आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेनंतर अर्ज भरणाऱ्या राज्यातील विविध पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज कोणत्या कारणास्तव फेटाळले ?, अशी विचारणा उच्च न्यायालयाने सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (ईसीआय) केली. तसेच त्याबाबत मंगळवारी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा ३० ऑक्टोबर शेवटचा दिवस होता. …
Read More »मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात १०५ अंतिम उमेदवार तर उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघात ३१५ अंतिम उमेदवार
मुंबई शहर जिल्ह्यातील धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी आज उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर अंतिम १०५ उमेदवार आहेत, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी आज दिली. उमेदवारी अर्ज …
Read More »अपघातात जखमी झालेले नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचे निधन ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर नवाब मलिक यांच्यावर दुःखाचा डोंगर
यंदाची दिवाळीचा सण आणि विधानसभेच्या निवडणूका राष्ट्रवादी काँग्रेसचे मानखुर्द शिवाजीनगर मधील उमेदवार नवाब मलिक यांना काही धार्जिण होताना दिसत नाही. आधीच काही काळ भाजपाच्या आरोपामुळे तुरुंगवास भोगाव लागलेल्या नवाब मलिक यांना कसेतरी जामीन मिळाला. त्यास काही महिन्यांचा अवधी लोटत नाही तोच मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातील उमेदवारीला भाजपाने विरोध सुरु करण्यास सुरुवात …
Read More »निवडणूकीच्या खर्चाच्या अनुषंगाने उमेदवारांसाठी आयोगाने दिले हे आदेश विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च हिशोब तपासणीसाठी वेळापत्रक जाहीर
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उमेदवार, प्रतिनिधींनी वेळापत्रकानुसार विहित दिवशी व वेळेला उपस्थित राहण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहिम, वरळी …
Read More »अरविंद सावंत यांची अखेर शायना एन सी प्रकरणी जाहिर दिलगिरी; पण या नेत्यांची नावे घेतली शिवसेना शिंदे उमेदवार शायना एन सी यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर व्यक्त केली दिलगिरी
विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे अमिन पटेल यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असताना शिवसेना उबाठाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रसार माध्यमांच्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी अरविंद सावंत बोलताना हम इर्म्पोटेड माल का प्रचार नही करते हम ओरिजनल माल का प्रचार करते है असे वक्तव्य केले. वास्तविक पाहता …
Read More »मुंबई शहरातील दहा विधानसभा मतदारसंघांसाठी पोलीस आणि खर्च निवडणूक निरीक्षक नियुक्त निवडणूक अधिकाऱ्यांकडून या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
भारत निवडणूक आयोगामार्फत मुंबई शहर जिल्ह्यातील दहा मतदारसंघांसाठी सर्वसाधारण, पोलीस आणि खर्च निरीक्षक नियुक्त करण्यात आले असून हे सर्व निवडणूक निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांसाठी पाच सर्वसाधारण, दोन खर्च आणि एक पोलिस निवडणूक निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.धारावी व सायन कोळीवाडा या मतदार संघासाठी …
Read More »अरविंद सावंत यांच्या त्या वक्तव्याने शायना एन सी भडकल्या अमिन पटेल यांच्या प्रचारा दरम्यान माल शब्दाचा वापर केल्याने राजकारण पेटले
राज्यातील विधानसभा निवडणूकासाठीची उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख उलटून गेली. तसेच आता उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख ४ नोंव्हेबर आहे. मात्र दिवाळी सण आणि आजच्या लक्ष्मीपूजनाच्या निमित्त आपापल्या मतदारसंघातील मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आज भर दिला. महाविकास आघाडीचे उमेदवार अमिन पटेल यांच्या प्रचार रॅली दरम्यान त्यांच्यासोबत असलेले …
Read More »शिंदे गटाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका १९९५ च्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत अनियमितता केल्याचा याचिकेत आरोप
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अॅडजेस्टमेंट म्हणून भाजपाचे माजी नगरसेवक तथा विकासक मुरजी पाटील यांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. मात्र मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरताच झोपडपट्टी पुर्नवसन योजने अनियमितता आणि रहिवाशांची फसवणूक केल्याचा आरोप करत मुरजी पटेल यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. …
Read More »काँग्रेस नेते रवी राजा, शिवसेना उबाठाचे बाबू दरेकर यांचा भाजपा प्रवेश राज्यात भाजपाचेच सरकार येणार असल्याचा देवेंद्रे फडणवीस यांचा दावा
राज्यातील जनतेचा महायुतीवर पूर्ण विश्वास असल्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा येणार आणि महायुतीचा मुख्यमंत्री होणार असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला. मुंबई महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते, ज्येष्ठ काँग्रेस नेते रवी राजा, उबाठा चे उपविभागप्रमुख बाबू दरेकर यांनी त्यांच्या सहका-यांबरोबर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश …
Read More »श्रीनिवास वनगा यांचा ३६ तासानंतर केला कुटुंबियांशी संपर्क तिकीट कापण्यावरून नाराज वनगा गेले होते अज्ञातवासात
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पालघरचे शिवसेना आमदार श्रीनिवास वनगा, यांना ऐनवेळी पालघर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारली. त्यानंतर श्रीनिवास वनगा यांनी घात झाल्याची तक्रार करत पालघरमधील घरातून निघून जात बेपत्ता झाले. त्यानंतर बेपत्ता झालेले श्रीनिवास वनगा यांनी ३६ तासानंतर कुटुंबियांशी संपर्क साधल्याची माहिती येत आहे. आमदार श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी सुमन …
Read More »
Marathi e-Batmya