मुंबई

मुंबई काँग्रेसचे ९ मार्चला एकदिवसाचे शिबिर

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई काँग्रेस सज्ज असून पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करण्यासाठी उद्या दिनांक ९ मार्च रोजी म्हाडा कॉलनी, मुलुंड येथील आर. आर. सभागृहामध्ये एक दिवसाचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरीचे ऑनलाईन उद्घाटन काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे करणार आहेत. तसेच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, विधिमंडळ …

Read More »

कल्याण डोंबिवली २७ गावे, नवी मुंबई १४ गावांतील नागरिकांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील २७ गावातील नागरिकांना २०१७च्या दरानुसार कर भरण्यासंदर्भात दिलासा देतानाच १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. उल्हासनगर येथील अनधिकृत बांधकामे नियमाकुल करण्याबाबत येत्या मंत्रिमंडळात निर्णय घेण्याचे जाहीर करतानाच संत सावळाराम स्मारकासाठी जागा देण्याची कार्यवाही गतिमान करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. वर्षा …

Read More »

कोस्टल रोडच्या परिसरात जागतिक दर्जाचे पार्क उभे करणार

धर्मवीर संभाजी महाराज मुंबई सागरी रस्ता म्हणजेच मुंबई कोस्टल रोडच्या परिसरात ३२० एकर जागतिक दर्जाचे पार्क उभे केले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. सागरी किनारा रस्त्यासह मुख्यमंत्री शिंदे यांनी वरळी, दादर परिसरातील सिमेंट रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. पावसाळ्यापूर्वी ही सर्व कामे वेळेत पूर्ण व्हावीत, असे निर्देशही …

Read More »

मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा, महिलांच्या विकासाचे चौथे महिला धोरण जाहीर करणार

महिलांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय असलेले व या ध्येयासाठी आखण्यात आलेल्या योजनांच्या अंमलबजावणीवर भर देणारे राज्याचे चौथे महिला धोरण उद्याच्या महिला दिनी म्हणजेच ८ मार्च २०२४ रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले. महिला आर्थिक विकास मंडळ व युनायटेड नेशन्स वुमन्स यांच्या संयुक्त विद्यमाने …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, मुंबईकरांना आरोग्य उपचारावर खर्च करावा लागणार नाही

मुंबईतील वरळी भागातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी साडे अकराच्या सुमारास अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी दवाखान्याची पाहणी करतानाच तपासणीसाठी आलेल्या रुग्णांशी देखील त्यांनी संवाद साधला. मुंबईकरांच्या आरोग्य उपचारावरील खर्च कमी करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आरोग्य आपल्या दारी मोहीम सुरू करण्यात आली असून या …

Read More »

काजू परिषद संचालक मंडळाची बैठक संपन्न

महाराष्ट्र राज्य काजू परिषद संचालक मंडळाची बैठक पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. यावेळी काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी काजू परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक विनायक कोकरे, काजू प्रक्रिया उद्योजक, काजू उत्पादक शेतकरी प्रतिनिधी, कृषी विद्यापीठातील काजू …

Read More »

संकेत भोसलेला न्याय द्या, राजभवनचा मार्ग रोखला

भिवंडी येथील संकेत भोसले हत्याकांडप्रकरणी भोसले कुटुंबीयांना न्याय द्यावा यासाठी घाटकोपर रमाबाई कॉलनी ते राजभवन असा पायी मोर्चा पोलिसांनी रोखल्याने भीम आर्मी सह आंबेडकरी जनतेने डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर तीव्र आंदोलन करीत सरकारचा निषेध केला. येत्या दोन दिवसात राज्यपाल यांची भेट घालून देण्यात येईल असे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर हे आंदोलन …

Read More »

रेशन दुकानांमध्ये फोर-जी ई-पॉस मशिन व IRIS स्कॅनची सोय

रेशन दुकानांमध्ये आता 4-जी ई-पॉस मशिन व IRIS स्कॅनची सोय करण्याचा निर्णय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना याचा फायदा होणार असून त्यामुळे नागरिकांना प्रतिक्षा करावी लागणार नाही. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम या योजनेतील अपात्र लाभार्थ्याचा शोध घेऊन धान्याचा होणारा अपहार/गैरव्यवहार थांबविण्यासाठी, …

Read More »

जी एन साईबाबा यांना निर्दोष सोडताच महाराष्ट्र सरकार पुन्हा सर्वोच्च न्यायालयात

दिल्लीतील जेएनयु विद्यापीठातील प्राध्यापक जीएन साईबाबांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर काही तासांतच, महाराष्ट्र राज्याने मंगळवारी (५ मार्च) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकत्याच दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक आणि मानवाधिकार कार्यकर्ते यांना मोठा दिलासा देताना, उच्च न्यायालयाने आज माओवादी-संबंधांच्या कथित प्रकरणात बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत त्यांची …

Read More »

राष्ट्रीय लोक अदालतीत राज्यातील १२ लक्ष ४५ हजार प्रकरणे निकाली

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाद्वारे आयोजित या वर्षातील पहिल्याच राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये १२ लक्ष ४५ हजार २०२ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात १० लक्ष ८३ हजार ९७१ वाद दाखलपूर्व प्रकरणे, एक लक्ष ११ हजार ३५२ प्रलंबित प्रकरणे आणि विशेष बैठकीमध्ये ४९ हजार ८७९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. विशेष म्हणजे या …

Read More »