एलिफंटाजवळ प्रवाशी बोट बुडालीः पण २१ जणांना वाचविण्यात यश एकाचा मृत्यू

बुधवारी संध्याकाळी ३० ते ३५ प्रवाशांना घेऊन एक बोट निघाली होती. मात्र ती एलिफंटा गुफेजवळ येताच ती बुडायला लागली. या बोटीवरील एकूण प्रवाशांपैकी २१ प्रवाशांना वाचविण्यात यश आले असून एकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच नौदल आणि मुंबई पोलिसांकडून प्रवाशांना वाचविण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे.

एलिफंटा गुफा पाहण्यासाठी अनेक पर्यटक मुंबईत येत असतात. या पर्यटक प्रवाशांना घेऊन जाणारी नीलकमल नावाची फेरी बोट प्रवाशांना घेऊन निघाल्यानंतर उरण-कारंजा येथे बुडाल्याचे सांगण्यात येत आहे. या बोटीवर ३० ते ३५ प्रवाशी असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रवाशांना वाचविण्यासाठी नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल व येलो पोलिस ठाण्यातील पोलिस दल आणि स्थानिक मच्छिमार बोटींच्या मदतीने प्रवाशांना वाचविण्याचे प्रयत्न सुरु आहे. याशिवाय घटनास्थळी रूग्णवाहिकाही तैनात करण्यात आली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सागरी सुरक्षा मंडळाचे अधिकारीही घटनास्थळी पोहचले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

About Editor

Check Also

कल्याण जवळ झालेल्या अपघाताबाबत मंत्री प्रताप सरनाईक यांचे संवेदनशील निवेदन कमी क्षमतेच्या वाहनात जास्तीचे प्रवाशी, ११ प्रवाशांचा मृत्यू

आज १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे १०:४५ वाजण्याच्या सुमारास कल्याण–मुरबाड–माळशेज महामार्गावर रायते गावाच्या हद्दीत, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *