Breaking News

हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही

खंडाळ्याहून आलेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली उद्योगमंत्र्यांची भेट मुंबई : प्रतिनिधी हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही, तसेच निरा देवधर सिंचन प्रकल्पग्रस्तांच्या बागायतीखालील जमिनी औद्योगिक क्षेत्रासाठी संपादित करण्यात आलेल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना पर्यायी जमिनी शेतकऱ्यांच्या संमतीने देण्यात येईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. साताऱ्यातील खंडाळ्याहून आलेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयात उद्योगमंत्र्यांची भेट घेतेली, त्यानंतर …

Read More »

देशातील बँक लुटून गेलेले लोक अद्याप चौकीदाराला सापडले नाहीत

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका औरंगाबाद – कन्नड : प्रतिनिधी या भाजपचे सरकार आल्यावर बँकांवर दरोडे घालून दिवसाढवळया काही लोक निघून गेले. परंतु ते दरोडेखोर चौकीदाराला अद्याप सापडले नसल्याची खोचक टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कन्नडच्या जाहीर सभेत केली. राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन निर्धार यात्रा कन्नड येथे आल्यानंतर झालेल्या जाहीर …

Read More »

“मुक्या- बहिऱ्या” सांस्कृतिक कार्य विभागामुळे लोककलेची परंपरा खंडीत होणार

तमाशा फड मालकांचा पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार मुंबई : प्रतिनिधी सरकारवर कोणताही करोडोचा  बोजा  न पडणारा,  केवळ आपल्या किरकोळ मागण्यासाठी तमाशा महोत्सवावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलेल्या तमाशा फड मालक संघटनेच्या प्रमुखांशी कोणत्याही प्रकारे सामोपचाराची भूमिका न घेता, “मुके आणि बहिरे” पणाच्या अवस्थेत असलेल्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने दर वर्षी होणाऱ्या तमाशा महोत्सवाची परंपरा यंदा खंडीत करण्याच्या …

Read More »

सरकारला काम करण्याची अक्कल नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची टीका बुलढाणा- वरवटबकाल: प्रतिनिधी हे भाजप सरकार बेरोजगारी वाढवतेय… तुमच्या नोकर्‍या घालवतंय… आधारभूत किंमत देत नाहीय… कापसाला दर नाही… तांदुळ, तूरीला बारदाने घेण्याची अक्कल या सरकारला नाही त्या सरकारकडून काय अपेक्षा करणार अशी विचारणा जनतेला करतानाच विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी सरकारला चांगलेच खडसावले.  …

Read More »

अनुसूचित जातीसह मागासवर्गीय समाजाच्या कल्याणासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार

सत्तेच्या राजकारणात प्रत्येकजण राजकीय महत्वकांक्षा ठेवून राजकारणात येतो. परंतु राजकारणात असून कोणतीही राजकिय महत्वकांक्षा मनाशी न ठेवता केवळ ज्या समाजातून आपण आलो. त्या समाजातील प्रत्येक घटकाला, वंचिताला आणि उपेक्षिताला त्याच्या न्याय हक्काबरोबरच त्याला स्वत:च्या पायावर उभ करता यावे या उद्देशाने आपल्या पदाचा आणि राजकिय वजनाचा उपयोग करणारे सामाजिक न्याय आणि …

Read More »

भारतीय रेल्वेचे १०० टक्के विद्युतीकरण करणार

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची घोषणा मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या विकासासाठी मुंबई रेल मंडळात केंद्र आणि राज्य शासनाच्या सहायाने ७५ हजार करोड एवढी गुंतवणूक करण्यात येणार आहे. मुंबई रेल मंडळ हे १०० टक्के विद्युतीकरण असलेले पहिले मंडळ आहे. त्याचधर्तीवर संपूर्ण भारतीय रेल्वेचे १०० टक्के विद्युतीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा करत केंद्र …

Read More »

वीजग्राहकांना मिळणार मोबाईलवर मीटर रिडींगची माहिती

बिलावरील मीटरच्या रिडींगची फोटोपध्दत बंद करण्याचा महावितरणचा निर्णय मुंबई : प्रतिनिधी महावितरणकडून वीजग्राहकांना वीजबिलाबाबत तसेच मीटर रिडींगबाबतची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे ग्राहकांच्या अधिकृत मोबाईलवर दिली जाते. तसेच एसएमएस दाखवून वीजबील भरण्याची सुविधा महावितरणने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे महावितरणने १ फेब्रुवारी २०१९ पासून वीजबिलावरील मीटररिडींगचा फोटो देण्याची पध्दत बंद करण्याचा …

Read More »

जमीन, पशू धारणा आणि शेतकरी कुटुंबाच्या परिस्थितीचे होणार मुल्यांकन

राष्ट्रीय नमुना पाहणी अंतर्गत होणार पाहणी मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रीय नमुना पाहणीच्या ७७ व्या फेरीत कुटुंबाची जमीन, पशू धारणा, शेतकरी कुटुंबाच्या परिस्थितीची मुल्यांकन पाहणी करण्यात येणार असून ही पाहणी जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत संपन्न होईल. राज्यातील सर्व नागरिकांनी पाहणीसाठी आणि माहिती संकलनासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करून परिपूर्ण …

Read More »

सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱी आत्महत्या करतायत

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची राज्य सरकारवर टीका  जळगाव – चोपडा: प्रतिनिधी या सरकारच्या नाकर्तेपणा मुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचा आरोप विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी करत लोकांचे विकासाचे प्रश्न सोडवायला यांच्याकडे पैसा नाही. परंतु यांच्या घोषणा करण्याचं काम सुरुच आहे. गरीब गरीब होत चालला आहे आणि …

Read More »

अजोय मेहता राज्याचे नवे गृह सचिव ?

मुख्य सचिव जैन यांना तीन महिन्याची मुदतवाढ मिळणार मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विविध विभागांचे प्रधान सचिव असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या लवकरच बदल्या होणार असून अप्पर मुख्य सचिव सुनिल पोरवाल यांच्या निवृत्तीमुळे रिक्त झालेल्या जागेवर मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर राज्याचे मुख्य सचिव डि.के.जैन यांना …

Read More »