राजकारण

मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, त्रिभाषा असताना द्विभाषा सुत्र स्विकारू शकत नाही आता पहिलीपासून हिंदी सक्तीची नाही पण अन्य भाषेचा पर्याय

राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत, महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्रानुसार पहिली ते पाचवीपर्यंत मराठी-इंग्रजीसह तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीचा करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. विद्यार्थी आता तिसरी भाषा म्हणून हिंदी व्यतिरिक्त इतर भारतीय भाषा निवडू शकतात. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले की, सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे अनिवार्य असेल. विभागाच्या …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, मराठी भाषा व संस्कृती संपवण्यासाठीच हिंदीची सक्ती भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा अजेंडा हाणून पाडू

महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा हट्ट आहे. हिंदी भाषा अथवा कोणत्याच भाषेला विरोध नाही पण मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे असे शिक्षणतज्ञही सांगतात पण भाजपाला मात्र हिंदी भाषेची सक्ती करून मराठी भाषा व संस्कृती संपवायची आहे. भाजपा व रा. स्व. संघाचा हा डाव असून त्याची अंमलबजवाणी मुख्यमंत्री …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री फडणवीस अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णयांना मंजूरी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्वाचे असे ९ ते १० निर्णय घेण्यात आले. यात आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांना मिळाणाऱ्या मानधनात दुपट्टीने वाढ केली आहे. तर आदिवासी इंडस्ट्रियल क्लस्टरसाठी जमिन, मेसर्स रायगड पेण ग्रोथ सेंटरला मुद्रांक शुल्कात सवलत, मुंबईतील राष्ट्रीय विधि विद्यापीठास जमीन हस्तांतरणासाठी मुद्रांक शुल्क माफ, मुंबईतील राष्ट्रीय विधि विद्यापीठास जमीन हस्तांतरणासाठी …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमलाही भाजपात प्रवेश का? शिवसेना उबाठाचे सुधाकर बडगुजर यांच्या भाजपाच्या प्रवेशावर केली टीका

भारतीय जनता पक्ष स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष समजतो पण शक्तीशाली असल्याचा आव आणणारा पक्ष मात्र कोणालाही पक्षात प्रवेश देत आहे. आतापर्यंत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपाने केले त्यांनाच सन्मानाने पक्ष प्रवेश देऊन मंत्रीपदही दिले. आता तर भाजपाने सर्व सोडून दिले आहे. ज्या व्यक्तीवर माफीया दाऊद इब्राहिमशी संबंध जोडला त्यालाच सन्मानाने …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, येत्या नवरात्र उत्सवात तुळजापूर विकास प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते होणार

श्री क्षेत्र तुळजापूर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर परिसराच्या विकास प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये करण्याचा मानस असून हा प्रकल्प पुढील तीन – साडेतीन वर्षात पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. असे प्रतिपादन परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्रॉ प्रताप सरनाईक …

Read More »

१५ जिल्ह्यात मानधन निवड समिती नसल्याने जेष्ठ कलावंतांची शेकडो प्रकरणं धुळ खात "मान ना सन्मान"मुळे समिती सदस्य विरुद्ध जिल्हाधिकारी यांच्यात वाद रंगला

“मान ना सन्मान ” या कारणाने  राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन निवड समिती सदस्य विरुद्ध जिल्हाधिकारी यांच्यात नवीन वाद सध्या  अनेक जिल्ह्यात जोरदार रंगलेला असताना, पंधरा जिल्ह्यात पालक मंत्र्यानी जिल्हा मानधन निवड समिती गठीत  केली नसल्याने,शेकडो मानधन मंजूरीची प्रकरणं जिल्हाधिकारी कार्यालयात धुळ खात पडली आहेत. यामुळे राज्यातील …

Read More »

पंकजा मुंडे यांची घोषणा, २२ जुलै देशी गोवंश जतन व संवर्धन दिन साजरा करणार देशी गोवंश संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी देशी गायींच्या संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, दरवर्षी २२ जुलै हा दिवस “शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन” म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. या निर्णयाचा अध्यादेश राज्य शासनाने निर्गमित केला आहे. यापूर्वीच देशी गायीस “राज्यमाता–गोमाता” म्हणून घोषित करण्यात आले असून, या पार्श्वभूमीवर हा …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची मागणी, अग्निवीर मुरली नाईक यांना शहीद सैनिकाचा दर्जा द्या अन्यथा उच्च न्यायालयात जाणार

लाईफ इन्फंट्रीमध्ये कार्यरत असलेले आणि रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर येथील रहिवासी असलेले अग्निवीर जवान मुरली नाईक यांना सेवेदरम्यान वीरगती प्राप्त झाली. मात्र, केंद्र व राज्य सरकारकडून त्यांच्या कुटुंबासाठी कोणतीही ठोस मदत अद्याप जाहीर झालेली नाही. ही बाब अत्यंत दुर्दैवी असून अन्यायकारक आहे. सरकारने मुरली नाईक यांच्या कुटुंबियांना एक कोटींची मदत …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, इंद्रायणी नदीवरील पूल प्रकरणी मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा दुर्घटना झाल्यावरच भाजपा युती सरकारला जाग, धोकादायक पुल खुला का ठेवला?

पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील पुल कोसळून झालेले मृत्यू हे सरकारच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहेत. कुंडमळा येथे पावसाळ्यात शेकडो पर्यटक येतात याची माहित असताना तो धोकादायक पुल खुला का ठेवला? असा प्रश्न विचारून हे सरकारने घेतलेले बळी आहेत, जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ …

Read More »

जयंत पाटील यांचा सवाल,…मग हजारो कोटी जातात कुठे ? मुंबईत रस्त्यांवर प्रचंड खड्डे आहेत, वाहतूक कोंडी होते, पाणी साचते, पिण्याच्या पाण्याची समस्या आहेच

मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवी झपाट्याने खाली येत आहेत. पैसे तर कमी होतोय पण शहरात नेमकी काय नवीन उभं राहतेय हा प्रश्न आहे. मुंबईत रस्त्यांवर प्रचंड खड्डे आहेत, वाहतूक कोंडी होते, पाणी साचते, पिण्याच्या पाण्याची समस्या आहेच. मग हजारो कोटी रुपये जातात कुठे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे …

Read More »