मुंबई

एकाने १० तास ठेवले, त्याने दुसरीकडे पाठविले- अखेर अंत, आयुक्त- मुख्यमंत्रीसाहेब हे थांबणार कधी ? राजावाडीला गेलेल्या कोरोना पेशंटबाबतचा ह्दयद्रावक अनुभव .- नामदेव उबाळे माजी नगरसेवक घाटकोपर

मी राजावाडी हॉस्पीटलमध्ये रमाबाई आंबेडकर नगर वसाहतीच्या आनंदविकास चाळ येथील वय वर्ष ५७, पॉझीटिव्ह रूग्णास ६ तास झाले तरी दाखल करत नाही म्हणून प्रत्यक्ष गेलो.डीन डॉक्टर विद्या ठाकुर, डॉक्टर कल्पेश केणे यांच्याशी बोललो.सहा तास पॉझिटिव्ह पेशंट कठड्यावर झोपला आहे. त्याच्या बाजूला इतर लोक बसतात, यामुळे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यांनी …

Read More »

अन्नधान्य पुरवठ्यासाठी अपुरे मनुष्यबळ असतानाही मुंबई ठाण्यात १ हजार कर्मचारी कार्यरत जनतेची गैरसोय होवू नये यासाठी संघटनेकडून राज्य सरकारबरोबर सहकार्य

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू केले. त्यामुळे आर्थिक गोष्टींबरोबरच जेवण-खाण्याची सोयी बंद झालेल्या आहेत. यापार्श्वभूमीवर कष्टकरी, कामगार आणि गरिब-गरजूंना धान्य मिळावे यासाठी रेशनिंग कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. मुंबई- ठाणे मिळून जवळपास ११६६ अधिकारी-कर्मचारी यासाठी झटत असल्याची माहिती मुंबई शिधावाटप कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रामराजे …

Read More »

सावधान ! Mont Blanc वेबसाईटवरून मेसेज आलाय? लॉकडाऊनच्या काळात ४०४ गुन्हे दाखल, २१३ जणांना अटक

मुंबई: प्रतिनिधी लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. सध्या Mont Blanc नावाच्या नकली वेबसाईट संदर्भात आर्थिक फसवणूकीच्या बऱ्याच तक्रारी येत आहेत .त्यापासून सावध राहावे. असे आवाहन सायबर विभागाने केले आहे. तसेच राज्यात सायबर संदर्भात ४०४ गुन्हे …

Read More »

पोलिसांबरोबर काम करू, एकतर गाडीची व्यवस्था करा नाहीतर घराजवळ नियुक्ती द्या संघटनेचे प्रशासनाला पत्र

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या पार्शवभूमीवर मुंबईतून परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणावर त्यांच्या मुळ गावी जात आहेत. या कामगारांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी पोलिस दलास मदत करण्यासाठी मंत्रालयातील १४५७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र मंत्रालयातील अनेक कर्मचारी हे उपनगरात रहात असल्याने त्यांच्या येण्यासाठी सध्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. त्यामुळे त्यांच्या येण्यासाठी एक तर …

Read More »

केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन ११ राष्ट्रीय संघटना उतरणार

मुंबई: प्रतिनिधी सद्यस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारांनी कामगार विरोधी धोरणांमध्ये वाढ केली आहे. या विरोधात देशातील प्रमुख ११ राष्ट्रीय संघटनांनी शुक्रवार २२ मे रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात देशभरातील सरकारी कर्मचारी सामील होणार आहेत. राज्यातही मध्यवर्तीच्या संघटनेच्या समर्थ नेतृत्त्वाखाली हे लक्षवेध आंदोलन जाहीर करण्यात आले आहे. आंदोलनातील …

Read More »

मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचे झाले बाकीच्या ६ विभागाचे काय? कोरोना योध्दे अथवा इतर कमी पडत असलेल्या ठिकाणी या विभागातील अधिकाऱ्यांनाही पाठवा

मुंबई: प्रतिनिधी कोरोना युध्दात सध्या मुंबई महापालिकेच्या अत्यावश्यक सेवांसहित बिगर अत्यावश्यक सेवांमधील कामगार, कर्मचारी तसेच अधिकारी आणि पोलिस दलातील कर्मचारीही जीव धोक्यात घालून काम करत आहेत. यातील पोलिसांच्या मदतीसाठी मंत्रालयातील १४२१ कर्मचाऱ्यांना पोलिसांच्या दिमतीला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र विक्री कर, रेशनिंग ऑफिस, म्हाडा, एसआरए, एमएमआरडीए आणि सार्वजनिक बांधकाम …

Read More »

पोलिसांच्या दिमतीला १९ अवर सचिवांची नियुक्ती : डिव्हॅल्युएशन झाल्याची भावना ग्रामविकास विभागातील कर्मचारी का कमी ?

मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील लॉकडाऊनमुळे स्थलांतरीत कामगारांचा प्रश्न जटील बनत चालला आहे. त्यामुळे या कामगारांना योग्यरित्या त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी पोलिसांच्या मदतीला मंत्रालयातील १४०० कर्मचारी-अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र यात क्लार्क, टायपिस्ट, असिस्टंट यांच्याबरोबर अवर सचिवांची नियुक्ती करण्यात आल्याने आमचं डिव्हॅल्युएशन केले की काय असा सवाल या नियुक्त अवर सचिवांकडून उपस्थित …

Read More »

भायखळ्यात तापाची साथ, अधिकारी म्हणतात- नगरसेवकाने सांगितले तरच येवू वैद्यकीय शिबिरे घेण्याची स्थानिक नागरिकांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी मुंबईत भायखळातील बालाजी हॉस्पिटल परिसर या ठिकाणी ३ कोरोना बाधीत रुग्न आढळले असुन ४ आठवड्या पासुन येथे तापाची साथ चालु आहे. नागरीक भयभीत झाले असुन वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्याची मागणी करण्यात येत आहे. संपुर्ण जगात कोरोना या विषाणूने थैमान घातले असुन आपला भारत देश देखील कोरोनाच्या कचाट्यातुन …

Read More »

व्रतस्थाची सावली हरपली सविता दिनू रणदिवे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली

मुंबई : प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक दिनू रणदिवे यांच्या पत्नी सविता रणदिवे यांचे शनिवारी निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. प्रेमजी देवजी कन्या विद्यालय, चिंचपोकळी येथे गुजराती भाषेच्या शिक्षिका म्हणून त्यांनी काम केले होते. त्यांच्या पश्चात ज्येष्ठ दिनू रणदिवे हे आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आघाडीवर राहिलेले ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे …

Read More »

पुढच्या वर्षात प्रवेश घ्यायचाय, परिक्षेची माहिती हवीय, या नंबरवर करा फोन मुंबई विद्यापीठाची विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन सुरु

मुंबई: प्रतिनिधी विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी ) व राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या निर्देशानुसार मुंबई विद्यापीठाने कोविड- १९ च्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या परीक्षा व पुढील वर्गातील प्रवेशासंदर्भात विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन क्रमांक व ईमेल सुविधा सुरु केली आहे. विद्यार्थी या हेल्पलाईन क्रमांकावर व ईमेलवर संपर्क साधून परीक्षा व पुढील वर्गातील प्रवेशासंदर्भात मार्गदर्शन …

Read More »