माजी गृहमंत्री अनिल देशमुखांसह १०० कोटींच्या खंडणी आणि आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणातील आरोपी आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला उच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. मंगळवारी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या वतीने ज्येष्ठ वकील राजा ठाकरे यांनी वाझेला जामीन दिल्यास कोणतीही हरकत नसल्याचे न्या. एम. एस. सोनक आणि न्या. जितेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला …
Read More »नरेश म्हस्के यांच्या खासदारकीला आव्हान ठाण्यात अडकून पडलेली ईव्हीएम मशीन निवडणूक आयोगाच्या ताब्यात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या लोकसभेतील विजयाला शिवसेना (उबाठा) नेते राजन विचारे यांनी निवडणूक याचिकेतून आव्हान दिले. या निवडणूक याचिकेच्या निमित्ताने जप्त केलेली मतदान यंत्र ( (ईव्हीएम मशीन) ही आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा निवडणूक आयोगाच्या ताब्यात देण्याचे आदेश सोमवारी उच्च न्यायालयाने दिले. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर …
Read More »शिंदे गटाचे माजी नगरसेवक हाजी बब्बू खान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश मुंबई काँग्रेस अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते, माजी नगरसेवक हाजी बब्बू खान यांनी आज मुंबई काँग्रेस अधयक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत शकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी वर्षा गायकवाड यांनी त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना खा. वर्षा …
Read More »कुर्ल्यातील शाळा शिक्षक मतदानाच्या दिवशीच निवडणूकीची कामे करणार निवडणूक आयोगाची उच्च न्यायालयात माहिती
कुर्ला येथील खासगी शाळेतील शिक्षकांना दिवाळीच्या सुट्टीत आणि मतदानाच्या एक दिवस आधी व मतदानाच्या दिवशी निवडणूक कामे लावली असल्याची माहिती निवडणूक आयोगाने सोमवारी उच्च न्यायालयात दिली. त्यानंतर, परीक्षाकाळात शिक्षकांना निवडणूक कामे लावण्याविरोधात विद्यार्थ्यांच्या पालकांनी केलेली याचिका न्यायालयाने निकाली काढली. परीक्षाकाळात शिक्षकांना निवडणूक कामे लावणे हे विद्यार्थ्यांच्या शिक्षण घेण्याच्या अधिकाराचे उल्लंघन …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्त्या सना मलिक-शेख अणुशक्तीनगरमधून लढणार… लवकरच उमेदवारी अर्ज भरणार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती उपाध्यक्षा आणि प्रदेश प्रवक्त्या सना मलिक – शेख या अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. अनुशक्ती नगरमधून विद्यमान आमदार नवाब मलिक हे प्रतिनिधित्व करत होते. आता नवाब मलिक यांच्या अनुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून सना मलिक-शेख या आता उमेदवारी अर्ज भरत निवडणूकीला …
Read More »रामदास आठवले यांचा इशारा, आनंदराज आंबेडकर यांनी पीईएसमध्ये लुडबुड करू नये बोगस कागदपत्रांच्या आधारे धर्मादाय आयुक्तांकडे दावा केला होता
पीईएस अर्थात पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या ठरावा नूसार माझी चेअरमन पदी नेमणूक झालेली आहे. या ठरावा विरोधात पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने काही लोकांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे धर्मादाय आयुक्तांकडे दावा दाखल केला होता. यावर धर्मदाय आयुक्तांनी दोनवेळा भालचंद्र मुगणेकर आणि अशोक तळवटकर यांचा अर्ज फेटाळून लावला असून धर्मादाय आयुक्तांनी ४ …
Read More »सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ६६७ तक्रारी प्राप्त; यापैकी ६६० निकाली २७ कोटी ७८ लक्ष रुपयांची मालमत्ता जप्त
राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते २० ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ६६७ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ६६० तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. म्हणजे एकूण ९९ टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या …
Read More »सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांची स्पष्टोक्ती, त्यामुळे राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा अयोध्येचा निकालावेळी मी देवासमोर बसून होतो आणि मार्ग दाखविला
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड सिंग हे आज पुण्यात एका कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी बोलताना मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या अयोध्येतील वादग्रस्त जमिनीप्रकरणी दिलेल्या निकालावर पहिल्यांदाच भाष्य केले. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड म्हणाले की, अयोध्येतील वादग्रस्त जागेच्या निकालाच्या दिवशी मी देवासमोर मार्ग दाखव म्हणून बसलो आणि मला मार्ग मिळाला. त्यानुसार …
Read More »आशिष शेलार यांचा आरोप, धारावीकरांचा उपयोग करुन मुंबईत व्होट जिहाद वर्षा गायकवाड यांना पुढे करून अडचणीत आणू नका
शहरी नक्षलवादांच्या मार्गदर्शनानुसार उबाठा सेनेची लढाई ही अदानी साठी आहे. आमची लढाई धारावीतील गरिबांच्या घरासाठी आहे. धारावी पुनर्विकासाचा उपयोग करून तिथल्या रहिवाशांची माथी भडकवून, धारावीकरांचा उपयोग करून मुंबई व्होटजिहाद केला जातोय, असा गंभीर आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. धारावीबाबत आज पुन्हा …
Read More »राज्य सरकारकडून देशी गायीला गोमातेचा दर्जा मात्र मंदिराबाहेर जर्सी गायीला गोग्रास मंदिरांबाहेर गोग्रासाठी देशी गायींऐवजी ‘जर्सी प्राणी’ बांधून हिंदूंची दिशाभूल
महाराष्ट्र शासनाने गोमातेला अर्थात देशी गायींना ‘राज्यमाता’ म्हणून दर्जा दिला आहे. शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामध्ये ‘गोमाता’ म्हणजे ‘जर्सी गायी किंवा प्राणी’ नव्हेत, तर भारतातील ‘देशी’ गायी अपेक्षित आहेत. त्यामुळे राज्य शासनानेही ‘जर्सी’ प्राण्यांसाठी नव्हे, तर भारतातील देशी गायींच्याच पालन-पोषणासाठी अनुदान घोषित केले आहे. मुंबईत मात्र मंदिरांच्या बाहेर गोग्रासासाठी ‘देशी’ गायींऐवजी …
Read More »
Marathi e-Batmya