राजकारण

मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, आर्थिक शिस्त पाळतानाच फ्लॅगशिप योजना बंद करणार नाही संतुलित अर्थसंकल्प मांडण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात अतिशय चांगला व संतुलित अर्थसंकल्प मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. आर्थिक शिस्त पाळताना भांडवली खर्चावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेत आहोत. हे करत असताना कोणतीही फ्लॅगशिप योजना बंद करणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापान कार्यक्रमानंतर …

Read More »

टीम जुनीच पण अजित पवार यांची खुर्ची…एकनाथ शिंदे यांचा टोला, तर अजित पवार म्हणाले…. अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाच्या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत संवाद

अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी शेतकरी विरोधी आणि विसंवादी सरकार अशी टीका करत बहिष्कार टाकला. चहापानाच्या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही आवर्जून उपस्थित राहिले. मात्र या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यातील …

Read More »

अंबादास दानवे यांचा आरोप, शेतकरी विरोधी, विसंवादी सरकार म्हणून चहापानावर बहिष्कार मंत्र्यांना पाठीशी घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधक आक्रमक

सरकार हे शेतकरी विरोधी असून तीन बाजूला तीन तोंड असणारे हे विसंवादी सरकार असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत जनतेला न्याय देण्याची भूमिका बजावत नसल्यामुळे आणि सत्ताधारी पक्ष सातत्याने विरोधी पक्षाला सापत्निकतेची वागणूक देत असल्यामुळे सरकारने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालत असल्याची भूमिका महाविकास आघाडीने घेतल्याचे विरोधी …

Read More »

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांचे सरकारला पत्र, केवळ चहापानाचा फार्स अंबादास दानवे यांचा खडा सवाल, विसंवाद आहे म्हणायचे आणि संवादही साधायचा नाही

अर्थसंकल्पिय अधिवेशनाला उद्या सोमवारपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांच्यावतीने विरोधी पक्षातील सर्वपक्षिय नेत्यांची बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीनंतर विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत प्रथेप्रमाणे दरवेळी प्रमाणे राज्य सरकारने यावेळी चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला. मात्र एकाबाजूला कायदेशीर तरतूदींचे पालन करायचे नाही दुसऱ्याबाजूला विरोधकांच्या सूचनांचा आदरही करायचा नाही मग …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, राज्यात जंगलराज, महिला- मुली सुरक्षित नाहीत… मुलींची छेड काढणा-यांच्या अटकेसाठी केंद्रीय मंत्र्यांना पोलीस स्टेशनात जावे लागते ही सरकारसाठी शरमेची बाब

राज्याच्या विविध भागातील महिला अत्याचारांच्या घटनांमुळे महाराष्ट्र आता महिला मुलींसाठी सुरक्षित राहिला नाही हे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलींची टवाळखोरांनी छेड काढली, त्यांच्या सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की केली. आरोपींना अटक होत नाही म्हणून खडसे यांना पोलीस स्टेशनला जाऊन ठिय्या द्यावा लागतो, हे महाराष्ट्रात जंगलराज आल्याचे निदर्शक आहे. राज्यातील …

Read More »

परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती, एसटी महामंडळात आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती स्वारगेट येथील बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीनंतर दिली माहिती

काही दिवसांपूर्वी पुणे येथील बंद अवस्थेतील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षिय युवतीवर बलात्कार करण्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे एसटी स्थानकातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. तसेच या घटनेनंतर एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत आढावा घेण्यात आला. यावेळी एसटी स्थानकातील सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार असून सुरक्षा रक्षकांची समिती स्थापन करून …

Read More »

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड, एकास अटक सहाजणांच्या टोळक्याकडून छेडछाड, पोलिसांमध्ये तक्रार दाखल

माजी मंत्री एकनाथ खडसे यांची नात तथा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची सहा जणांच्या टोळक्याने छेड काढत छळ करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्याची माहिती पुढे आली असून सहाजणांपैकी एकास अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर भागात एका जत्रेत …

Read More »

आरोपपत्र दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड बाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शिक्षा…. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिकी कराडच

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीने १५ हजार पानांचे आरोपपत्र बीडच्या न्यायालयात दाखल केले. या हत्या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात प्रमुख आरोपी वाल्मिक कराड यालाच आरोपी ठरविण्यात आले आहे. तसेच संतोष देशमुख यांची हत्या खंडणी प्रकरणात आडवे आल्याने केली असल्याची बाबही पुढे आली आहे. तसेच या प्रकरणी प्रमुख …

Read More »

अमित शाह यांचे आदेश, ८ मार्चपासून मणिपूरमधील रस्त्यांवर सर्वसामान्य परिस्थिती निर्माण करा मणिपूर येथील सुरक्षेचा आढावा बैठकीत प्रशासनाला दिले आदेश

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी मणिपूरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना ८ मार्चपासून मणिपूरमधील सर्व रस्त्यांवर लोकांची मुक्त हालचाल सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुढे आदेश दिले …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचा एकनाथ शिंदे यांना धक्काः या कामाला दिली स्थगिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळातील ३२०० कोटी रूपयांच्या कामाला दिली स्थगिती

माजी आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात पुण्यातील एका कंपनीवर मेहरबान होत ३२०० कोटींची कामे दिली होती. त्यास तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूरी दिली होती. आता या ३२०० कोटी रूपयांच्या निविदेच्या कामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याची चर्चा रंगली आहे. आरोग्य विभागाचा कारभार तानाजी …

Read More »