खोटे नरेटिव्ह सेट करायचे, वर्तमान पत्रात, प्रसारमाध्यमांत बातम्या पेरायच्या आणि एखाद्या विषयाला तो खरा आहे अशा प्रकारे दाखवायचे हा विरोधी पक्षाचा अलीकडच्या काळातील धंदा बनला आहे. ही लोकं कसे खोटे नरेटिव्ह सेट करतात याचा पर्दाफाश मी उद्या सोमवारपासून करतोय, असा इशारा भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी दिला आहे. प्रसारमाध्यमांशी …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, भाजपा- काँग्रेसने ओबीसी आरक्षणाला… ओबीसींच्या नावाखाली १०० लोक जमत नाहीत
एससी, एसटी यांचे आरक्षण हे घटनात्मक आहे. ओबीसींच्या आरक्षणाला घटनात्मक दर्जा नाही. व्ही. पी. सिंग पंतप्रधान असताना त्यांनी काँग्रेस आणि भाजपा यांना विचारले होते की, ओबीसी आरक्षणाला घटनात्मक दर्जा देवू पण या दोन पक्षांनी भूमिका घेतली की, याला संविधानिक दर्जा द्यायचा नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश …
Read More »सुनिल तटकरे यांची माहिती,अजित पवार यांच्या जनसंवाद यात्रेची सुरुवात नाशिकमधूनच जनतेसाठी सुरू करण्यात आलेल्या योजनांचा प्रचार प्रसार करा
राज्यातील शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवक यांच्यासह विविध घटकांसाठी १ लाख कोटी रुपयांच्या योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रचार प्रसार करण्यात यावा. असे आवाहन करत अजितदादा पवार यांच्या जनसंवाद यात्रेची सुरुवात नाशिकमधून होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. अजित पवार यांच्या जनसंवाद यात्रेच्या …
Read More »महाराष्ट्राचे नवे राज्यपाल सी पी राधाकृष्णन तर हरिभाऊ बागडे राज्यस्थानचे राज्यपाल रमेश बैस पदमुक्त की ?
पंजाब मधील आम आदमी पार्टी सरकारशी संघर्षाची भूमिका घेण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने दोन वेळा चपराक लगावलेले राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी आपल्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बरीच महिने हे पंजाब राज्यपाल पद रिक्त राहिले होते. अखेर या रिक्त जागेसह केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार राज्यपाल पदावर आज राष्ट्रपती दौपदी मुर्मु यांनी नव्याने काही …
Read More »विधान परिषदेच्या नवनिर्वाचित ११ आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना दिली शपथ
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान पार पडले होते. या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सर्व सदस्यांना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी यावेळी शपथ दिली. यामध्ये पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, भावना गवळी, कृपाल तुमाने, योगेश टिळेकर, डॉ. प्रज्ञा सातव, शिवाजीराव गर्जे, अमित गोरखे, मिलिंद नार्वेकर, राजेश विटेकर या ११ …
Read More »आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांची मागणी, या प्रकल्पांना सहकार्य करा नाशिक पुणे रेल्वेमार्ग, ठाणे मेट्रो, मुंबई फनेल झोन संदर्भात केंद्राचे सहकार्य गरजेचे
आज झालेल्या निती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्रातील नाशिक पुणे रेल्वेमार्ग, चिपळुण कराड, ठाणे मेट्रो, मुंबई फनेल झोन, समुह विकास यासारख्या महत्वाच्या पायाभूत आणि विकास कामांच्या प्रकल्पांबाबत मुद्दे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडले. हे प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी केंद्र सरकारने सहकार्य करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. राष्ट्रपती भवनात झालेल्या …
Read More »अमित शाह यांच्याबद्दलच्या विधानाबद्दल शरद पवारांनी माफी मागावी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची मागणी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना न्यायालयाने तडीपार केले होते,अशी टिप्पण्णी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अलीकडेच केली होती. त्याबाबत बोलताना पियुष गोयल यांनी अमित शाह यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषमुक्त ठरवले होते, याकडे लक्ष वेधले. अमित शाह यांना गुंतविण्यासाठी षडयंत्र रचण्यात आले होते, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात स्पष्टपणे नमूद केले …
Read More »महिलांच्या प्रलंबित मागण्यांसाठी २९ जुलैला दिल्लीत महिला काँग्रेसचे आंदोलन महिला आरक्षण, महागाई व महिला सुरक्षेच्या मुद्द्यांवर आंदोलन
महिलांच्या ३३ टक्के आरक्षणाची अंमलबाजवणी, प्रचंड वाढलेली महागाई व महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे. महिलांचे हे तीन ज्वलंत प्रश्न घेऊन अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत २९ जुलै रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात देशभरातील महिला काँग्रेस कार्यकर्त्या मोठ्या संख्येने भाग घेणार …
Read More »पंतप्रधान मोदी यांची ग्वाही, राज्यांच्या एकत्रित प्रयत्नातून विकसित भारत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची पंतप्रधानासोबतच्या बैठकीला मात्र दांडी
केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर देशाची पुढील आर्थिक दिशा ठरविण्यासाठी निती आयोगाची बैठक आज बोलविण्यात आली होती. या बैठकीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला बहुतांश भाजपा शासित राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक उपस्थित होते. मात्र बिहारसाठी १५ हजार कोटी रूपयांचे विशेष …
Read More »प्रकाश आंबेडकर म्हणाले, वंचित शिवाय कुणीही आरक्षणावर भूमिका घ्यायला तयार नाही राजकीय पक्षांनी भूमिका घ्यायला पाहिजेत
वंचित बहुजन आघाडीशिवाय दुसरा कोणताही पक्ष आरक्षणाच्या प्रश्नावर राजकीय भूमिका घ्यायला तयार नसल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगली जिल्ह्यातील रांजणी येथील सभेला संबोधित करताना व्यक्त केले. प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, आरक्षणाच्या प्रश्नावरून लोकांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत. यावर एकच उपाय आहे तो …
Read More »
Marathi e-Batmya