शेअर बाजार पहिल्यांदाच ७२ हजारावर तर निफ्टी सर्वोच्च उच्चांकावर

देशातील अर्थव्यस्थेचा पाया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायक्रोइकॉनॉमीकच्या मुलभूत तत्वांमध्ये आंतरराष्ट्रीयस्तरावर घडामोडींमध्ये होत असलेल्या स्थिरतेच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारातील निर्देशांकांने पहिल्यांदाच उसळी मारत तो दिवस अखेर ७२ हजारावर बंद झाला. तर निप्टीनेही आपल्या आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचला असल्याचे सांगण्यात येत आहे.

देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या व्हेरियंच प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे रूग्णांचीही संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या सगळ्या घडामोडीत मुंबईतील शेअर बाजार सकाळी सुरु झाला. बाजार सुरु होताच स्टील उद्योग, किरकोळ बाजार, वाहन आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्सच्या मागणींत वाढ झाली. त्यामुळे सातत्याने त्यात वाढच होत राहिली. त्यामुळे शेअर बाजाराच्या निर्देशांकात २१ हजार ६७५४.७५ या नव्या उच्चांकावर पोहोचला.

शेअर बाजाराच्या ४ थ्या सत्रात बाजाराच्या निर्देशांत ७०१.६३ ने किंवा ०.९६ इतकी वाढ झाल्याचे दिसून आले. त्यामुळे शेअरबाजार बंद होताना तो सर्वाधिक उच्चांकावर ७२,०३८ या उच्चांकार पोहोचला. वास्तविक पाहता दिवसभरात मुंबई शेअर बाजारातील एकूण ट्रेंड पाहता निर्देशांकात ७८३ किंवा ०.१ टक्के इतकी वाढ झाल्याचे दिसून येते.

आंतरराष्ट्रीयस्तरावर स्तरावरील आशादायक परिस्थितीचा फायदा निफ्टी मधील गुंतवणूकदारांनी झाल्याचे दिसून आले. निफ्टी बाझाराच्या निर्देशांकात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे दिसून आले असून २१३ किंवा १.०९ टक्के इतकी वाढ झाल्याचे पाह्यला मिळाले. त्यामुळे निफ्टी बाझार दिवसभरात २१ हजार ६५४ वर पोहोचला. तर दिवसभरात त्याच पुन्हा वाढ होत २३४ किंवा १.०९ इतकी निर्देशांकात वाढ होत २१ हजार ६७५ या उच्चांकावर दिवसअखेर बंद झाला.

मुंबई शेअर बाजारात अल्ट्रा टेक सिमेंट, जेएसडब्लू, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, स्टेट बँक ऑफ इंडिया, लार्सन अॅड टूर्बो, इन्फोसिस आणि बजाज फायनान्सच्या शअर बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी आणि दर चढ्या स्वरूपाचे असल्याने या कंपन्यांना फायदा झाला. या कंपन्यांबरोबर एनटीपीसी, टेक महिंद्राचे शेअर्स मागे पडल्याचे दिसून आले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचे मत, यूएई आणि भारतामधील बँकिंग भागीदारी भारतीय अर्थव्यवस्थेच्या उत्कर्षाचे प्रतीक केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांचा दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे सहभाग

जगभरातील गुंतवणूकदारांचा भारतीय अर्थव्यवस्थेतील विश्वास वाढत आहे. त्यामुळेच अरबी समुद्राच्या दोन्ही टोकांवरील मजबूत अर्थव्यवस्था असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *