राजकारण

“विकसित भारत-जी राम जी” ही मनरेगाची सुधारणा नाही: राहुल गांधी

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मनरेगाचे नाव बदलून “विकसित भारत-जी राम जी” असे ठेवण्यावर आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले, “विकसित भारत-जी राम जी” ही मनरेगाची सुधारणा नाही. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचे हे विधान १८ डिसेंबर रोजी लोकसभेत व्यापक गदारोळात “विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान” विधेयक, “जी राम …

Read More »

दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास शासनाचे प्रोत्साहन

दिव्यांग अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या असून, अनुदानाच्या रकमेत वाढ करून योजना अधिक प्रभावी करण्यात आली असल्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितले. समाजात दिव्यांग व्यक्तींच्या विवाहाबाबत असलेले सामाजिक व सांस्कृतिक पूर्वग्रह त्यांच्या आयुष्यावर दीर्घकालीन परिणाम करणारे ठरतात. दिव्यांगत्वाकडे अनेकदा असमर्थता किंवा अधिकारहीनता म्हणून पाहिले …

Read More »

सचिन सावंत यांचा आरोप, मंगलप्रभात लोढा भाजपच्या शहरी अन्यायाच्या मॉडेलचे ‘ब्रँड अँबेसडर’ महानगरपालिकेतील बिल्डर–राजकारणी साटेलोट्याची सखोल चौकशी करून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा

मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचाराचे कुरण बनले असून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात नाही. बीएमसीतील भ्रष्ट अधिकारी, बिल्डर व सत्ताधारी नेत्यांचे रॅकेट आहे, हे रॅकेट मुंबईला लुटत आहे. सर्वसामान्य मुंबईकरांचे शोषण करून बिल्डरांच्या बेकायदेशीर हितसंबंधांना पाठीशी घालणारे लोढा यांच्यासारखे नेते भाजपाच्या शहरी अन्यायाच्या मॉडेलचे ‘ब्रँड अँबेसडर’ झाले आहेत. मुंबईत बिल्डरांचे नव्हे तर …

Read More »

नाना पटोले यांची खंत, प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण

प्रज्ञा सातव यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे राजीनामा दिला आणि भारतीय जनता पक्षाने त्यांना नेमके कोणते प्रलोभन दिले हे माहित नाही. मात्र भाजपा कडून सातत्याने दुसऱ्या पक्षातील लोकांना फोडण्यासाठी पैशांचे व पदांचे प्रलोभन दिले जाते, हे लपून राहिलेले नाही. भाजपाला सत्तेचा प्रचंड माज आला आहे. या पक्षाला लोकशाही मान्य नाही. अशा …

Read More »

काँग्रेस नेते स्व.राजीव सातव यांच्या पत्नी आ. प्रज्ञा सातव, दिलीप माने यांचा भाजपा मध्ये प्रवेश भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत

हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसच्या माजी आमदार प्रज्ञा सातव आणि सोलापूर दक्षिणचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह गुरुवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी आ. सचिन कल्याणशेट्टी, ज्येष्ठ नेते कृपाशंकर …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला शंभर दिवसांच्या प्रलंबित विषयांचा आढावा महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या योजनांना गती द्यावी

लोकहितांच्या योजनांसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना अधिकाधिक सुलभ आणि सहज सुविधा उपलब्ध होतील यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा प्रत्येक विभागामध्ये वापर करण्यात यावा. महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या योजनांना गती देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाचा विस्तार करतांना त्यामध्ये आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांचा समावेश करावा असे निर्देश …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, आरोग्य सेवेत ‘एआय’ तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करा आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढेल, उपचार अधिक अचूक व वेळेत

राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, वेगवान आणि लोकाभिमुख करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय -AI) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीत ‘समग्र’ संस्थेच्या वतीने सार्वजनिक आरोग्य सेवा बळकटीकरणाबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, मोदींनी जाहीर माफी मागावी महानगरपालिका निवडणुकीत आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर

नॅशनल हेराल्ड प्रकरणी न्यायालयाने दिलेला निर्णय भारतीय जनता पक्षाच्या खोटारडेपणाचा बुरखा फाडणारा आहे. केवळ सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांना बदनाम करण्यासाठी रचलेले एक कुंभाड असल्याचे आज उघड झाले. ईडी सारख्या सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून विरोधी पक्षांचा आवाज दडपण्याचा भाजपाचा अजेंडा आहे. न्यायालयाच्या निर्णयाने दूध का दूध पाणी का पाणी झाले …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, सत्ताधा-यांकडून ‘उडता महाराष्ट्र’ बनवण्याचे षडयंत्र ड्रग्स कारखानाप्रकरणी पकडलेल्या ४३ पैकी ४० बंगाली व बांग्लादेशी कामगारांना कोणाच्या दबावाखाली सोडले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं वाटोळं होत असल्याची नवनवी उदाहरणं सातत्याने समोर येत आहेत. शासकीय जमिनींच्या विक्रीच घोटाळे, टेंडरमधील कमिशन, समृद्धी शक्तीपीठ महामार्गातील भ्रष्टाचारातून कमावलेलं पैसा कमी पडू लागल्याने सत्ताधारी आपल्या जवळच्या लोकांमार्फत अंमली पदार्थांचे कारखाने काढून राज्यातील युवा पिढीला व्यसनी बनवत आहेत. नगरपालिका निवडणुकीत या ड्रग्सच्या माध्यमातून कमावलेल्या …

Read More »

राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांचे आवाहन, महा-देवा प्रोजेक्टसाठी फुटबॉल टीम तयार करा महाविद्यालयातील प्रत्येक खेळाडूची ‘भारत स्पोर्ट्स पोर्टल’ वर नोंदणी व्हावी

राज्यातील सर्व विद्यापीठांअंतर्गत महाविद्यालयांमध्ये प्रत्येक खेळाडूंची भारत स्पोर्ट्स पोर्टल वर नोंद करून महा-देवा प्रोजेक्टसाठी फुटबॉल टीम तयार करण्याचे निर्देश राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले. ‘लोकभवन’ येथे महा-देवा प्रोजेक्ट तसेच इतर खेळांच्या प्रगतीसंदर्भात राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला …

Read More »