राजकारण

सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱी आत्महत्या करतायत

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची राज्य सरकारवर टीका  जळगाव – चोपडा: प्रतिनिधी या सरकारच्या नाकर्तेपणा मुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचा आरोप विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी करत लोकांचे विकासाचे प्रश्न सोडवायला यांच्याकडे पैसा नाही. परंतु यांच्या घोषणा करण्याचं काम सुरुच आहे. गरीब गरीब होत चालला आहे आणि …

Read More »

अजोय मेहता राज्याचे नवे गृह सचिव ?

मुख्य सचिव जैन यांना तीन महिन्याची मुदतवाढ मिळणार मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विविध विभागांचे प्रधान सचिव असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या लवकरच बदल्या होणार असून अप्पर मुख्य सचिव सुनिल पोरवाल यांच्या निवृत्तीमुळे रिक्त झालेल्या जागेवर मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर राज्याचे मुख्य सचिव डि.के.जैन यांना …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाचा विजय संकल्प

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन मुंबईः प्रतिनिधी गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांमुळे आगामी लोकसभा निवडणुकीत देशाला पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मजबूत सरकार हवे आहे. भारतीय जनता पार्टीच्या स्पष्ट बहुमताने पुन्हा केंद्रात सरकार स्थापन करण्याचा विजय संकल्प करून भाजपाचे कार्यकर्ते कामाला लागल्याचे प्रतिपादन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी मुंबईत …

Read More »

मंत्रीमंडळ आहे की अली बाबा आणि ४० चोरांची टोळी?

गिरीष बापट यांची हकालपट्टी करण्याची काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणी मुंबईः प्रतिनिधी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी मंत्रीपदाचा गैरवापर करून नियमांची पायमल्ली करणा-या रेशन दुकानदारांना अभय देत आहेत. असा ठपका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ठेवला आहे. तरीही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अद्याप बापट यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी …

Read More »

वाढत्या महागाईमुळे पिशवीतून पैसे आणि खिशातून सामान आणावे लागेल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची सरकारवर उपरोधिक टीका जळगाव -चाळीसगावः प्रतिनिधी आज महागाई इतकी वाढतेय की पिशवीतून पैसे न्यावे लागतील आणि खिशातून सामान आणावे लागतील अशी उपरोधिक टीकामाजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी चाळीसगाव येथील जाहीर सभेत केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या दुसर्‍या टप्प्यातील …

Read More »

मुख्यमंत्री निवासस्थानी डान्सबारबाबत डिल झाली

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा सवाल मुंबई: प्रतिनिधी मुख्यमंत्री निवासस्थानी डान्सबारबाबत डिल झाली असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. दोन वर्षापूर्वी भाजपचा वरिष्ठ नेता आणि डान्सबार मालक यांच्यात बैठक झाली आणि शायना एनसी आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मध्यस्थी केली होती …

Read More »

भाजपने डान्सबार निवडणुकीकरिता किती निधी गोळा केला?

डान्स बार पुन्हा सुरु करणे हा सरकारचा कुटील डाव असल्याचा काँग्रेसचा आरोप मुंबई : प्रतिनिधी मागच्या दाराने डान्स बार पुन्हा सुरु करणे हा सरकारचा कुटील डाव आहे. सरकारने न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडली नाही असा घणाघाती आरोप करून डान्सबार निवडणुकीकरिता किती निधी गोळा केला? याचे स्पष्टीकरण भाजपने द्यावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश …

Read More »

दिव्यांगांसाठी विशेष क्रिडा संकूल उभारणार

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची घोषणा पुणे: प्रतिनिधी  राज्यातील दिव्यांगांसाठी विशेष क्रिडा संकुल उभारणार अशी घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे केली. पुणे येथील शिवछत्रपती क्रिडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी स्टेडियममध्ये आयोजित खेलो इंडिया या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा कार्यक्रमास त्यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत …

Read More »

अनुदानाच्या नावाखाली शेतकऱ्यांची चेष्टा लावलीय का ?

निर्धार परिवर्तन यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रवादी नेते अजित पवार यांचा सवाल नाशिक-दिंडोरी : प्रतिनिधी कांद्याला २०० रुपये देवून काय होतं… क्विंटलला २०० रूपये देता… काय चेष्टा लावलीय का… शेतकऱ्यांना झालेल्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम करु नका असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिंडोरी येथील जाहीर सभेत दिला. साडेचार …

Read More »

आदिवासी शेतकरी-शेतमजुरांचे ३६१ कोटींचे खावटी कर्ज माफ होणार

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय मुंबई : प्रतिनिधी आदिवासी अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजुरांना आदिवासी विकास महामंडळाकडून खावटी कर्जापोटी देण्यात आलेले २४४.६० कोटींचे कर्ज आणि त्यावरील ११६.५७ कोटींचे व्याज अशा एकूण ३६१ कोटी १७ लाख रुपयांची रक्कम माफ करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. २००९ ते २०१४ या कालावधीत कर्ज घेतलेल्या ११ लाख २५ हजार ९०७ शेतकरी-शेतमजुरांना …

Read More »