राजकारण

टीआरएस नेत्या के कविता यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाचा जामीन ईडी आणि सीबीआयने लिकर पॉलिसी प्रकरणी केली होती अटक

नवी दिल्लीतील कथित लीकर पॉलीसी प्रकरणी तेलंगणा राष्ट्र समिती तथा टीआरएसच्या नेत्या के कविता अर्थात कलवकुंतला यांना ईडी आणि सीबीआयने अटक केली होती. या लीकर पॉलिसी घोटाळ्यातील के कविता यांच्या निमित्ताने पहिली अटक करण्यात आली. के कविता यांना अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, पुतळा पडल्याप्रकरणी अधिकाऱ्यांना दोषी ठरवणारे सरकार…. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राज्य व केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळतो ही अत्यंत लाजीरवाणी असून छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राचा अपमान करणारी घटना आहे. राज्य सरकारमधील मंत्री आता आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत आहेत आणि आमच्या दैवताचा अपमान कदापी …

Read More »

पाकिस्तानातील बैठकीला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार? राजनैतिक संबध आणि सुरक्षा आदींच्या प्रश्नावर खल सुरु

पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेला उपस्थित राहणार नसल्याच्या अलीकडील प्रसारमाध्यमांच्या बातम्यांना भारत सरकारने ठामपणे नकार दिला आहे. १५-१६ ऑक्टोबर २०२४ रोजी होणाऱ्या सरकार प्रमुखांच्या परिषदेसाठी (CHG) बैठकीसाठी पाकिस्तानने पंतप्रधान मोदी आणि इतर नेत्यांना निमंत्रण दिल्यानंतर ही अटकळ सुरू झाली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा निर्धार, महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही राज्यात मशाल आगामी विधानसभा निवडणुकीत पेटवायची

‘पुढील ५० वर्ष ठरवरणी ही निवडणुक आहे . महायुतीवाले शिवसेना व जनतेला घाबरले आहे. महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही, आणि या पैठणला मद्यपान केलेल्या लोकप्रतिनिधीवरील राग मतदानातून प्रकट करा असे आवाहन शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी करत महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात बिकट निवडणुक आगामी विधानसभा आहे. राज्यातीस आगामी विधानसभेत …

Read More »

कंगनाच्या बेताल शेतकरी विरोधी वक्तव्याचा तीव्र निषेध अखिल भारतीय किसान सभेचे अजित नवलेंकडून पत्रक

संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनामध्ये महिलांवर बलात्कार झाले. हे आंदोलन चीनने घडवून आणले होते व या आंदोलनाच्या आडून देशात बांग्लादेश घडवण्याचे षड्यंत्र होते अशा प्रकारचे अत्यंत बेताल वक्तव्य कंगना राणावतने केले. कंगणा राणावतच्या या वक्तव्याचा निषेध अखिल भारतीय किसान सभेचे पदाधिकारी कॉ अजित नवले यांनी …

Read More »

बदलापूरप्रकरणी दीपक केसरकर यांनी दिली माहिती, मुख्याध्यापिकेकडे तक्रार करूनही… मुलीच्या आजी आजोबांनी तक्रार करूनही पोलिसांशी संपर्क केला नाही

बदलापूर येथील आदर्श शाळेतील दोन चिमुरडींवरील अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राचे राजकिय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले. त्यातच या प्रकरणातील एक एक धागेधोरे आता पुढे येत असून या प्रकरणी मुख्याधिकेची भूमिका आणि १५ दिवसाचे फुटेज गायब असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकार …

Read More »

नाना पटोले यांची टीका,…निवृत्ती योजना सरकारी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी सरकारच्या आशिर्वादाने गुंडांची हिम्मत वाढली

महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडला आहे. असंवैधानिक शिंदे फडणवीस सरकारच्या काळात गुंडांना सरकारी आशिर्वाद मिळत असल्याने गुन्हेगारांची हिम्मत वाढली आहे. महिला घरात व घराबाहेरही सुरक्षित नाहीत तर शाळेत मुलीही सुरक्षित नाहीत. आता तर कायद्याचे रक्षक पोलीसही सुरक्षित राहिले नाहीत. मुंबईतील माहिम पोलीस कॉलनीत एकाचवेळी १३ पोलिसांच्या घरावर दरोडा पडला व …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, सरकारने महाराजांच्या पुतळ्यात पैसे खाल्ले टक्केवारीत अडकलेल्या महायुतीच्या भ्रष्ट कारभार पुन्हा चव्हाट्यावर

शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले आजही भक्कम आहेत. पण २०२३ मध्ये सिंधुदुर्गातील मालवण राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नेस्तनाबूत झाला आहे. या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात देखील पैसे खाल्ले यासारखे दुर्दैव नाही, अशा शब्दात विधानसभा …

Read More »

राज्यपालांचे आदेश, आदिवासी पाड्यांचे आदर्श गावांमध्ये रूपांतर करा राज्यात आदर्श आदिवासी गाव ही कल्पना देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण

आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचा विकास साधण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात. आदिवासी बांधवांच्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. आदिवासी बांधवांना पायाभूत सुविधा आणि उत्तम सेवा देवून आदिवासी पाड्यांचे आदर्श गावांमध्ये रुपांतर करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे,असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी …

Read More »

जयंत पाटील यांची टीका, शिवाजी महाराजांच नाव वापरायचं… सन्मानाबाबत घेणेदेणे नाही पुतळ्याचे अनावरण करायचे हेच सत्ताधाऱ्यांचे ध्येय

मालवण राजकोट किनारी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची बातमी अतिशय धक्कादायक आहे. यामुळे राज्यातील तमाम शिवप्रेमी दुखावले आहेत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवताना काळजी घेतली गेली नाही. …

Read More »