भागधारकांसाठी खूशखबर या दोन कंपन्यांकडून लाभांश जाहीर

एफएमसीजी क्षेत्रातील दिग्गज हिंदुस्तान युनिलिव्हर आणि टेक महिंद्राने भागधारकांना खूशखबर दिली आहे. टेक महिंद्रानेने आपल्या भागधारकांना २४० टक्के लाभांशही जाहीर केला आहे. आयटी सेवा कंपनी टेक महिंद्राने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. यावेळी लाभांशाची घोषणा केली आहे.

टेक महिंद्राचा निव्वळ नफा जुलै-सप्टेंबर तिमाहीत वार्षिक आधारावर ६१.६ टक्क्यांनी घसरून ४९४ कोटी रुपये झाला आहे. कंपनीने प्रति शेअर २४० टक्के लाभांशही जाहीर केला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी प्रति शेअर १२ रुपये अंतरिम लाभांश मंजूर केला आहे.

सप्टेंबर तिमाहीत टेक महिंद्राचा एकत्रित महसूल वार्षिक आधारावर २ टक्क्यांनी घसरून १२,८६४ कोटी रुपये झाला. तिमाही आधारावर महसुलात २.२ टक्क्यांनी घट झाली आहे. टेक महिंद्राचे EBIT मार्जिन किंवा ऑपरेटिंग मार्जिन ४.७ टक्के आले, जे मागील तिमाहीत ६.८ टक्क्यांपेक्षा कमी आहे.

एफएमसीजी क्षेत्रातील दिग्गज हिंदुस्तान युनिलिव्हर ही सर्वात मोठा लाभांश देणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी पुन्हा एकदा आपल्या भागधारकांना १८०० टक्के अंतरिम लाभांश देणार आहे.

हिंदुस्तान युनिलिव्हरने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. यासह कंपनीने ३१ मार्च २०२४ रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी १ रुपये दर्शनी मूल्यासह प्रति शेअर १८ रुपये लाभांश देण्याची शिफारस केली आहे. कंपनीने भागधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी २ नोव्हेंबर २०२३ ही रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केली आहे.

आर्थिक वर्षमधील हिंदुस्तान युनिलिव्हरचा हा पहिला लाभांश आहे. कंपनी पहिल्या सहामाहीमध्ये ४,२२९ कोटी लाभांश देईल. जे ३,९९४ कोटी किंवा १७ प्रति शेअरच्या लाभांश देयकापेक्षा ६ टक्क्यांनी जास्त आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये कंपनीने प्रति इक्विटी शेअर ३९०० रुपये ३९ टक्क्यांचा लाभांश दिला.

दुसऱ्या तिमाहीत हिंदुस्तान युनिलिव्हरने २,७१७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला. जो वर्षभरात ४ टक्क्यांनी वाढला आहे. तर विक्री १५,०२७ कोटी होती. तसेच ४ टक्क्यांची समान वाढ नोंदवली गेली.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे मत, यूएई आणि भारतामधील बँकिंग भागीदारी भारतीय अर्थव्यवस्थेच्या उत्कर्षाचे प्रतीक केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांचा दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे सहभाग

जगभरातील गुंतवणूकदारांचा भारतीय अर्थव्यवस्थेतील विश्वास वाढत आहे. त्यामुळेच अरबी समुद्राच्या दोन्ही टोकांवरील मजबूत अर्थव्यवस्था असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *