Breaking News

खा. सुप्रिया सुळे म्हणतायत, “लाईफ इज ब्युटीफुल” पण “बदलावं लागणार” फेसबुकवरुन जनतेशी साधला संवाद

मुंबई: प्रतिनिधी आता १४-१५ दिवस शिल्लक राहिले आहेत. सुरक्षित राहुया कारण ‘लाईफ इज ब्युटीफुल’ छोट्या – छोट्या गोष्टी आता महत्वाच्या वाटू लागल्या आहेत. कदाचित म्हणूनच नियतीच्या मनात काहीतरी असेल म्हणून तिने आपल्याला थोडंसं ‘चेक्स इज बॅलन्सस’ मध्ये जगायला शिकवलं. प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकायला मिळते. मी अनुभवातून शिकते. मी माझ्या आयुष्यात …

Read More »

१५०० पोलिसांच्या पदोन्नतीला मुहूर्त सापडेना १० फेब्रुवारीला आदेश काढूनही पुर्तता नाही

मुंबई: प्रतिनिधी नि:शस्त्र पोलीस उप निरीक्षक पदी पदोन्नती देण्यासाठी विभागीय अर्हता परीक्षा- २०१३ मधील पात्र असलेल्या १५०० उमेदवारांची उप निरीक्षक पदी पदोन्नती रखडली आहे. या यादीत सर्वाधिक ५६३ पदे ही मुंबई पोलीस आयुक्तांलयाच्या अंतर्गत येत असून पुण्यात ९४ पदोन्नतीची प्रकरणे आहेत. ही पदे तत्काळ भरण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली …

Read More »

मंत्रालयातील सर्व सहसचिव, उपसचिवांनी हजर राहीलेच पाहिजे महिला अधिकाऱ्यांच्या बाबत सचिवांनी निर्णय घेण्याचे सामान्य प्रशासनाचे आदेश

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमधील काही गोष्टी शिथिल करत राज्याच्या अर्थचक्राला चालना देण्याच्या उद्देशाने प्रशासकीय कामकाजाला सुरुवात करण्यात आली. मात्र सुरुवातीला फक्त उपसचिवांसह इतर कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्यासंदर्भात आदेश काढण्यात आले. मात्र प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेत सहसचिवांचा सहभागही महत्वाचा असतो. त्यामुळे मंगळवार २१ एप्रिलपासून सहसचिव, उपसचिवांची उपस्थिती आवश्यक अर्थात १०० टक्के करण्याचा …

Read More »

धार्मिक रंग देऊन प्रकरण भडकवू नये सीआयडी कसून तपास करीत असल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी पालघर येथे तीन जणांची जमावाने ठेचून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करून यातील प्रमुख ५ हल्लेखोर आणि सुमारे १०० जणांना पकडले असून गुन्हा अन्वेषण विभाग कसून तपास करीत आहे. मृतांमध्ये दोन साधू होते मात्र या प्रकरणाला कुणीही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नये, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे …

Read More »

सॅनिटेशन डोम-टनेलला शास्त्रीय आधार नाही- व्यक्तींना अपाय होईल महाराष्ट्र आरोग्य विभाग आणि केंद्रीय आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण

मुंबई: विशेष प्रतिनिधी परदेशात कोरोनापासून बजाव करण्यासाठी सॅनिटेशन डोम-टनेल उभारून गर्दीच्या ठिकाणी सुरक्षितता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे व्हीडीओ मध्यंतरी मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. ते व्हीडीओ पाहून राज्यातील पोलिस दलाकडून मोठ्या प्रमाणावर असे डोम-टनेलची निर्मिती करून जागोजागी लावण्यात आले. मात्र अशा डोम-टनेलला कोणताच शास्त्रीय आधार नसून त्यापासून कोरोना विषाणू …

Read More »

मालेगाव, अ.नगर आणि सोलापूरतील कोरोना रूग्णावरील उपचारासाठी पथक वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अहमदनगर,मालेगाव आणि सोलापूर शहरात कोविड -19 चा प्रादुर्भाव वाढत असल्याने या तिन्ही ठिकाणी तज्ञ डॉक्टरांच्या पथकांची नेमणूक करण्याची विनंती सार्वजनिक आरोग्य विभागाकडून करण्यात आली होती. यानुसार या तिन्ही ठिकाणी वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत तज्ञ पथकांची नेमणूक करण्यात करण्यात आली आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख …

Read More »

मुख्यमंत्री साहेब, मंत्रालयाच्या गेटवर सँनिटायझर टनेल बसवाल का ? मंत्रालयातील कर्मचारी-अधिकाऱ्यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊन असतानाही राज्याच्या प्रशासनाचे कामकाज आणि थांबलेल्या अर्थचक्राला गती देण्यासाठी उद्यापासून मंत्रालयातील कामकाजात अधिकाऱ्यांचे प्रमाण वाढविण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर मुंबई महानगरातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी मंत्रालयाच्या मुख्यप्रवेशद्वारावर सँनिटायझरच्या टनेलची व्यवस्था करावी अशी मागणी शासकिय अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. वाढत्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि पंतप्रधान …

Read More »

निवृत्तवेतनातून पती-पत्नी शिक्षकांनी दिले कोरोना विरोधी लढ्याला १ लाख मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली रक्कम

सोलापूर / नातेपुते:प्रतिनिधी संपूर्ण जगभरासहीत देशात, राज्यात थैमान घातलेल्या कोरोना विषाणू चा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुल्ला मुलाणी समाजाचे सदस्य सेवानिवृत्त मुख्याध्यापिका नजमा मुल्ला व त्यांचे पती उप प्राचार्य शाहानुर मुल्ला यांनी सेवानिवृत्ती वेतनातून “मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19)” म्हणून एक लाख रुपये स्टेट बँक ऑफ इंडिया च्या माध्यमातून दिले आहेत. …

Read More »

पंतप्रधान मोदीजी, डॉ.आंबेडकरांनी नाकारलेले शब्द वापरू नका प्रा.गणेश देवी आणि आमदार कपिल पाटील यांचे मोदींना पत्र

मुंबई: प्रतिनिधी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपू्ण देशभरात शाररीक अंतर राखण्यासाठी आपण इंग्रजीतला social distancing हा शब्द प्रयोग वापरण्यास सुरुवात केली. मात्र हा शब्द पूर्वीच्या अस्पृश्यता पाळण्याच्या प्रथांची आठवण करून देतो. तसेच हा शब्द देशाचे घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नाकारलेला शब्द आहे. तसेच who नेही या शब्दाला पर्यायी शब्द दिला आहे. …

Read More »

सीमा बंद, महिलांनी १०० नंबरवर कॉल करावा आणि कामगारांनो तुम्ही घरी पोहोचाल लॉकडाऊनमुळे भेडसावणाऱ्या प्रश्नांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून दिलासा

मुंबई : प्रतिनिधी राज्यात उद्यापासून अर्थात २० एप्रिल पासून आपण कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या क्षेत्रांत काही प्रमाणात व्यवहार सुरु करत आहोत. मात्र जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील नागरिकांनी अतिशय आवश्यक कारण असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन करत लॉकडाऊन काळात ज्या महिलांना कौटुंबिक हिसांचाराला तोंड द्यावे लागत आहे, त्या महिलांनी १०० नंबरला …

Read More »