राजकारण

…विलंब लावणं हे ज्येष्ठ व आदर्श राज्यपालांना कितपत मान्य आहे ? राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा टोला

सातारा : प्रतिनिधी विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत वेळोवेळी राज्य सरकारने राज्यपालांना आठवण करून दिली. त्यामुळे नियुक्तीला विलंब लावणं हे ज्येष्ठ व आदर्श राज्यपालांना कितपत मान्य आहे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला. सातारा येथे पत्रकारांनी १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत प्रश्न केला असता जयंत पाटील यांनी …

Read More »

मुख्यमंत्र्यांचे निर्देश: ३ री लाट आली तरी उद्योग, अर्थचक्र, जीवनचक्राची गती कायम ठेवा उद्योगक्षेत्र सुरळित सुरु राहील याचे काटेकोर नियोजन करा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील उद्योजकांशी संवाद साधून कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेतही उद्योग सुरु राहतील यादृष्टीने काटेकोर नियोजन करावे, त्याचा एक परिपूर्ण आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कामगारांची राहण्याची व्यवस्था त्यांच्या उद्योगाच्या आवारात करण्याची तयारी पूर्ण करावी व ज्यांना हे …

Read More »

लोणकर कुटुंबियांची भेट घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले हे आश्वासन स्वप्नीलच्या बहिणीला सक्षम करण्यासाठी कार्यवाहीचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी एमपीएससी परिक्षा, कोरोनामुळे सतत होणारा लॉकडाऊन आणि त्यामुळे सर्व गोष्टी ढकलण्यात येत असलेले कामकाज यापार्श्वभूमीवर आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांची भेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भेट घेत  ‘आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत..काळजी करू नका,’अशा शब्दांत स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांना धीर दिला. वास्तविक पाहता लोणकर कुटुंबियांची भेट …

Read More »

कंपन्यांच्यांमदतीने आयटीआयच्या १० हजार विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दहा जिल्ह्यांमधील १२६ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) शिकणाऱ्या साधारणतः १० हजार प्रशिक्षणार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग उपलब्ध होणार आहे. यासाठी जर्मन ड्यूएल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग या मॉडेल अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असून याकरीता राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत व्यवसाय शिक्षण …

Read More »

राजकिय सभांवरून मुख्यमंत्री ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना दिला हा उपरोधिक सल्ला राजकीय कार्यक्रम, आंदोलने तसेच धार्मिक कारणांमुळे होणारी गर्दी थांबविण्यासाठी राष्ट्रीयस्तरावर व्यापक धोरणाची गरज

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी पश्चिम बंगालमध्ये घेतलेल्या लाखोंच्या सभा त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश सरकारच्या विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी झालेली हजारो नागरीकांच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा झाली. तसेच …

Read More »

शिक्षणसम्राट मंत्र्यांनी फी सवलतीचा निर्णय हाणून पाडल्यानंतरही मुख्यमंत्री मूग गिळून बसले भाजपा आ. अतुल भातखळकर यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय कालच्या कॅबिनेट मध्ये घेऊन त्याचा अध्यादेश काढू अशी घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मागील आठवड्यात केली खरी, परंतु महाविकास आघाडी सरकारमधील शिक्षण सम्राट मंत्र्यांनी त्याला विरोध करत हा निर्णय हाणून पाडला व सवयीप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री यावर सुद्धा मूग गिळून गप्प …

Read More »

शालेय शिक्षण मंत्र्यांची घोषणाः १० चा निकाल उद्या जाहीर होणार १६ लाख विद्यार्थ्यांचा निकाल दुपारी १ वाजता जाहिर होणार

मुंबईः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १० वी ची परिक्षा रद्द करत या सर्व विद्यार्थ्यांचे मुल्यांकन करून त्यानुसार मार्क देत त्यांचा निकाल जाहीर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार १० वी विद्यार्थ्यांच्या मुल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून उद्या १६ जुलै रोजी निकाल जाहिर करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा …

Read More »

मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसने सायकल प्रवास करत राज्यपालांना दिले निवेदन इंधनावरील करातून जनतेची राजरोस लूट !: नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी केंद्रातील भाजपाचे मोदी सरकार इंधन, गॅस, खाद्यतेल डाळींची महागाई करून जनतेला आर्थिक कमजोर करत आहे. कोरोनामुळे लोकांची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली असताना महागाईच्या ओझ्याखाली गोरगरिब, मध्यमवर्ग, नोकरदारही पिचला गेला आहे. इंधनावरील कराच्या रुपाने केंद्र सरकार आपली झोळी भरत असून दररोजच्या महागाईने जनतेचे मात्र कंबरडे मोडले असून मोदी सरकार …

Read More »

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, कोरोनामुळे सर्व निर्बंध जैसे थे नियमात शिथिलता नाहीच

मुंबईः प्रतिनिधी देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनने दिला. देशाच्या तुलनेत राज्यात रुग्णवाढीचा दर कमी असला तरी करोनाचा धोका पाहता राज्यात कोरोना रोखण्यासाठीच्या नियमांमध्ये कोणतीही सूट दिली जाणार नसून सध्या लागून असलेले निर्बंध यापुढेही कायम लागू राहतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. …

Read More »

राज्य सरकारच्या सर्व महामंडळे, प्राधिकरणांना या महिन्यापासून ७ वेतन आयोग लागू १ जुलै २०२१ पासून मिळणार सुधारीत वेतनश्रेणी मिळणार

मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकारची अंगीकृत सार्वजनिक उपक्रमांतर्गत असलेली सर्व महामंडळे, प्राधिकरातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लवकरच लागू करण्यात येणार असून त्यासाठी निकष ठरविण्याच्या कामाला आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर हे निकष तयार करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर १ जुलै २०२१ पासून त्याची अंमलबजावणीस सुरुवात होणार आहे. …

Read More »