राजकारण

मंत्री जयंत पाटील ऑन ग्राऊंड झिरो… इस्लामपूरच्या 'त्या' परिसराचा घेतला आढावा

सांगली: प्रतिनिधी आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांच्या व्यवस्थेत कोणत्याही त्रुटी राहू नये हाच आमचा प्रयत्न आहे असे सांगत सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी कोरोना बाधित इस्लामपूर शहरातील गांधी चौक परिसरात ग्राउंड झिरोवर जाऊन पाहणी केली. इस्लामपूरात एकत्रच कोरोनाचे २५ रुग्ण आढळल्याने सांगलीचे पालकत्व स्वीकारलेल्या जयंत पाटील यांनी न डगमगता खंबीरपणे परिस्थिती हाताळण्यास …

Read More »

खुषखबर : राज्यातील घरगुती आणि उद्योगासाठीची वीज स्वस्त घरगुती वीज ५ ते ७ आणि उद्योग १० ते १२ टक्क्याने स्वस्त -राज्य नियामक आयोगाची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी कोरोना रोगाचा प्रादुर्भावामुळे दिवसेंदिवस आर्थिक परिस्थिती हाताबाहेर चालल्याने विद्यमान परिस्थीती आणि भविष्यकाळाच्या दृष्टीकोनातून राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य नियामक आयोगाने घेतला आहे. त्यानुसार पुढील पाच वर्षासाठी घरगुती वीज दरात ५ ते ७ टक्के आणि उद्योगासाठीच्या वीज दरात १० ते १२ टक्के वीज दर कपात केल्याची माहिती …

Read More »

पवार म्हणाले, आपल्याला अमेरिका, स्पेनच्या वाटेवर जायचे नाही समाजमाध्यमाद्वारे संवाद साधताना आवाहन

मुंबई: प्रतिनिधी पाश्चिमात्य देशात विशेषतः अमेरिका, स्पेन या देशांची सध्या भयावह उदाहरणे आहेत. त्या रस्त्याला आपल्याला जायचं नाही. आपल्याला मिळालेल्या सूचनांचे पालन करुया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी करत आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार असल्याने काटकसर करावी लागणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. दिवसेंदिवस राज्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची …

Read More »

चला आर्थिक हातभार लावू या कोरोना विरोधी लढ्याला मुख्यमंत्री सहाय्यता निधी -कोविड-19, पीएम केअरस् खात्यात जमा करू या निधी

मुंबई : प्रतिनिधी कोविड विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून या उपाययोजनांमध्ये अनेक स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वंयप्रेरणेने सहभागी होत आहेत, मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करत आहेत, करू इच्छित आहेत. केवळ याच प्रयोजनार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा …

Read More »

स्थलांतर थांबवा, राज्यपाल कोश्यारी यांचे आदेश राज्यपालांनी केली सर्व विभागीय आयुक्तांशी चर्चा

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत असताना दुसऱ्याबाजूला हातावर पोट असणाऱ्या कामगारांकडून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आपापल्या मुळ गावी जाण्यास सुरुवात केली. मात्र लॉकडाऊनमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने या कामगारांनी मिळेल त्या वाहनाने, पायी चालत आपले गाव गाठण्यास सुरुवात केली. परंतु अशा पायी जाणाऱ्यांच्या …

Read More »

अंडी, कोंबडी, मटण मासेविक्रीला परवानगी सुरक्षितता बाळगून आंबा, द्राक्षे, संत्री, केळी, कलिंगड फळविक्री करण्यास उपमुख्यमंत्री पवार यांची परवानगी

मुंबई : प्रतिनिधी जनतेच्या सोयीसाठी राज्यातील हॉटेलांना त्यांचे किचन सुरु ठेवून खाद्यपदार्थ घरपोच किंवा सोसायट्यांपर्यंत पोहचवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र खाद्यपदार्थ बनविणाऱ्या व पोहचवणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता आणि ‘कोरोना’ सुरक्षिततेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर राज्यात अंडी, कोंबडी, मटण, गोड्या व खाऱ्या पाण्यातील मासळीची विक्री खुली असून त्यावर कोणतेही बंधन …

Read More »

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी राहणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. आज वर्षा येथे कोरोना उपयाययोजनांच्या संदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली त्यात यावर चर्चा झाली.. लॉक डाऊन मुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या …

Read More »

फक्त मालवाहू ट्रक चालणार खाजगी संस्थांद्वारे ‘कम्युनिटी किचन’चा निर्णय - उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई: प्रतिनिधी ‘कोरोना‘च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन’मुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या ट्रकचालकांना इच्छितस्थळी पोहचण्यासाठी ट्रकवाहतूकीला परवानगी  देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील मालवाहू ट्रकवाहतूक पुन्हा सुरु होऊ शकेल. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केल्यानंतर रिकाम्या परतणाऱ्या वाहनांना पोलिसांकडून न अडविण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहमंत्री …

Read More »

जीवनावश्यक वस्तू घरपोच करण्यासाठी पालिका, स्वंयसेवी संस्थानी पुढे यावे डॉक्टर व पोलिसांवरील हल्ले करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा उपमुख्यमंत्र्यांचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. तसेच याकाळात अत्यावश्यक धान्य, औषधे, गँस यासह दैनदिंन जीवनात लागणाऱ्या गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिल्या. तरीही नागरीकांकडून रस्त्यांवर गर्दी करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजीपाला, धान्य, औषधे नागरीकांना घरपोच देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात महानगरपालिका, नगरपालिकांनी …

Read More »

आणि मृद व जलसंधारण मंत्री गडाखांनी परत केले पोलीस आणि वाहन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेसाठी निर्णय

अहमदनगर : प्रतिनिधी कोणत्याही एखाद्याला विशेषत: लोकप्रतिनिधीला समाजात आपली वट वाढविण्यासाठी कारण नसताना पोलिसांचा बंदोबस्त मागून घेत त्यात फिरायला आवढते. मात्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी मंत्री म्हणून आपल्या सुरक्षेसाठी असलेले पोलीस कर्मचारी व ते वापरत असलेले पोलीस वाहन कोरोना व्हायरस प्रार्दुभाव रोखण्यासाठी अहमदनगर पोलीस अधीक्षक यांना …

Read More »