मुंबई

आयपीएलदरम्यान सुरक्षा शुल्क कमी करण्याचा निर्णय समर्थनीय कसा? उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा

राज्यातील आयपीएल सामन्यांसाठी उपलब्ध केलेल्या पोलीस सुरक्षेचे शुल्क कमी करण्याचा तसेच त्याबाबतचा निर्णय २०११ पासून पूर्वलक्ष्यी पद्धतीने लागू करण्याच्या निर्णयाचे समर्थन कसे केले जाऊ शकते?,अशी विचारणा मंगळवारी न्यायालयाने राज्य सरकारला केली. तसेच यासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसआय) आणि मुंबई क्रिकेट असोशिएशनला (एमसीए) प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचेही आदेश दिले. राज्यातील …

Read More »

निवडणूक काळात आयोगाकडून ५०० कोटींहून अधिक मालमत्ता जप्त वाहन तपासणीसाठी ६,००० पथके तैनात

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी राज्यभर स्थिर व भरारी सर्वेक्षण पथके तैनात केली आहेत. एकूण ६ हजार पथकांमार्फत वाहनांची तपासणी करून संशयास्पद वस्तू जप्त केल्या जात आहेत, ज्यात आतापर्यंत ५०० कोटी रुपयांहून अधिक बेकायदा मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. निवडणूक काळात लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेनुसार राजकीय पक्ष …

Read More »

ईडीची उच्च न्यायालयात धाव नवाब मलिक यांचा जामीन रद्द करा उच्च न्यायालयात याचिका; जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा दावा

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (अजित पवार) नवाब मलिक यांनी अंतरिम वैद्यकीय जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्या दावा करून त्यांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी करणारी याचिका मंगळवारी उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. अंतरिम जामिनाच्या रुपी मिळालेल्या स्वातंत्र्याचा मलिकांकडून गैरवापर सुरू असून निव़डणूक प्रचाराच्या निमित्ताने ते साक्षीदारांना प्रभावित करीत असल्याचा …

Read More »

निवडणूक कर्तव्य नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उगारला जाणार कारवाईचा बडगा कठोर शिस्तभंग कारवाईचा जिल्हाधिकारी ‍तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांचा इशारा

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठीची मतदान प्रक्रिया येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडणार आहे. ‍निवडणुकीचे काम हे राष्ट्रीय कर्तव्य असून ही मतदान प्रक्रिया पार पाडण्याकामी विविध शासकीय, निमशासकीय आस्थापनांतील अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु अनेकजण निवडणुकीचे काम नाकारण्यात धन्यता मानीत असल्याचे तसेच कामात टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास …

Read More »

मॅच फिक्सिंग चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध, उच्च न्यायालयात जनहित याचिका चित्रपटाला स्थगिती देण्याची मागणी

‘मॅच फिक्सिंग, द नेशन ॲट स्टेक’ या २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोटावर आधारित चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर मुस्लिम समाजाविरोधात नकारात्मकता पसरविण्याचे काम करीत असल्याचा आरोप याचिकेत केला आहे. तसेच, ट्रेलर पाहता त्यामध्ये मुस्लिम समुदाय भारताविरूद्ध द्वेष बाळगतो अशी खोटी आणि …

Read More »

मतदान केंद्रावर मोबाईल बंदीला उच्च न्यायालयात आव्हान निवडणूक आयोगाच्या नियमाच्या विरोधात मनसेकडून उच्च न्यायालयात याचिका

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यास बंदी घालणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने काढलेल्या अधिसुचनेला जनहित याचिकेतून आव्हान देण्यात आले आहे. लवकरच याचिकेवर सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे. मतदारांना मतदान केंद्रात मोबाइल फोन आणण्याची आणि डिजीलॉकर ॲपद्वारे ओळखपत्रे सादर करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, अदानीसाठी एअर इंडिया कॉलनी खाली करण्यासाठी नोटीस घरात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक असतानाही घरांना सील ठोकण्याचा भाजपा सरकारचा अमानवी प्रकार,

अदानीसाठी काहीही करण्यास तत्पर असणाऱ्या भाजपा युती सरकारने आता सर्व मर्यादा पार केल्या आहेत. एअर इंडिया कॉलनीत अनेक दशकांपासून रहात असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना घरे रिकामी करण्यासाठी अत्यंत अमानुष वागणूक दिली जात आहे. शासन व प्रशासनाने अदानींच्या लोकांना घरे खाली करण्यासाठी काहीही करु देण्याची सुट दिलेली असून फक्त ४८ तासात घर …

Read More »

९ आणि १० नोव्हेंबर रोजी ८५ वर्षांवरील वृद्ध आणि दिव्यांग मतदार घरुनच करणार मतदान तुळजापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाचा निर्णय

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीतही ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेले आणि दिव्यांग मतदार घरुनच मतदानाचा हक्क बजावणार आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील केंद्रस्तरीय मतदान अधिकारी यांनी गृहभेटी दरम्यान ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या ५८३ व ९३ दिव्यांग मतदारांनी घरातुन मतदानाचा पर्याय निवडला आहे. अशा एकूण ६७६ मतदारांचे मतदान आज ९ नोव्हेंबर …

Read More »

घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी? भाजपाचे राम कदम चौथ्यांदा गड राखणार?

विधानसभा निवडणुकीचे २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर याचा निकाल २३ नोव्हेंबरला लागणार आहे. त्यामुळं आता प्रचाराला खऱ्या अर्थाने रंग चढला असून, प्रचारात सत्ताधारी-विरोधकांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. दरम्यान, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा चर्चेतील आणि महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ मानला …

Read More »

उच्च न्यायालयाची केंद्रीय निवडणूक आयोगाला सुचना इच्छूक उमेदवारांना अर्ज भरण्याचे प्रशिक्षण द्या

आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास अनेक इच्छुक उमेदवारांचे अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडून फेटाळण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर, उमेदवारी अर्ज कसे भरावेत, याबाबत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण देण्याची गरज आहे, अशी सुचना उच्च न्यायलयाने केली. केंद्रीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) निवडणुकीचे नामांकन अर्ज कसे भरायचे याबद्दल इच्छूक उमेदवारांना प्रशिक्षण द्यावे, अर्ज कसा भरावा, त्याबाबत जागरूकता निर्माण …

Read More »