राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा सवाल मुंबई : प्रतिनिधी टोमॅटोला…कांदयाला भाव नाही…दुधाला अनुदान नाही…शेतकऱ्यांनी मग करावं काय ? निवडणूका जवळ आल्यावर महत्वाच्या मुद्दयांना बगल दिली जाते. तुम्हाला जमत नाही मग घोषणा करता कशाला असा संतप्त सवाल सरकारला राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार …
Read More »सातवा वेतन आयोग देतो, पण दोन वर्षे खर्च करायचा नाही
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टोक्ती मुंबई : प्रतिनिधी मागील काही वर्षांपासून राज्यातील शासकिय सेवेतील २० लाख ५० हजार कर्मचारी-अधिकाऱ्यांकडून सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार आज अखेर या सर्व कर्मचारी-अधिकाऱ्यांची मागणी मान्य करण्यात येत असल्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. पंरतु या वेतनाच्या फरकाची रक्कम बँकेच्या खात्यात …
Read More »पंतप्रधान मोदी, रिलायन्सच्या अनिल अंबानींची नार्को टेस्ट करा
ठाणे : प्रतिनिधी राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहारात डसॉल्ट कंपनी आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांशी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच चर्चा केलेली आहे. या चर्चेमध्ये परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, संरक्षण सचिव, हवाई दलाचे प्रमुख आदी कोणीही सहभागी झालेले नव्हते. या खरेदी व्यवहारात देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा झाला असून हा घोटाळा उघडकीस येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र …
Read More »युती करायची कि नाही हे जनता ठरवेल
पंढरपूर : प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या ५ राज्यांच्या निवडणूकांमध्ये तेथील जनतेने त्यांच्या घरात झालेली घाण साफ करण्यासाठी मतदान केल. तसेच मिझोरोम आणि तेलगंणा राज्यात प्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय पक्षाला धुळ चारली. त्यामुळे राज्यातही झालेली घाण साफ करण्यासाठी जनतेने मतदान करावे असे भाजपचे नाव न घेता आवाहन करत राज्यात युती करायची कि नाही …
Read More »पृथ्वीराज चव्हाणही भ्रमित, होय सर्वाधिक स्टार्ट अप महाराष्ट्रातच चव्हाण यांच्या आरोपांवर अर्थमंत्री मुनगंटीवारांचा पलटवार
मुंबई : प्रतिनिधी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा अन्य नेत्यांप्रमाणे विषय समजून न घेता, आपल्या सोयीची माहिती काढून पत्र परिषदा घेत सुटले आहेत. निवडणुकीच्या वर्षांत त्यांचा हा अट्टाहास असू शकतो. पण महाराष्ट्राची बदनामी निदान माजी मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीने तरी करू नये असा उपरोधिक टोला लगवात आजही सर्वाधिक स्टार्ट अप हे महाराष्ट्रातच …
Read More »दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणाऱ्या पथकाला विदर्भात न जाण्याचे आदेश राष्ट्र्वादी काँग्रेसचे शरद पवार यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्राच्या पथकाने फक्त मराठवाड्यात पाहणी केली. या चमूला विदर्भात जाऊ नका अशा सूचना राज्य सरकारने केल्या. त्यामुळे हे पथक विदर्भात पाहणी न करताच परतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी करत राज्याचं नेतृत्त्व विदर्भाकडे असल्याने त्यांच्याकडून शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही …
Read More »१५१ दुष्काळी तालुक्यातील पाणी पुरवठ्याची थकबाकी टंचाई निधीतून ऊर्जामंत्री बावनकुळे यांची माहिती
नागपूर : प्रतिनिधी राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या १५१ तालुके आणि २६८ महसूल मंडळातील ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनांच्या थकित वीज बिलाच्या मुद्दल रकमेपैकी ५ टक्के रक्कम शासनाने भरण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर या थकित बिलांवरील दंड-व्याज माफ करण्यात आले आहे. तसेच दुष्काळी तालुक्यांतील व महसूल मंडळातील नोव्हेंबर २०१८ पासून जून २०१९ पर्यंतचे …
Read More »कांदयाला दिलेले अनुदान शेतकऱ्यांची चेष्टा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या डोळयात सध्या कांदयाने पाणी आणले असून त्यांना दिलासा देण्याऐवजी तोकडे अनुदान देवून मदतीचा आव आणत सरकारने शेतकऱ्यांची चेष्टाच केली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी मिडियाशी बोलताना केला. गुरुवारी सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना २०० रूपये ट्रान्सपोर्ट अनुदान जाहीर केले. नाशिक जिल्ह्यात पिकणारा कांदा जिल्ह्याबाहेरही …
Read More »१८ फेब्रुवारीऐवजी आता २५ फेब्रवारीला लेखानुदान अधिवेशन राज्य सरकार करणार राज्यपालांना विनंती
मुंबई : प्रतिनिधी मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या दृष्टीने हिवाळी अधिवेशनात विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी १८ फेब्रुवारीला अर्थसंकल्पीय ऐवजी लेखानुदान अधिवेशन घेण्याचे जाहीर केले होते. मात्र आता सरकारने अधिवेशन १८ फेब्रुवारी ऐवजी २५ फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून तशी राज्यपालांना विनंती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. राजधानी दिल्लीतही …
Read More »दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रकुल संसदीय परिषद रदद् करा विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांची मागणी
मुंबई : प्रतिनिधी राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. दुष्काळाची ही तीव्रता कमी करण्यासाठी शासनाने अधिकाधिक निधी वितरीत करणे गरजेचे असताना राष्ट्रकुल संसदीय परिषदेवर करोडो रुपये खर्च करणे योग्य नाही, त्यामुळे ही परिषद रद्द करावी अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. सातवी राष्ट्रकुल संसदीय परिषद १५जानेवारी …
Read More »
Marathi e-Batmya