राजकारण

घोड अडलं, भाजपाच्या उमेदवारासाठी शिवसेनेचं तिकिट विधानसभेतही राहणार लोकसभेचा पॅटर्न

मुंबईः प्रतिनिधी राज्यात विधानसभा निवडणूकीसाठी भाजपा-शिवसेनेतील युतीला कधीचा मुहूर्त लागणार याची उस्तुकता लागलेली आहे. मात्र लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणूकीतही भाजपाचे अनेक उमेदवार शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यास उभे करायचे अशी रणनीती भाजपाने आखल्याने शिवसेनेची अडचण झाली आहे. त्यामुळे युतीच्या घोषणेला मुहूर्त मिळत नसल्याची विश्वसनीय माहिती भाजपातील सूत्रांनी दिली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत …

Read More »

अखेर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठीची अधिसूचना जाहीर १५ हजार अतिरिक्त मनुष्यबळ व यंत्रणा पुरविण्याची अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाने सातारा लोकसभा मतदारसंघातील जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम आज सकाळी जाहीर केला. या निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून १५ हजार अतिरिक्त मनुष्यबळ व अतिरिक्त मतदान यंत्रे उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. भारत निवडणूक …

Read More »

शिवस्मारक उभारता न आल्याचे विरोधकांना शल्य प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी पंधरा वर्ष राज्य करण्याची संधी मिळून सुद्धा अरबी समुद्रात शिवस्मारक उभारता न आल्याचे शल्य तर विरोधकांच्या मनात आहेच. पण, आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचे मोठ्या प्रमाणात भाजपाकडे वळणे, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या फारच जिव्हारी लागल्यासारखे दिसते आहे, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. मुळात अभ्यास न करता पत्रपरिषदा घेणे, …

Read More »

भ्रष्ट आणि लज्जाहीन भाजपा शिवसेना सरकारचा शिवस्मारकातही भ्रष्टाचार! न्यायालयीन चौकशी करण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची संयुक्त मागणी

मुंबईः प्रतिनिधी शिवछत्रपतींचा आर्शिवाद, चला देऊ मोदींना साथ अशा घोषणा देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने शिवाजी महाराजांना देखील सोडले नाही. राज्यातील २१ मंत्र्याचे भ्रष्टाचार पुराव्यानिशी समोर आल्यावर क्लीन चीट चे वाटप करत स्वतः च्या प्रतिमेवर कोणताही डाग नाही असे म्हणणा-या भ्रष्ट आणि लज्जाहीन भाजप सरकारने शिवस्मारकातही भ्रष्टाचार करण्याचे पाप केल्याचा …

Read More »

२२० पेक्षा अधिक जागा मिळणार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा विश्वास

मुंबईः प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे भाजप महायुती २२० पेक्षा अधिक जागा जिंकेल असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला राज्याच्या प्रभारी आणि राष्ट्रीय महामंत्री …

Read More »

मुख्यमंत्र्यांमुळेच पोलिसांची पगार खाती अ‍ॅक्सिस बँकेकडे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जाण्याची काँग्रेस नेते नाना पटोले यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी पोलिसांची पगाराची खाती अ‍ॅक्सिस बँकेकडे वर्ग करताना मुख्यमंत्र्यांनी पदाचा दुरुपयोग केला असून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रचार समितीचे अध्यक्ष माजी खा. नाना पटोले यांनी केली. गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पोलिसांची पगाराची खाती अ‍ॅक्सिस …

Read More »

पेट्रोल पंपांवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फलक काढा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाल्याने विविध राजकीय पक्षांचे फलक प्रशासनाकडून काढण्यात येत आहेत. विरोधी पक्षांच्या फलका प्रमाणेच राज्यभरातील पेट्रोलपंपावर लावलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फलक तसेच इतर सरकारी जाहिरातींचे फलक तात्काळ काढावेत अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेश कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक …

Read More »

आरेतील कारशेडची जागा बदल्यास मेट्रोचे तिकिट महागणार भाजपा-शिवसेना युतीची घोषणा लवकरच -मुख्यमंत्री फडणवीस

मुंबईः प्रतिनिधी मुंबईत मेट्रोच्या कारशेडसाठी आरेमधील काही जागा वापरण्यावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एका पर्यायी जागेचा आग्रह धरला जात आहे. पण ती पर्यायी जागा मेट्रो कारशेडसाठी घ्यायची तर त्यासाठी पाच हजार कोटी रुपये द्यावे लागतील, परिणामी मेट्रोची आर्थिक व्यवहार्यता धोक्यात येईल आणि मेट्रोचे तिकिट मोठ्या प्रमाणावर वाढवावे लागेल अशी …

Read More »

काँग्रेस आणि राष्ट्रवादी २५० जागा लढविणार तर ३८ जागा मित्रपक्षांना आघाडीचा संयुक्त जाहिरनामा जाहीर करणार - प्रवक्ते नवाब मलिक

मुंबईः प्रतिनिधी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे जागा वाटप पूर्ण झालेले असून काँग्रेस १२५ आणि राष्ट्रवादी १२५ जागा लढविणार असून उर्वरीत ३८ जागा मित्रपक्षांसाठी सोडणार असल्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देत आघाडीचा संयुक्त जाहिरनामा लवकरच प्रसिद्ध केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार …

Read More »

२४ ऑक्टोबरला महाराष्ट्रात परिवर्तन झालेले असेल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आशावाद

मुंबईः प्रतिनिधी गेल्या सहा महिन्यात आर्थिक मंदीचे संकट वाढले आहे. बेरोजगारी वाढली आहे, शेतकरी अडचणीत आले आहेत. आत्महत्या वाढल्या आहेत. एकंदरीत जनता हे सरकार बदलले पाहिजे, परिवर्तन झाले पाहिजे या मानसिकतेत आहे. त्यामुळे या निवडणुकीत २४ तारखेला निकाल येईल त्यावेळी महाराष्ट्रात परिवर्तन निश्चित होणार आहे असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे …

Read More »