मुंबई

पोलिस यंत्रणेला चकमा देत मनसे कार्यकर्त्यांचा लोकलने प्रवास ठिकठिकाणी सविनय कायदेभंग आंदोलन

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि उपनगरावासियांची जीवन वाहिनी असलेल्या लोकलने प्रवास करण्यास सर्वांना प्रवास करण्यास राज्य सरकारने बंदी आणली असून फक्त सरकारने परवानगी दिलेल्यांनाच प्रवास करण्याची मुभा दिली. मात्र मुंबईसह उपनगरातील नागरीकांना दैनदिन कामासाठी एक तर एस.टी अथवा खाजगी बसने प्रवास करावा लागतो. त्यामुळे वेळेचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत …

Read More »

वायकरांच्या मागणीला यश: वधावन आणि एचडीआयएलच्या मालमत्तेची विक्री गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी पत्र लिहून कळविली वायकरांना माहिती

मुंबई: प्रतिनिधी बहुचर्चित पंजाब अँड महाराष्ट्र बँके अर्थात पीएमसीतील आर्थिक घोटाळ्यातील रकमेची वसूली करण्यासाठी राकेश वधावान, सारंग वधावान आणि एचडीआयएलची मालमत्ता विकून वसुली करण्यात येणार आहे. त्यासाठी जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांची लवकरच जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज बंटी पाटील यांनी एका पत्राद्वारे आमदार रविंद्र वायकर यांना …

Read More »

खुशखबर : या पदांसाठी ऑनलाईन पध्दतीने मुंबईत होणार ३ हजार ४०१ पदांची भरती महास्वयंम संकेतस्थळावरुन सहभागी होण्याचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने १८ ते २३ सप्टेंबरदरम्यान ऑनलाईन पध्दतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय’ रोजगार मेळावा घेण्यात येत असून या मेळाव्यात ३ हजार ४०१ पदांसाठी संधी उपलब्ध झाली आहे. उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाइटवर नोंदणी व लॉग इन करुन पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या …

Read More »

अंतिम वर्षाचे परिक्षा फॉर्म भरण्यास ३ दिवसांची मुदतवाढ; बॅकलॉग परिक्षा २५ तारखेपासून अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठांना शासन सर्वतोपरी सहकार्य करेल-उदय सामंत

मुंबई : प्रतिनिधी अंतिम वर्ष /अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठांना शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी परिक्षा अर्ज भरला नाही अशा विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून बँकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा २५ सप्टेंबरपासून सुरु होणार असल्याची माहिती असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. आज …

Read More »

मुंबईत पोलिसांकडून पुन्हा लॉकडाऊन ; कलम १४४ लागू पोलिस प्रशासनाकडून अध्यादेश जारी

मुंबई: प्रतिनिधी शहरात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढीस लागल्याने या संख्यावाढीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी मुंबईत पुन्हा एकदा एकापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रित येण्यावर बंदी घालत कलम १४४ लागू करण्यात आला आहे. तसेच बाजार, मंदीर आदीसह कोणत्याही परिसरात एकापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा मुंबई पोलिस उपायुक्त शहाजी उपम यांनी …

Read More »

म्हाडाचे नवे मुख्याधिकारी डिग्गीकर तर समाज कल्याण आयुक्तपदी नारनवरे ६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील ६ आयएएस अधिकाऱ्यांच्या पुन्हा बदल्या राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत. म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी अनिल डिग्गीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुणे येथील समाज कल्याण आयुक्त पदी असलेल्या प्रविण दराडे यांची उचलबांगडी करत त्यांच्या ठिकाणी प्रशांत नारनवरे यांची नियुक्ती करण्यात आली. याशिवाय विवेक जॉन्सन अधिसंख्य …

Read More »

मुख्यमंत्र्यांचा इशारा, पुढील दोन महिने धोक्याचे महानगरपालिका वॉर्ड अधिकारी, उपायुक्त, वैद्यकीय अधीक्षक, अधिष्ठाता यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांची बैठक

मुंबई : प्रतिनिधी करोना रुग्णांची वाढती संख्या वेळेतच नियंत्रित करणे गरजेचे आहे. सर्वांच्या सहभागाशिवाय हे शक्य नाही, आगामी दोन महिने अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.  धारावी, वरळी पॅटर्नचे जागतिक पातळीवर कौतुक झाल्यानंतर आपली जबाबदारी अधिक वाढली आहे. ही वेळ कौतुक ऐकत बसण्याची नाही. गणपती उत्सवानंतर सणांची मालिका सुरु झाली आहे. हा काळ नववर्षापर्यंत …

Read More »

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात मुख्यमंत्र्यांनी घातले लक्ष दिले हे आदेश अडचणी तात्काळ दूर करून कालबद्ध रीतीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले

मुंबई: प्रतिनिधी वरळी, एन एम जोशी मार्ग आणि नायगाव येथील बीडीडी चाळींचा रखडलेला पुनर्विकास वेगाने व्हावा यादृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा येथे झालेल्या एका बैठकीत निर्देश दिले असून वरळी येथे बीडीडी चाळीत ९६०० भाडेकरू असून त्यांची आवश्यक ती पात्रता आणि कागदपत्रे तपासण्यासाठी तातडीने त्या ठिकाणी विशेष शिबीर आयोजित करून विशिष्ट कालमर्यादेत हे …

Read More »

राज्यातील पोलिस बदल्यांना मिळाली मुदतवाढ आता या तारखेपर्यत होणार राज्य सरकारकडून नव्याने आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील पोलिस आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी देण्यात आलेली मुदत उद्या संपत आलेली आहे. मात्र अद्यापही अनेक अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणे बाकी असल्याने या बदल्यांसाठी आता सप्टेंबरच्या महिना अखेरपर्यत मुदतवाढ देण्यात आली असून त्यासंदर्भातील आदेशही राज्य सरकारकडून जारी करण्यात आले. पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्यां बदल्यासाठी ५ सप्टेंबर २०२० …

Read More »

राज्याच्या सेवेत २३ सनदी अधिकारी नव्याने रूजू निवड यादी जाहीर

मुंबई: प्रतिनिधी मंत्रालय आणि महसूल केडरमधून आयएएस अधिकारी पदासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून विभागांतंर्गत परिक्षा घेण्यात आल्या. या परिक्षांमध्ये राज्यातील २३ अधिकाऱ्यांची आयएएस अधिकारी पदी निवड झाली असून सनदी अधिकारी चंद्रकांत डांगे यांचे बंधु प्रदिपकुमार डांगे हे ही आज जाहीर झालेल्या सनदी अधिकारी म्हणून निवड झाल्याने दोन भाऊ आता सनदी अधिकारी …

Read More »