मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला आहे. शिवसेना सरकारला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देण्याची प्राथमिक तयारी झालेली असून अंतिम बैठकीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे लवकरच काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी नवी दिल्लीला जाणार असल्याचे शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. राज्याच्या सत्ताकारणापासून भाजपाला दूर ठेवण्यासाठी शिवसेनेच्या …
Read More »सर्वोच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करून सीबीआय मार्फत चौकशीचे दिले आदेश काँग्रेस नेते आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा माहिती
मुंबई: प्रतिनिधी राफेल प्रकरणात यशवंत सिन्हा, प्रशांत भूषण आणि अरुण शौरी या नेत्यांनी दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने काल फेटाळून लावली असून त्यासंदर्भात पूर्ण निकालाचे वाचन न करता मोदी सरकारला पुन्हा एकदा क्लीन चीट दिल्याचे चित्र उभा केले जात आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे तपशिलात जाऊन वाचन केल्यास मोदी …
Read More »सर्वाधिक जागा आणि मते भाजपाला तर दुसऱ्या नंबरवर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीत सर्वात जास्त अर्थात १ कोटी ४२ लाख मते भाजपाला मिळाली आहेत. तर सर्वात जास्त १०५ आमदार निवडूण आले असून १४ अपक्ष आमदारांनी भाजपाला पाठिंबा दिला असल्याने ११९ आमदारांच्याशिवाय राज्यात सरकार स्थापन होवू शकत नसल्याचे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. तसेच राज्यात भाजपानंतर सर्वात …
Read More »पंचतारांकित हॉटेलमध्ये काँग्रेसची शिवसेनेबरोबर सदिच्छा भेट उध्दव ठाकरेंच्या भेटीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात, चव्हाण, ठाकरे आदी नेते
मुंबईः प्रतिनिधी शिकाँरा महाआघाडीच्यावतीने राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. विशेषतः मंगळवारी काँग्रेस नेते अहमद पटेल आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद झाल्यानंतर आज बुधवारी शिवसेनेशी पुढील चर्चा करण्यासाठी नरिमन पाँईट येथील हॉटेल ट्रायडंट येथे जावून काँग्रेस नेत्यांनी उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. तब्बल दोन …
Read More »सामायिक कार्यक्रम ठरविण्यासाठी राष्ट्रवादीच्या ५ नेत्यांची समिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत निर्णय
मुंबईः प्रतिनिधी राज्यात शिकाँरा अर्थात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसबरोबरील सामायिक कार्यक्रम ठरविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाच जणांची समिती स्थापन करण्यात आली. या समितीत अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि प्रवक्ते नवाब मलिक यांचा समावेश आहे. नरिमन पाँईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज राष्ट्रवादी …
Read More »राष्ट्रवादीची वेळ पूर्ण होण्याआधीच राज्यपालांकडून राष्ट्रपती राजवटीची शिफारस राजवटीवर राष्ट्रपती आणि केंद्रीय गृह मंत्रालयाकडून शिक्कामोर्तब
मुंबईः प्रतिनिधी दिलेल्या मुदतीत राज्यातील सत्ता स्थापनेच्यासंदर्भात शिवसेनेकडून मागण्यात आलेल्या वाढीव मुदतीस नकार देत राज्यपाल कोश्यारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी दावा करण्यासंदर्भात बोलाविले. त्यानुसार आज रात्रो ८.३० वाजेपर्यंतची मुदत राज्यपालांनी राष्ट्रवादींला दिली. मात्र ही मुदत पूर्ण होण्याआधीच राज्यपालांनी ३५६ कलमान्वये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात केंद्राला शिफारस केली. राज्यात …
Read More »शिकाँरासाठी अखेर काँग्रेस नेते पटेल, वेणूगोपाल पोहोचले शरद पवारांकडे शिवसेनेशी नंतर चर्चा करणार असल्याची माहिती
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील शिकाँरा अर्थात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना उशीराने का होईना वेग आला आले. कालपासून सुरु असलेला बैठकींचा सिलसिला आजही काँग्रेसकडून सुरु असून शरद पवारांशी अंतिम बैठक करण्यासाठी काँग्रेस नेते अहमद पटेल. मल्लिकार्जून खर्गे आणि वेणूगोपाल राव हे यशवंतराव प्रतिष्ठान येथे संध्याकाळी …
Read More »शिवसेनेकडून सत्ता स्थापनेचा दावा..मात्र काँ.रा.कडून पाठिंब्याचे अधिकृत पत्र नाही शिवसेना नेते आदीत्य ठाकरे यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सत्ता स्थापनेचा घोळ सुटण्याची शक्यता दिसत असताना शिवसेनेच्या सत्ता स्थापनेचा दाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप पाठिंब्याचे पत्र दिले नाही. त्यामुळे राज्यातील सत्ता स्थापनेचा आणखी काही दिवस चालण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, राज्यात सत्ता स्थापन करण्याचा दावा राज्यपालांकडे करण्यात आला असून आणखी दोन दिवसाचा अवधी देण्यास राज्यपालांनी नकार …
Read More »शि.रा.ला अखेर काँग्रेसकडून बाहेरून पाठिंबा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचा निर्णय
नवी दिल्ली-मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सत्ता स्थापनेचा अखेर घोळ संपुष्टात आला असून काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबधीची माहिती काँग्रेसकडून शिवसेनेला कळविण्यात आल्याचे १० जनपथवरील सुत्रांनी दिली. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा या प्रमुख मुद्यावरून भाजपाबरोबर सवता सुभा मांडला होता. शिवसेनेला सरकार स्थापन …
Read More »शि-काँ-रा महाआघाडीसाठी उध्दव -पवार भेट अंतिम बोलणीसाठी वांद्रे येथील ताज हॉटेलामध्ये गुप्तगू
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून घडामोडींना मोठा वेग आला आहे. एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्यानंतर लगेच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी वांद्रे येथील ताज हॉटेल मध्ये भेटले असून त्यांच्यात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसंदर्भात भेट सुरु आहे. …
Read More »
Marathi e-Batmya