मुंबई

शिंदे गटाकडून अखेर डॉ श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के यांना लोकसभेची उमेदवारी जाहिर

कल्याणचे भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि तेथील स्थानिक शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख यांच्यात एका जमिनीवरून वाद निर्माण झाला आणि त्या वादाचे पर्यावसन थेट पोलिस ठाण्यात गोळीबार झाल्याच्या घटनेत झाले. त्यानंतर हा मतदारसंघ भाजपाकडून पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुत्राला सोडणार का अशी चर्चा सुरु असतानाच काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस म्हणाले, समृद्ध, बलशाली महाराष्ट्र घडवू या

उद्यमशील, पुरोगामी, व्यावहारिक आणि कठोर परिश्रम करणारे नागरिक ही महाराष्ट्राची मोठी शक्ती असून आपण सर्वांनी एकत्र येऊन समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवू या, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्यपालांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. …

Read More »

दक्षिण मुंबईत शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी

मुंबईतील असली नसली शिवसेनेवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने सातत्याने शिवसेना उबाठा गटावर आणि राष्ट्रवादी काँग्रस शरदचंद्र पवार यांच्यावर करण्यात येत आहे. तसेच सध्या लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील पक्षांकडून भाजपाला प्रखर विरोधाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शाह …

Read More »

अखेर उत्तर पश्चिम मुंबईतून रविंद्र वायकर यांची शिंदे गटाकडून उमेदवारी जाहिर

लोकसभा निवडणूकीच्या माध्यमातून अखेर खरी शिवसेना आणि नकली शिवसेना असा वाद भाजपाच्या नेत्यांनी राज्यात सुरु करू दिला. त्यातच यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातही याविषयीची याचिका प्रलंबित आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांनी या आधीच जाहिर केल्याप्रमाणे जनतेच्या दरबारात खरी शिवसेना कोणाची हे दिसून येईल असे यापूर्वीच जाहिर केले. त्यातच उद्धव ठाकरे यांचे विश्वासू …

Read More »

श्रद्धा वालकर घटनेची मुंबईत पुनरावृत्ती! निजामने केली पुनमची निघृण हत्या

मानखुर्द येथील साठेनगर परिसरात राहणाऱ्या पूनम क्षीरसागर नामक मातंग समाजातील तरुणीचा मृतदेह तुकडे करून एका सुटकेसमध्ये भरून निर्जनस्थळी ठेऊन देण्यात आला होता. निजाम नामक टॅक्सी ड्रायव्हर तिला १८ एप्रिलला पळवून घेऊन गेला आणि कल्याणमध्ये तिची हत्या केली. दोन दिवसांपूर्वी ही घटना उघडकीस आली. स्थानिकांमध्ये या घटनेविरुद्ध आक्रोश असून त्यासंदर्भात स्थानिकांनी …

Read More »

भारतीय राज्यघटना बदलली तर राष्ट्र कोलमडेल

देशातील अठरापगड जातधर्माचे १४० कोटी लोक राज्यघटनेमुळे एकत्र नांदत असून देश एकसंघ आहे. भारतीय राज्यघटना बदलली तर राष्ट्र कोलमडेल, असा गंभीर इशारा राजकीय विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी दिला. शुक्रवारी मंत्रालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन अनुसुचित जाती/ जमाती/ विमुक्त …

Read More »

मुंबईकरांनो २० मे रोजी कुठेही जाऊ नका, मनापासून मतदान करा

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघांसह मुंबई शहरातील सहाही मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या दिवशी मुंबईकरांनी मुंबईतच थांबून मनापासून मतदान करावे, असे आवाहन प्रसिद्ध गायक शान ऊर्फ शंतनु मुखर्जी यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जनजागृतीसाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे विविध उपक्रम …

Read More »

उत्तर मध्य मुंबईतून भाजपाकडून अॅड उज्वल निकम यांना उमेदवारी

नुकतीच मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार तथा विद्यमान मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांनी वर्षा गायकवाड यांना खासदार म्हणून लोकसभेत पाठविणार असल्याचा शब्द दिला. त्यानंतर भाजपानंतर या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. यापार्श्वभूमीवर भाजपाने आज …

Read More »

फुटपाथवर राहणाऱ्या बेघर लोकांचे अप्रतिम छायाचित्रण

आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांना कॅमेऱ्यातून फोटो क्लिक करताना पाहिले असेल, पण आम्ही तुम्हाला फूटपाथवर राहणाऱ्या अशा बेघर नागरिकांबद्दल सांगणार आहोत, ज्यांचे कॅमेऱ्यातून क्लिक केलेले १३ फोटो निवडले गेले आहेत आणि माय मुंबई कॅलेंडर २०२४ हे आकर्षक कॅलेंडर बनले आहे. असे म्हणता येईल की १३५० छायाचित्रांचा हा संग्रह मुंबईकडे केवळ त्याच्या …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा शब्द, वर्षा गायकवाड यांना खासदार बनवून दिल्लीला पाठवणार

देशात हुकूमशाही येता कामा नये, घटना बदलण्याचे काम केले जात आहे, त्याचे रक्षण करण्यासाठी ही लढाई असून महाविकास आघाडीचे राज्यात व देशात इंडिया आघाडीचे सरकार आले पाहिजे. वर्षाताई गायकवाड या मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत ते कुठूनही लढू शकतात, वर्षा गायकवाड यांना माझे मत मिळणार आहे, पंजाच्या हातात मशाल आहे …

Read More »