Breaking News

डॉ.आंबेडकरांची जमिन धारण योजना आणि आजचे उदासीन प्रशासन माजी मंत्री राजकुमार बडोले लिहित आहेत कर्मवीर गायकवाड सबलीकरण योजनेविषयक

भारतीय समाजव्यवस्थेत अनुसूचित जाती/जमाती याना जमिनी धारण करण्यास मज्जाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुर्वीच्या काळी राजाची चाकरी करणाऱ्या व्यक्तींना किंवा जनतेची कामे करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या चाकरीबद्दल बक्षीस म्हणून जमीनी दिल्या जात असत. सन १८६० ते १८६२ या दरम्यान “इनाम कमीशन” ने चौकशी करून १) पाटील २) कुलकर्णी ३) सुतार ४) …

Read More »

काम सुरु असलेल्या या महामार्गाचा ६ कि.मी. प्रवास मुख्यमंत्र्यांनी स्वत: गाडी चालवित केला समृध्दी महामार्ग ठरणार विदर्भाची भाग्यरेखा

अमरावती : प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज दुपारी दोनच्या सुमारास हेलिकॉप्टरने अमरावती येथून वैजापूर तालुक्यातील गोलवाडी येथे आगमन झाले. त्यांच्या समवेत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे होते.  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या प्रगती कामाचा आढावा ठाकरे यांनी यावेळी गोलवाडी येथे घेतला. त्यानंतर  स्वतः गाडी चालवत समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली. विदर्भाच्या …

Read More »

मराठा आरक्षणावरील स्थगितीप्रश्नी या तारखेला होणार सुणावनी राज्य सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश

मुंबई  : प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवरील सर्वोच्च न्यायालयाची तात्पुरती मनाई मागे घेण्यासाठी घटनापीठाची स्थापना करून तातडीने सुनावणी करण्याच्या राज्य शासनाच्या मागणीला यश आले असून, येत्या ९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता पाच सदस्यीय घटनापीठासमोर यासंदर्भात सुनावणी होणार असल्याची माहिती मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. मराठा आरक्षणासंदर्भातील …

Read More »

राज्यात ५ ते ७ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा जनतेने स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी आपले योगदान देत आहेत. या लढाईसाठी आवश्यक औषधे, सुविधांची कमतरता भासू नये यासाठी शासनस्तरावरुन सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परंतु राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी असल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या महाराष्ट्रातील ३४४ रक्तपेढ्यांमध्ये १९ हजार ०५९ …

Read More »

कोरोना : बाधित घटतायत जाणून घ्या कोणत्या शहर-जिल्ह्यात किती संख्या ५ हजार २२९ नवे बाधित, ६ हजार ७७६ बरे झाले तर १२७ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळणविण्यात राज्य सरकार चांगल्यापैकी यशस्वी होताना दिसत असून दिवाळीनंतर विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. परंतु मागील १५ दिवसात बाधितांच्या संख्येवर चांगल्यापैकी नियंत्रण मिळविण्यात येत असल्याचे दिसून येत असून दैंनदिन ५ हजाराच्या जवळपास संख्या आढळून येत आहे. मागील २४ तासातही ५ …

Read More »

हैदराबादमध्ये भाजपाने केंद्रीय टीम आणूनही तिसऱ्या स्थानी टीआरएस प्रथम तर एमआयएम दुसऱ्या स्थानी

मुंबई : प्रतिनिधी हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी घेतलेल्या भाजपाच्या पुढे जात टीआरएस ७१ जागांवर पुढे राहिली आहे., एआयएमआयएम ४३ आणि भाजपाची ३४ जागांवर घोडदौड सुरू आहे. भारतीय जनता पक्षाचे सर्वस्व पणाला लावलेल्या हैदराबाद महापालिका निवडणुकीची आज मतमोजणी होत आहे. हैदराबाद महापालिकेच्या १५० जागांवर एकूण ११२२ उमेदवार रिंगणात आहेत. …

Read More »

पराभूत होवूनही भाजपाची शिवसेनेवर टीका शिवसेनेला भोपळा मिळाला : चंद्रकांत पाटील; शिवसेनेने आत्मचिंतन करावे : देवेंद्र फडणवीस

मुबंई: प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणूकीत महाविकास आघाडीला चार, भाजपाला एक आणि अपक्ष एका जागेवर निवडूण आले. यावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, तिन्ही पक्ष एकत्रित लढल्याने त्यांना विजय मिळाला आणि हे स्वाभाविक होते. माझे त्यांना नेहमी आव्हान राहील की त्यांनी एकटे लढून दाखवा. मात्र …

Read More »

महाराष्ट्राच्या सत्तेची दिवास्वप्ने पाहणाऱ्या फडणवीसांचा भ्रमाचा भोपळा फुटला ...आणि रॉबर्टसेठचा दणदणीत पराभव झाला!:सचिन सावंत

मुंबईः प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारला भारतीय जनता पक्ष हा अमर, अकबर, अँथनीचे सरकार म्हणून हिणवत होता. अमर, अकबर, अँथनी जसा हिट चिटपट होता तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षाचे कॉम्बिनेशन हिट झाल्याचे विधान परिषदेच्या आजच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. या अमर, अकबर, अँथनीनेच रॉबर्ट शेटचा दणदणीत पराभव …

Read More »

भाजपाच्या दोन मातब्बर नेत्यांच्या मतदारसंघात घुसली महाविकास आघाडी फडणवीस, पाटील यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा गड झाला खिळखिळा

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील ५ जागांकरीता झालेल्या निवडणूकांत मध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मतदारसंघातील जागा राखता आल्या नाहीत. त्यामुळे या दोन नेत्यांच्या नेतृत्वाबद्दल भाजपामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पुणे पदवीधर मतदारसंघातील एक जागा भाजपाकडे होती. मागील काही वर्षापासून या मतदारसंघातून …

Read More »

गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांवर होणार ही कारवाई आरोग्य विभागाकडून इशारा

मुंबई: प्रतिनिधी राज्यात गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. नेमून दिलेल्या प्रक्रिया शुल्कापेक्षा जास्त प्रक्रिया शुल्क आकारल्यास त्याच्या पाचपट दंड आकारला जाईल. जादा आकारण्यात आलेले शुल्क रुग्णास परत करण्यात येईल. या कारवाईसाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संचालकांना सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे, अशी …

Read More »