देशात पेट्रोल व डिझेलची दरवाढ झाल्याने त्याचा मोठा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. इंधन महाग झाल्याने खाद्यतेल, दुधासह सर्वच वस्तुंची महागाई होणार आहे. महागाईची ही झळ इराण युद्धामुळे झाल्याचे चित्र निर्माण करत जनतेने काटकसर व त्याग करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले परंतु ही महागाई केवळ युद्धामुळे नाही तर मोदी …
Read More »ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला दिलासा पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणाला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली तात्पुरती स्थगिती
मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील जमिनीच्या टीडीआरच्या विषयाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणी दोन्ही पक्षांची बाजू जाणून घेऊन अंतिम निर्णय देईपर्यंत त्यांनी या टीडीआर व्यवहाराला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या मालकीच्या या जमिनीबाबत निर्माण …
Read More »काँग्रेसच्या सात हजार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसाठी टिळक भवनमध्ये प्रशिक्षण शिबीर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शन करणार
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या संघटन सृजन अभियानाअंतर्गत राज्यातील विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्त करण्यात आलेली आहे. या अभियानातून काँग्रेसने ७ हजार पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. या ७ हजार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे दिनांक २६ मे ते २९ मे दरम्यान विभागनिहाय प्रशिक्षण शिबिर …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, पुण्याला देशातील एक आधुनिकतम शहर म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न पुणे महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
पुणे शहराला देशाचे ‘ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर’ म्हणून ओळख मिळत असून ती पुढे नेण्यासाठी मेट्रोचे जाळे, रस्त्यांची सुधारणा, भूमिगत बोगद्यांचे जाळे तयार करणे आदी माध्यमातून उत्तम वाहतुकीची व्यवस्था, चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करणे, उत्तम जीवनशैली सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुणे शहरात हाती …
Read More »भरत गोगावले यांचे आवाहन, रोहयो विभागामार्फत भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहा सोशल मिडीयाच्या माध्यमातून भरतीच्या जाहिराती
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू असल्याची बोगस जाहिरात सोशल मीडियाद्वारे प्रसारित करण्यात येत आहे. अशा जाहिरातींना बळी पडून सर्वसामान्य नागरिक व बेरोजगार युवकांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन रोजगार हमी योजना विभागाचे मंत्री भरत गोगावले यांनी केले आहे. …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे मत, भागीदारीतून उभारलेले कर्करोग रुग्णालय आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड सार्वजनिक आणि खाजगी भागिदारीतून रूग्णालयाची उभारणी
पुणे महानगरपालिकेच्या जागेवर सामाजिक बांधिलकी जपत उभारण्यात आलेले अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय हे आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी पाऊल असून सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून निर्माण झालेले हे केंद्र आरोग्य क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांच्या संयुक्त उपक्रमातून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक कर्करोग …
Read More »बदलापूर शाळेतील अल्पवयीन मुलींचे दहावीपर्यंत प्रवेश शुल्क शासनामार्फत भरण्यास विशेष मान्यता शासन निर्णय जारी करत दिली मान्यता
बदलापूर येथे ऑगस्ट २०२४ मध्ये एका शाळेत अनुचित घटना घडली होती. त्या घटनेनंतर त्यातील दोन अल्पवयीन मुलींच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी त्यांच्या इयत्ता दहावीपर्यंतच्या शिक्षणाचा प्रवेश शुल्काचा संपूर्ण खर्च शासनामार्फत अदा करण्यास, एक वेळची विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. …
Read More »छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अनावरण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अन्यजण उपस्थित
पुणे महानगरपालिकेच्यावतीने संभाजी महाराज उद्यान येथे उभारण्यात आलेल्या बुधभूषण ग्रंथ रचनाकार छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, …
Read More »वाशिममध्ये पेट्रोल पंपावरील लावलेल्या लाईनतील नंबरवरून नागरिकांमध्ये हाणामारी इंधन तुटवडा आणि शेकडो लोक एकाचवेळी पेट्रोल पंपावर जमा झाले
इंधनाच्या तुटवड्यामुळे डिझेल आणि पेट्रोल खरेदी करण्यासाठी शेकडो लोक जमल्याने महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील एका पेट्रोल पंपावर लाईनतील नंबरवरून गोंधळ उडाला आणि नागरिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला. वाशिम येथील इंडियन ऑइलचे डीलर जितेंद्र चोप्रा यांनी सांगितले की, शनिवारी दुपारी २.३० ते ३ च्या सुमारास १५,००० लिटर डिझेल आणि ५,००० लिटर पेट्रोल घेऊन …
Read More »जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांची स्पष्टोक्ती, तामिळनाडूतील परिस्थिती वेगळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या राजकीय यशाचा तुलनात्मक अभ्यासावेळी केले वक्तव्य
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांनी, त्यांच्या राजकीय प्रवासाची तुलना विजय यांच्या जलद उदयाशी केली जात असताना, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमधील राजकीय परिस्थिती एकाच दृष्टिकोनातून पाहता येणार नाही, असे वक्तव्य केले. विषेश म्हणजे पवन कल्याण हे आंध्र प्रदेशामधील तेलगू चित्रपटसृष्टीतील अभिनेते आहेत. तर तामिळनाडू चित्रपटसृष्टीतील अभिनेते …
Read More »
Marathi e-Batmya