Breaking News

भारतीय हवामान खात्याचा इशारा, राज्यातील या भागात अतिवृष्टी ३० जून ते ३ जुलै च्या चार कालावधीत बरसणार

हवामान खात्याने सौराष्ट्र, कच्छ, केरळ, तामिळनाडू आणि किनारी आणि दक्षिण आतील कर्नाटकात २९ जून ते १ जुलै या कालावधीत वेगळ्या मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर गुजरात, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात २९ जून ते ३ जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात ३० जून …

Read More »

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती, NEET-PG परिक्षेचे वेळापत्रक दोन दिवसात एनटीएने परिक्षेच्या तारखा जाहिर केल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची माहिती

नीट पीजी NEET-PG परिक्षेचे नवीन वेळापत्रक पुढील दोन दिवसांत राष्ट्रीय परीक्षा मंडळ (NBE) जाहीर करेल, असे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज २९ जून रोजी सांगितले. स्पर्धात्मक चाचण्यांतील कथित अनियमिततेच्या कारणास्तव NEET-PG ही परीक्षा मागील आठवड्यात रद्द करण्यात आलेल्या परीक्षांपैकी एक आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी हरियाणा भाजपाच्या विस्तारित राज्य …

Read More »

उदय सामंत यांची माहिती, दावोसच्या सामंजस्य कराराबाबत श्वेतपत्रिका काढणार तीन वर्षात केलेल्या सामंज्यस करारावर श्वेत पत्रिका काढणार

थेट परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राला सलग दोन वर्ष प्रथम स्थानावर ठेवण्याचे काम उद्योग विभागाच्या माध्यमातून झाले असून मोठ्या प्रमाणात परदेशी उद्योग समूह राज्यात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत. दावोस येथे गेल्या तीन वर्षांत राज्याने केलेल्या विविध सामंजस्य करारांची (एमओयू),गुंतवणूक प्रकल्पाबाबतची माहिती देणारी श्वेतपत्रिका उद्योग विभाग प्रसिद्ध करणार असल्याचे घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत …

Read More »

अजित पवार यांची ग्वाही, कोणताही खेळाडू शासकीय सेवेच्या लाभापासून वंचित राहणार नाही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून विचारलेल्या प्रश्नाला दिली माहिती

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे अनेक खेळाडू उत्तम कामगिरी करीत आहे. महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविण्याऱ्या या खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार शासकीय नोकरी देण्यासाठीचे निकष निश्चित करण्याबाबतचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचाविणारा कोणताही खेळाडू या निर्णयाच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी आवश्यकता असल्यास निकषांमध्ये …

Read More »

कोअर बैठकीनंतर आशिष शेलार यांचा विश्वास, विधासभा निवडणुकीत महायुतीच पंकजा मुंडे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत ग्वाही

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीची रणनीती ठरली असून महायुतीतील सहकारी पक्षांसोबत भाजपा लढणार आहे. सामान्य जनतेचा आशीर्वाद असल्याने विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळेल, असा विश्वास भाजपा मुंबई अध्यक्ष आ.आशिष शेलार यांनी शनिवारी व्यक्त केला. भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आ. आशिष शेलार बोलत होते. यावेळी राष्ट्रीय सचिव …

Read More »

नाना पटोले यांच्या जय भिम नगरबाबतच्या प्रश्नी विधानसभाध्यंक्षांचे आदेश जयभीम नगरमधील ६५० बेघर कुटुंबांच्या निवाऱ्याची व्यवस्था करा

पवई भागातील जय भीम नगरमधील झोपड्या तोडल्याचा प्रश्न उपस्थित करुन नाना पटोले म्हणाले की, जयभीम नगरमधील ६५० गरिब, मागासवर्गिय कुटुंबांवर ६ जूनच्या रात्री पोलीस बंदोबस्तात कारवाई करून या कुटुंबांना बेघर करण्यात आले आहे, आज ही सर्व कुटुंबं रस्त्यावर आहेत. पोलीस व मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून चुकीची कारवाई करून या मागासवर्गीय …

Read More »

नीट पेपर फुटीवरून काँग्रेसने राज्य सरकारला धरले धारेवरः अजित पवार यांनी केली भूमिका स्पष्ट नाशिकमध्ये परराज्यातील विद्यार्थ्यांनी बोगस प्रमाणपत्रे काढून नीट परीक्षा दिली, सरकार झोपा काढत आहे का?

विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने सुरु असलेल्या नीट परीक्षेत झोल सुरू आहे. या परीक्षेला महाराष्ट्रात सर्वाधिक विद्यार्थी बसतात. एवढा मोठा घोटाळा होऊन सरकारची भूमिका स्पष्ट नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. शिक्षण मंत्री म्हणतात काही गडबड झाली आहे. मग सरकार जबाबदारी घेणार आहे की नाही असा सवाल विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. या संदर्भात विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना …

Read More »

शरद पवार यांचा मार्मिक सवाल, खिशात ७० रूपये तर मग १०० कसे खर्च करणार? अर्थसंकल्प केवळ शब्दांचा फुलोरा असल्याची केली टीका

खिशात ७० रुपये मग १०० रुपये खर्च करणार कसे? हा अर्थसंकल्प म्हणजे शब्दांचा फुलोरा आहे असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. अजित पवार यांनी सादर केलेल्या १० व्या अर्थसंकल्पावरून शरद पवार म्हणाले की, एखाद्या गोष्टीला १०० रुपये खर्च असेल आणि माझ्या …

Read More »

२२ महिन्यानंतर सरकारकडून तूटीनंतर सरप्लस निधी कॅगच्या अहवालातील माहिती

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कडून विक्रमी हस्तांतरणाद्वारे चालना मिळालेली आणि आदर्श आचारसंहितेद्वारे मदत केली गेली, केंद्राने २२ महिन्यांच्या अंतरानंतर मे महिन्यात मासिक वित्तीय अधिशेषाचे सरप्लस निधी राखण्यात यश मिळविले असल्याचे वृत्त बिझनेस लाईनने आपल्या वृत्तात म्हटले आहे. यासह, पहिल्या दोन महिन्यांत राजकोषीय तूट गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीतील ११.८ …

Read More »