राष्ट्रवादी काँग्रेस (शदरचंद्र पवार) पक्षाचे परभणी जिल्ह्यातील तीन वेळचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. बाबाजानी दुर्राणी यांच्यासह परभणीतील माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, जिल्हा बँकेचे …
Read More »गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांचे निर्देश, कारवाया वाढवा अमली पदार्थ विरोधात कारवाया वाढविण्यात याव्यात
राज्यात अमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि खरेदीवर नियंत्रण आणण्यासाठी कारवाया वाढविण्यात याव्यात, अमली पदार्थ विरोधी कृती दलांच्या क्षेत्रीय कार्यालयासाठी जागा शोधणे, त्याठिकाणी कार्यालये सुरू करणे, पदभरती करणे आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी नियोजन पूर्वक कालबद्ध कार्यक्रम राबवावा, अशा सूचना गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिल्या. मंत्रालय येथे आयोजित बैठकीत राज्यमंत्री योगेश कदम बोलत होते. …
Read More »बेस्ट महाव्यवस्थापकांच्या मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांकडून नेमलेल्या दोन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा गोंधळ आशिष शर्मा यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाच्या अतिरिक्त कार्यभारावरून निर्माण झालेला गोंधळ बुधवारी दूर झाला. बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्याकडे सोपविण्याबाबतचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये जारी करण्यात आले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशान्वये आयएएस अधिकारी आशिष शर्मा यांच्या नियुक्तीचा आदेश …
Read More »दादाजी भुसे यांची घोषणा विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण बालमनापासून शिस्त लागावी यासाठी प्रशिक्षण देण्याचा मानस
राज्यातील विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शिस्त लागावी, त्यांच्यामध्ये देशाविषयी आदर निर्माण व्हावा, यासाठी एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्याचा मानस असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. यादृष्टीने त्यांनी एनसीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. मुलांना पहिलीपासून सैनिकी शिक्षण अथवा एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्याचा मानस मंत्री दादाजी भुसे यांनी जाहीर केला होता. त्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात झालेल्या …
Read More »संजय शिरसाट यांची माहिती, १२० वसतिगृह २५ हजार विद्यार्थ्यांना निवासी सुविधा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह व संत एकनाथ मागासवर्गीय वसतिगृहाचा उदघाट्न सोहळा संपन्न
सामाजिक न्याय विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाची वसतिगृहे उभारण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्यभरात एकूण १२० ठिकाणी वसतिगृहे उभारली जाणार असून, यामुळे सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांना निवासी सुविधा उपलब्ध होणार आहेत. वसतिगृहासाठी शासनाने १२०० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. सामाजिक न्याय व …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला, लोढा व अदानींच्या मुंबईतील इमारतीमध्येच आदर्श कबुतरखाना उभारा अधिका-यांच्या पोस्टिंगवरून सरकारमध्ये गँगवार, एकाच पदावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून दोन वेगवेगळ्या अधिका-यांची नियुक्ती
मुंबईच्या दादर येथील कबुतरखान्यावरून वाद सुरु असून यात राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा हिरीरीने भाग घेताना दिसत आहेत. मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबईत खूप मोठ्या प्रमाणात जमिनी व मोठ्या इमारतीही आहेत. तसेच सरकारने अदानीला मुंबईतील ३३ टक्के जमीन दिलेली आहे. लोढा व अदानी यांनी त्यांच्या जागेतच एक आदर्श कबूतरखाना उभारून करुणेचा नवा …
Read More »एकनाथ शिंदे यांची माहिती, महायुती म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार दीर्घकाळ गृहमंत्रीपदाचा विक्रम करणाऱ्या अमित शाह यांचे केलं अभिनंदन
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) भक्कम पाठिंबा आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दिल्ली दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांसह बुधवारी दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री एकनाथ …
Read More »जयंत पाटील यांचा सवाल, दावोसनंतरच्या १५ लाख ९८ हजार नोकऱ्या उपलब्ध होणार होत्या त्या कुठंयत ? ट्रिपल इंजिन सरकार नोकऱ्या देण्यात फेल
२०१५ पासून प्रधानमंत्री कौशल विकास योजना अंतर्गत, महाराष्ट्र प्रशिक्षण देण्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण नोकरी देण्यात ११व्या क्रमांकावर आहे. १३ लाख ३१ हजार लोकांना प्रशिक्षण दिले पण त्यातील फक्त ८० हजार लोकांना नोकरी देण्यात यश आले. म्हणजे १०% बेरोजगारांनाही हे सरकार नोकरी देऊ शकले नाही हे आपल्या राज्याचे दुर्दैव आहे …
Read More »विजय वडेट्टीवार यांची मागणी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात तर बॅलेटवर निवडणुका घ्याव्यात
हे सरकार जैन समाजाची फसवणूक करत आहे,महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वाद निर्माण केले जात आहेत राज्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट VVPAT मशीन नसणार अस राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी स्पष्ट केले. यासाठी कारण दिले जात आहे की एक प्रभागात जास्त उमेदवार असणार, मतदारांना एकावेळी चार मते द्यावी लागणार, त्यामुळे …
Read More »उत्तराखंडमध्ये अडकलेल्या भाविक, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुढाकार राज्य सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून, प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्रात सुखरूप आणणे हीच प्राथमिकता
उत्तराखंड राज्यात उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या ढगफुटीच्या घटनेमुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना राज्यात सुखरूप परत आणण्यासाठी राज्यसरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तराखंड राज्याचे सचिव (वित्त) दिलीप जवळकर,पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) निलेश भरणे यांच्याशी संपर्क साधून महाराष्ट्रातील पर्यटकांना तातडीने आवश्यक ती मदत …
Read More »
Marathi e-Batmya