पुणे: प्रतिनिधी पुण्यातील रिंगरोडचे काम हाती घेण्याचा प्रस्ताव होता. त्यासाठी आम्ही जमिन अधिग्रहणाच्या अनुषंगाने या संबधीची विचारणा आम्ही शेतकऱ्यांकडे केली. शेतकऱ्यांनीही जमिनी द्यायची तयारी दर्शविली. मात्र त्याची किंमत जास्त सांगितली. त्यामुळे फक्त जमिन अधिग्रहणाच्या कामाची किंमत १८ हजार कोटी रूपयांवर जात असल्याने आमच्या अधिकाऱ्यांनी हे काम करू शकत नसल्याचे स्पष्ट …
Read More »पुणे-कोल्हापूर-सोलापूर-अ.नगर दरम्यान मेट्रो तर नरिमन पाँईट दिल्ली १२ तासात ४० हजार कोटीं रूपयांच्या प्रकल्पाची केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री गडकरी यांची घोषणा
पुणे: प्रतिनिधी आता पुणे फारच कंन्झेसटेड झालेले आहे. त्यामुळे नवं पुणे वसविण्याची गरज निर्माण झाली असून त्यादृष्टीने नव्याने जमिन पाहुन त्या ठिकाणी वाढीव पुणे स्थापन करणे गरजेचे आहे. तसेच सध्याच्या पुण्याला कोल्हापूर आणि सोलापूर व अहमदनगरला जलदगतीने जोडण्यासाठी एसटीच्या दरात मेट्रो सेवा सुरु करण्याची योजना असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते महामार्ग …
Read More »राज्यपालांच्या सहीने आनंद तर केंद्राच्या भूमिकेने नुकसान आम्ही आमची न्यायालयीन आणि राजकीय लढाई सुरुच ठेवू-भुजबळ
नाशिकः प्रतिनिधी आज सर्वोच्च न्यायालयात केंद्रसरकारने इंपिरिकल डाटा देण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणीसाठी आता चार आठवड्याची वेळ दिली आहे. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नात हात वर करण्याचं काम केंद्राने केले आहे. केंद्राने इंपिरिकल डाटा दिल्यास सर्वच प्रश्न मार्गी लागू शकतात, मात्र केंद्राची नकारात्मक भूमिका ओबीसींना अडचणीत आणणारी असल्याचे …
Read More »आम्ही संघर्ष करणारे आहोत, सौदेबाजी करणारे नाही राज्यात घटना घडल्यावर अन्य राज्यांकडे बोट दाखविणे, ही असंवेदनशीलता -फडणवीस
नागपूरः प्रतिनिधी महाराष्ट्रात एखादी घटना घडली की, अन्य राज्यांकडे बोट दाखविणे किंवा विपरित प्रतिक्रिया देणे, ही पूर्णपणे असंवेदनशीलता आहे. डोंबिवलीतील आजची घटनेमुळे तर महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच राज्यसभा पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर …
Read More »सर्व निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरताना जातवैधता प्रमाणपत्र बंधनकारक वेळीच प्राप्त करून घ्यावे- राज्य निवडणूक आयुक्त मदान यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यात पुढीलवर्षी २०२२ मध्ये होणाऱ्या सर्व महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, नगर परिषदा, ग्रामपंचायती, पंचायत समितीच्या निवडणूकांसाठी आता उमेदवारी अर्ज सादर करतानाच संबधित उमेदवारांने जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यु पी एस मदान यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुका …
Read More »सहकारी संस्थांच्या बैठक मुदतवाढीसह हे प्रमुख निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतले ओबीसींच्या अध्यादेशाचा प्रस्ताव पुन्हा पाठविणार
मुंबई: प्रतिनिधी ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणासंबधी काढवयाच्या अध्यादेशाचा प्रस्ताव पुन्हा राज्य सरकारकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठविण्यात येणार असून त्याविषयीच्या सुधारीत प्रस्तावास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेत सहकारी संस्थांच्या बैठकीस मुदतवाढ देण्यासंदर्भातही निर्णय घेण्यात आला. याविषयीची सविस्तर निर्णयांची माहिती खालील प्रमाणे… नागरी स्थानिक संस्थामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठीचे आरक्षण २७ टक्क्यांपर्यंत ठेवण्यासाठी …
Read More »अल्पसंख्याक उमेदवारांना मिळणार भरतीपूर्व निवासी पोलिस प्रशिक्षण राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी अल्पसंख्याक उमेदवारांना निवासी पोलीस शिपाई भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण देण्यासाठी योजनेत बदल करून प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. योजनेच्या निकष व स्वरुपात आणि अटी व शर्तीमध्ये बदल करुन तीन महिन्यांच्या कालावधीचे निवासी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्याबाबतची योजना …
Read More »सरकारचा निर्णय मुंबई सोडून इतरत्र बहुसदस्यीय प्रभाग : मान्यता मात्र राज्यपालांच्या हाती महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यासाठी अध्यादेश काढणार
मुंबई: प्रतिनिधी आगामी वर्षात मुंबईसह १३ शहरातील महापालिका, नगरपंचायती निवडणूका नजरेसमोर ठेवून राज्य सरकारने आज मोठा निर्णय घेत मुंबई वगळता सर्वच महापालिका, नगर पंचायतींमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पध्दत लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच यासंदर्भात अध्यादेश काढण्यात येणार असून …
Read More »महिलांप्रश्नी आता भाजपाच्या महिला आमदारांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र केंद्राकडे बोट दाखवून जबाबदारी झटकता येणार नसल्याचा इशारा
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नांवरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहित विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली. परंतु मुख्यमंत्री ठाकरे यांनी याच प्रश्नी दिल्लीसह भाजपाशासित राज्यांमध्ये महिलांवरील घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने संसदेचे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह …
Read More »महिला अत्याचांरामध्ये भाजपाशासित राज्येच आघाडीवर फडणवीस सरकारच महिलांसाठी कर्दनकाळ ठरले-सचिन सावंत
मुंबई: प्रतिनिधी महिला अत्याचारांमध्ये भाजपाशासित उत्तर प्रदेश आघाडीवर असल्याचे आत्ताच घोषित झालेल्या NCRB २०२० च्या आकडेवारीनुसार स्पष्ट दिसत आहे. तर मविआ सरकारच्या काळात मात्र महाराष्ट्रील महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे भाजपाच्या राज्यांतील महिला अत्याचारांवरील चर्चेसाठी संसदेचे विशेष अधिवेशन घ्यावे या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मागणीला तेथील महिलांचीही …
Read More »
Marathi e-Batmya