मुंबईः प्रतिनिधी बँक ऑफ बडोदाने आपलं गृहकर्ज स्वस्त केलं आहे. बँकेने गृहकर्जाच्या व्याजदरात ०.२५ टक्के कपात केली आहे. आता बँकेच्या गृहकर्जाचा व्याज दर ६.५० टक्केपासून सुरू होईल. नवीन कर्जाव्यतिरिक्त नवीन व्याजदराचा लाभ इतर बँकांकडून हस्तांतरित केलेल्या गृहकर्जावरही उपलब्ध होईल. नवीन दर ७ ऑक्टोबर २०२१ पासून लागू झाले आहेत आणि ३१ …
Read More »१५ वर्ष जुनी दुचाकी, कार, ट्रक वापरणं होणार महाग नोंदणी नूतनीकरण शुल्कात आठ पट वाढ
मुंबईः प्रतिनिधी तुमच्याकडे १५ वर्ष जुनी कार असेल आणि कारच्या नोंदणीचं नुतनीकरण पुढील वर्षी करायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण १५ वर्ष जुन्या कारची नोंदणी नूतनीकरण आता आठ पटीने महागणार आहे. एप्रिल २०२२ पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षात नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी आपल्याला आजच्या तुलनेत आठ पट अधिक …
Read More »सणासुदीच्या तोंडावर इंधन दरवाढ सुरूच, घरगुती एलपीजी सिलेंडर महागला गॅस सिलेंडरच्या किंमतीत १५ रुपयांनी वाढ
मुंबईः प्रतिनिधी सणांच्या आधी सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी मंगळवारी विनाअनुदानित १४.२ किलो गॅस सिलेंडरच्या किंमतीत १५ रुपयांनी वाढ केली आहे. दर वाढीनंतर आता एलपीजी सिलेंडरची किंमत ८८४.५० रुपयांवरून ८९९.५० रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. त्याचबरोबर ५ किलोचा …
Read More »टाटा-मिस्त्री वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता, हे आहे कारण डिबेंचर विकून ६,६०० कोटी रुपये उभे करण्याची योजना
मुंबईः प्रतिनिधी रतन टाटा आणि सायरस मिस्त्री यांच्यात सुरू असलेल्या वादात नवा ट्विस्ट आला आहे. त्यांच्यामधील वाद आता पुन्हा एकदा वाढू शकतो. वास्तविक शापूरजी पालनजी समूहाचे प्रवर्तक गुंतवणूकदारांना डिबेंचर विकून ६,६०० कोटी रुपये उभारण्याची योजना आखत असल्याचे वृत्त आहे. यासाठी टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्सचे शेअर्स गहाण ठेवण्यात येतील. …
Read More »दिवाळीच्या या खास वेळी शेअर बाजारात पैसे कमवण्याची संधी जाणून घ्या मुहुर्त ट्रेडिंगबद्दल
मुंबईः प्रतिनिधी शेअर बाजाराने अनेक वर्षांपासून आपल्या परंपरा जपल्या आहेत. यातील सर्वात महत्त्वाची परंपरा म्हणजे दिवाळीच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंग. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर शेअर बाजारात मुहूर्ताचं ट्रेडिंग केलं जातं. गुंतवणूकदार मुहूर्तच्या विशेष प्रसंगी नव्या गुंतवणुकीस सुरुवात करतात. मुहूर्त ट्रेडिंग केल्याने गुंतवणुकदारांची वर्षभर भरभराट होईल असे म्हटले जाते. बीएसई आणि एनएसई दिवाळीच्या …
Read More »ऑक्टोबरमध्ये घरबसल्या पैसे कमवण्याची संधी या कंपन्याचे येणार आयपीओ
मुंबईः प्रतिनिधी गुंतवणूकदारांना ऑक्टोबर महिन्यात घर बसल्या पैसे कमवण्याची उत्तम संधी मिळणार आहे. याचं कारण म्हणजे या महिन्यात पॉलिसी बाजारसह १२ कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतीय कंपन्यांनी आतापर्यंत आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये आयपीओद्वारे ५९,७१६ कोटी रुपये उभारले आहेत. त्याचबरोबर अनेक कंपन्या अजूनही त्यांच्या आयपीओसाठी भांडवली बाजार नियामक …
Read More »जीएसटीतून सलग तिसऱ्या महिन्यात १ लाख कोटींचं उत्पन्न अर्थव्यवस्था लागली रूळावर यायला
मुंबईः प्रतिनिधी चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला देशाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागला. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला. पण आता अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबरमध्ये जीएसटी कलेक्शन ५ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहे. सप्टेंबर महिन्यात जीएसटीपासून १ लाख १७ हजार १० कोटी रुपयांचा महसूल सरकारला मिळाला आहे. जीएसटी …
Read More »तुम्हाला माहित आहे का? गौतम अदानींच्या संपत्तीत रोज कितीने वाढ होते १ हजार कोटींची वाढ, पुन्हा बनले आशियातील दुसरे श्रीमंत
मुंबई : प्रतिनिधी अदानी समूहाचे मालक गौतम अदानी हे आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. सध्या त्यांची संपत्ती ५.०५ लाख कोटी रुपये आहे. एक वर्षापूर्वी त्यांची संपत्ती १.४० लाख कोटी रुपये होती. म्हणजेच गेल्या एका वर्षात त्यांची संपत्ती ३.६५ लाख कोटी रुपयांनी वाढली. ह्या एका वर्षात त्यांची संपत्ती दररोज …
Read More »एलआयसी आयपीओ का आहे खास ? जाणून घेऊया भारतातील सर्वात मोठ्या आयपीओबद्दल
मुंबई : प्रतिनिधी शेअर बाजारात प्राथमिक समभाग विक्रीतून (आयपीओ) कमाई करण्याची चांगली संधी गुंतवणूकदारांना असते. कमी वेळेत आणि कमी गुंतवणूकीत चांगला नफा मिळवण्याचा आयपीओ हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचं लक्ष आयपीओकडं लागलेलं असत. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी – LIC) चा आयपीओ लवकरच येणार आहे. या आयपीओकडं शेअर बाजाराचं लक्ष लागून राहिलं आहे. एलआयसीचा आयपीओ पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत येईल. केंद्र सरकारने एलआयसीच्या आयपीओतून ९० हजार कोटी रुपये उभारण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. आय़पीओ येण्याआधी …
Read More »६८ वर्षांनंतर एअर इंडिया पुन्हा टाटा उद्योगाच्या ताफ्यात सर्वाधिक बोली लावत एअर इंडियाचा ताबा मिळविला
नवी दिल्ली-वृत्तसंस्था: प्रतिनिधी एअर इंडियासाठी लावलेली बोली टाटा समूहाने जिंकली आहे. त्यामुळे ही विमान कंपनी आता टाटा समूहाच्या मालकीची झाली. टाटा समूहाने स्पाइसजेटचे अध्यक्ष अजय सिंह यांच्यापेक्षा जास्त बोली लावली होती. एअर इंडिया ६८ वर्षांनंतर पुन्हा टाटांकडे आली आहे. एअर इंडियासाठी बोली लावण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर होती. तेव्हापासून टाटा समूह एअर इंडियाचा ताबा …
Read More »
Marathi e-Batmya