राजकारण

निसर्ग चक्रीवादळाचा महावितरणला मोठा फटका वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युध्दस्तरावर सुरू असल्याची ऊर्जामंत्री राऊत यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी जोरदार वादळी वा-यासह आलेल्या निसर्ग चक्री वादळाचा महावितरणला मोठा फटका बसला आहे. चक्रीवादळाच्या रौद्ररूपामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्या व विजेचे खांब कोसळ्ले असून वीजपुरवठा रवंडित झाला आहे. चक्रीवादळाची तीव्रता कमी होताच महावितरणने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युध्दस्तरावर सुरू केले आहे. निसर्ग चक्रीवादळाचे रौद्ररूप बघता महावितरणचे किती नुकसान …

Read More »

७३४ रिक्त पदे भरा, अन्यथा प्रशासनाने कामाची अपेक्षा करू नये शिधावाटप कर्मचारी संघटनेचा सरकारला इशारा

मुंबई: प्रतिनिधी सध्या राज्यभर कोरोना विषाणूने थैमान घातलेले असून मुंबई/ठाणे विभागात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. अशा परिस्थितीत अन्न, नागरी पुरवठा विभागाअंतर्गत येणा-या नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांचे आस्थापनेवरील शिधावाटप कर्मचारी/अधिकारी हे बदलापूर, कल्याण, विरार, पनवेल अशा अनेक दूरवरच्या ठिकाणावरून प्रवास करून …

Read More »

५३ हजार आदिवासी विद्यार्थ्यांचे इंग्रजी माध्यमाचे शिक्षण सुरूच राहणार नामांकित शाळेतील प्रवेशाची योजना बंद नव्हे तर तात्पुरती स्थगिती दिल्याची आदीवासी मंत्र्यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोवीड 19 च्या साथरोगामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे व आर्थिक काटकसरीच्या धोरणामुळे आदिवासी समाजातील मुलांसाठी नामांकित इंग्रजी शाळेतील प्रवेशास आदिवासी विभागाने तात्पुरती स्थगिती दिली असली तरी या मुलांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना आदिवासी विभागाच्या इतर इंग्रजी माध्यमाच्या …

Read More »

विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचाय, १२ तासासाठी टीव्ही तर २ तासासाठी रेडिओ द्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे केंद्राला पत्र

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष अथवा ऑनलाईन शाळा सुरु होण्यापेक्षा विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आग्रही भूमिका घेतलेली आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी केंद्र सरकारच्या मालकीच्या दूरदर्शनच्या दोन चॅनेलवरवरील १२ तास आणि आकाशवाणी रेडियोवरील २ तासाचा वेळ शिक्षण देण्यासाठी द्यावा अशी शालेय …

Read More »

ATKT असलेल्या ४० टक्के विद्यार्थ्यांना नापास करणार का? पदवी अंतिम वर्षे विद्यार्थ्यांच्या प्रश्नी भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई: प्रतिनिधी आम्हाला “कोरोना ग्रॅज्युएट” तर संबोधले जाणार नाही ना? आम्हाला अशा नव्या बिरुदावलीने तर ओळखले जाणार नाही ना? ATKT असलेल्या ४०% विद्यार्थ्यांना नापास करणार का? पदवी अंतिम वर्षे विद्यार्थ्यांच्या मनात भयगंड निर्माण केलेल्या अशा प्रश्नांकडे लक्ष वेधीत भाजपा नेते, माजी शिक्षणमंत्री आमदार अँड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आरोग्य-शिक्षणाला प्राधान्य देत मिशन बिगीन अगेन तीन टप्यातील अनलॉकमधील जीवनाला सुरुवात

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ६५ हजाराच्या घरात पोहोचली आहे. मात्र यापैकी २८ हजार रूग्ण बरे होवून घरी गेले. तर ३४ हजार अॅक्टीव्ह केसेस असून यातील २४ हजार रूग्णांना लक्षणेच नाहीत. तर ८ ते ९ हजार ५०० रूग्णांपैकी १२०० रूग्ण गंभीर आहेत. तर २०० रूग्ण व्हेंटीलेटरवर असल्याची माहिती मुख्यमंत्री उध्दव …

Read More »

प्रत्यक्ष अन्यथा ऑनलाईन शाळा जूनमध्येच सुरु झाल्या पाहिजे मुख्यमंत्र उध्दव ठाकरे यांचे शिक्षण विभागाला आदेश

मुंबई : प्रतिनिधी जूनमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपले शालेय वर्ष सुरू झालेच पाहिजे. आरोग्याची काळजी घेऊन जिथे शाळा सुरू करता येणे शक्य आहे, तिथे त्या सुरू करणे तसेच जिथे ऑनलाईन शक्य आहे तिथे त्या पद्धतीने का होईना पण शिक्षण सुरू झाले पाहिजे अशी आग्रही भूमिका मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज झालेल्या …

Read More »

राज्य सरकारकडूनही तीन टप्प्यातील अनलॉक जाहीर : ३ जूनपासून सुरू होणार मुंबई-पुणेतील परिस्थिती लक्षात घेवून केंद्राचे नियम बदलले

मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारने काल तीन टप्प्यातील अनलॉकची मार्गदर्शक तत्वे जाहीर केल्यानंतर आज राज्य सरकारकडूनही अनलॉकबाबतची नियमावली जाहीर केली. त्यानुसार केंद्राने जाहीर केल्याप्रमाणे रात्रो ९ ते पहाटे ५ पर्यत कर्फ्यु कायम राहणार आहे. मात्र मुंबई, पुणे येथील वाढती चिंताजनक परिस्थिती पाहता केंद्रांच्या काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. केंद्राने जारी …

Read More »

राज्यातील सर्व कार्यालये सुरु होणार पण या नियमांचे पालन करायचेय आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर

मुंबई: विशेष प्रतिनिधी दोन महिन्याच्या दिर्घ लॉकडाऊनची सुट्टीचा आनंद घेतल्यानंतर राज्यातील सर्व शासकिय, निमशासकिय, महानगरपालिका, नगरपालिका, हॉस्पीटल्सची कार्यालये आणि जिल्हाधिकारी कार्यालये टप्याटप्याने सुरु करण्यात येणार आहेत. ही कार्यालये जरी सुरु होणार असली त्यासाठी आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक जारी करण्यात आली असून त्या अनुषंगाने कार्यालयाचे कामकाज आणि कार्यपध्दतीचा अवलंब करणे बंधनकारक करण्यात …

Read More »

तीन टप्प्यातील या सवलतींसह ३० जून पर्यत ५ वा लॉकडाऊन केंद्र सरकारकडून अध्यादेश जारी

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सलग लागू करण्यात आलेल्या ४ थ्या लॉकडाऊनची मुदत उद्या संपत असून त्यास आता थेट एक महिन्याचा ५ वा लॉकडाऊन लागू करण्यात येत असल्याची घोषणा केंद्र सरकारने आज संध्याकाळी एका अध्यादेशान्वये जारी केला. मात्र या ५ व्या लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती दिल्या आहेत. सवलती ८ जून पासून …

Read More »