मुंबईतील बेकायदेशीर इमारतींवर तीन महिन्यात कारवाई मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई शहरात ज्या इमारतींचे मनपाच्या कागदोपत्री अस्तित्वच नाही अशा बेकायदेशीर इमारतींची तपासणी करुन कारवाई करावी अशी मागणी माजी अर्थमंत्री आणि विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी विधानसभेत आज केली.

या मागणीची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईतील अनधिकृत इमारतींची यादी जयंत पाटील यांनी दिली आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेला सांगून तीन महिन्यात त्या त्या भागातील वार्ड ऑफिसरला सांगून अशा इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश देणार असल्याचे आश्वासन दिले.

मुंबईतील बेकायदेशीर इमारतींची यादी मी दिली असून महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिसरना अशा इमारती शोधून काढण्याचे काम दयावे आणि अशा बेकायदेशीर इमारती तपासून कारवाई करावी अशी सूचना जयंत पाटील यांनी सभागृहात केली.

About Editor

Check Also

आशिष शेलार यांची ग्वाही, आरे परिसरात भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी जंगल निर्माण करणार आरे परिसरात ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या ‘हरित महाराष्ट्र – ३०० कोटी वृक्षारोपण’ मोहिमेअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *