डंका पिटवून देशातील सत्ता काबिज केली, त्याच गुजरातमधे कोरोनाची दूसरी लाट बेफिकीरपणे हाताळल्याबद्द्ल ना केवळ खुद्द स्थानिक प्रसार माध्यमांनी खरी वस्तुस्थिती मांडत सरकारचे वाभाड़े काढले, पण सन्मा. गुजरात उच्च न्यायालयानेही नाराजी व्यक्त करीत खड़े बोलही सुनावले. यामुळे, गुजरातचे “अकार्यक्षम …

Read More »

विजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त हद्यविकाराच्या झटक्याने वयाच्या ७८ व्या वर्षी निधन

मुंबई: प्रतिनिधी आपल्या अवीट सुरांनी मराठी, हिंदी गाणी सुपरहिट आणि अजरामर करणारे राम लक्ष्मण जोडीतील लक्ष्मण उर्फ विजय पाटील यांचे आज वयाच्या ७८ व्या वर्षी हृदयविकाराने नागपूर येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील संगीतातील राम लक्ष्मण युगाचा अस्त झाला. सुरेंद्र हेंद्रे आणि विजय पाटील यांनी मिळून संगीतकार म्हणून आपल्या …

Read More »

फडणवीस महाराष्ट्रासोबत नाहीत हे आता सिद्ध होवू लागलेय राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांचा टोला

मुंबई: प्रतिनिधी कोकणातील जनतेला भरपाई देणार आहोतच परंतु महाराष्ट्राला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मोदींकडे आग्रह धरला पाहिजे. त्यांनी तसे केले तर ते राज्यातील जनतेसोबत आहेत हे सिद्ध होईल. मात्र देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासोबत नाहीत हे आता सिद्ध होवू लागले आहे अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते …

Read More »

मुंबईतल्या मच्छीमार बांधवांसाठी जीआर बदला पण मदत करा भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी तौक्ते वादळाने नुकसान झालेल्या मच्छीमार बांधवांचा आक्रोश सरकारने समजून घेऊन सध्याच्या जीआर मध्ये बदल करून मच्छिमार बांधवांना मदत करणे आवश्यक आहे, असे मत भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज येथे व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ देऊन हा मच्छीमारांचा आक्रोश समजून घेणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. चक्रीवादळामुळे …

Read More »

सर्वसामान्यांमध्ये जाताना नवे बूट खरेदी करावे लागणे यासारखे आश्चर्य नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा टोला

मुंबई: प्रतिनिधी सर्वसामान्य लोकांमध्ये जाताना राज्याच्या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना नवीन बूट खरेदी करावे लागतात यासारखे आश्चर्य नाही अशी खोचक टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. तोक्ते वादळाने कोकणात मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते कोकणच्या दौर्‍यावर होते. यावेळी प्रसिद्ध …

Read More »

विरोधकांवर पलटवार करत मुख्यमंत्र्यांचे कोकणवासियांना आश्वासन संपूर्ण आढावा घेऊन नुकसानग्रस्तांना मदत करणार, कोणीही वंचित राहणार नाही

रत्नागिरी : प्रतिनिधी तौक्ते चक्रिवादळामुळे झालेल्या कोकणात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मी वैफल्यग्रस्त नसल्याचा टोला लगावला तर सिंधुदूर्गात विशेषत: मालवणमध्ये आपण फक्त फोटो काढण्यासाठी आलेलो नसल्याचे सांगत विरोधकांच्या टीकेला प्रतित्तुर देत चक्रिवादळामुळे बाधित झालेल्या प्रत्येकाला नुकसान भरपाई देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे …

Read More »

वकिल असल्याने फडणवीसांचे नेहमीच ‘चीत भी मेरी और पट भी मेरी’ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा टोला

मुंबई: प्रतिनिधी ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित ठेवून जे मराठा आरक्षण आहे ते अतिरिक्त आरक्षण दिले पाहिजे ही पहिल्यापासून राज्यसरकारची भूमिका आहे. परंतु देवेंद्र फडणवीस आणि भाजप दोन्ही बाजुने खेळ खेळत आहे. कधी ओबीसी तर कधी मराठा समाजाला भडकवणे हे राजकारण बंद करावे असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि …

Read More »

आता प्रामाणिकपणे मोदींचे आभारही माना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे महाविकास आघाडी नेत्यांना आवाहन

मुंबई : प्रतिनिधी ऐन मान्सूनच्या तोंडावर खतांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी याबाबत तीव्र नापसंती व्यक्त करत दरवाढीच्या निर्णयाचा पुर्नविचार करण्याचे आवाहन केले. तर भाजपा नेत्यांनी दरवाढ रद्द करण्याऐवजी खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्याची मागणी केंद्रीय रसायने आणि खते मंत्री सदानंद गौडा …

Read More »

पंतप्रधान मोदींनी घेतली अहमदनगर पॅटर्नची दखल जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्याशी साधला दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद

अहमदनगर: प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. पंतप्रधान मोदी यांनी आज देशातील निवडक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे थेट संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी, जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशाची यशस्वी अंमलबजावणी, माझे कुटुंब माझी …

Read More »