राजकारण

पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन केलेल्या शिवाजी महाराजांचा पुतळा ८ महिन्यातच कोसळला मालमणमधील सिंधुदूर्ग किल्याच्या किनारी वसविण्यात आलेला पुतळा

नौदल दिनाचे औचित्य साधत भारतीय नौदलाचे पहिले संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे मालवण येथील सिंधूदुर्ग किल्ल्याच्या समुद्र किनारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केले. तसेच त्यादिवशी नौदलाचे संचलनही झाले. या पुतळा अनावरणास आठ महिन्याचा कालावधी पूर्ण झाला नाही तोच हा पुतळा कोसळून पडल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र पुतळा …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसह घेतले हे महत्वाचे निर्णय गटप्रवर्तकाच्या मानधनातही केली वाढ

आज रविवारचा सुट्टीचा दिवस असूनही आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काही नव्या मतदार वर्गाला आकर्षित करण्याच्या उद्देशाने राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या वास्तविक २० ऑगस्टपर्यंत कराव्यात असे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला देण्यात आले होते. मात्र ह्या बदल्या ३० ऑगस्टपर्यंत करण्याचा निर्णय राज्य …

Read More »

श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या संरजाम जमिनींची सूट कायम राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

श्रीमंत उदयन महाराज प्रतापसिंह भोसले यांच्या संरजाम जमिनींना देण्यात आलेली सूट वंशपरंपरेने त्यांच्या वारसांना तहहयात सुरु ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचे राज्याच्या इतिहासातील अनन्य साधारण महत्त्व विचारात घेऊन व श्रीमंत भोसले कुटुंबियांची उपजिविका यांच्या दर्जानुसार व्हावी यासाठी …

Read More »

केंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना योजना लागू मात्र मार्च २०२४ पासून लागू होणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ही योजना मार्च २०२४ पासून अंमलात आणली जाईल. या निर्णयाचा राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीतील गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासनाने स्विकारावी हे समितीच्या …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा, अन्यथा श्रीलंका- बांग्लादेशसारखी स्थिती पोलिसांना सत्ताधा-यांच्या जवळच्या गुंड माफियांच्या सुरक्षेला, महिला मुलींची सुरक्षा कोण करणार?

राज्यातील महायुतीचे सरकार जनतेच्या मतदानाने नाही तर गुजरातच्या आशिर्वादाने आले आहे. या महाभ्रष्ट सरकारला मराठी माणसांपेक्षा गुजरातच्या भल्याची जास्त चिंता आहे. त्यामुळेच महाराष्ट्राला लुटून गुजरातचे भले करणे हाच एक कलमी कार्यक्रम सुरु आहे. राज्याची लूट थांबवून जनहिताची कामे करा अन्यथा तुमची अवस्था श्रीलंका, बांग्लादेशच्या सत्ताधा-यांप्रमाणे होईल असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …

Read More »

पेन्शन योजनेवरून मल्लिकार्जून खर्गे यांची टीका, यु म्हणजे मोदींचा युटर्न नव्या युपीएस अर्थात युनिफाईड पेन्शन योजनेवरून सोडले टीकास्त्र

केंद्र सरकारने काल सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवी युपीएस अर्थात युनिफाईड पेन्शन योजना जाहिर केली. या योजनेवरून काँग्रेसने टीकेची झोड उठविली. युपीएस मधील यु म्हणजे मोदी सरकारचा यु टर्न असल्याची टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केली. केंद्र सरकाच्या काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारच्या विविध विभागात काम करणाऱ्या सरकारी …

Read More »

संजय राऊत यांची टीका, मोडतो़ड तांब्या-पितळ सारखी आमची आघाडी नाही महाविकास आघाडीत जागा वाटपांवर ९९ टक्के सहमती

महाविकास आघाडीत जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली असून या जागा वाटपाबाबत ९९ टक्के सहमती झाली आहे.  मुंबईतील जागांबाबतही प्राथमिक स्तरावर कालच्या बैठकीत चर्चा झाली असून तसेच पुढेचा मुख्यमंत्री कोण असावा यावरूनही आमच्यात वाद नाही की जागा वाटपांबाबतही वाद नसल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली. बदलापूर येथील दोन चिमुरडींवर झालेल्या …

Read More »

पंतप्रधान मोदी यांची माहिती, … महिलांना आता ई-तक्रारही दाखल करता येणार लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीला फाशीची आणि जन्मठेपेची शिक्षा

मागील काही दिवसांपासून माझ्याकडे पत्र येत होती, महिलांवरील अत्याचाराच्या तक्रारी दाखल करून घेण्यात येत नाहीत, जर तक्रार लिहून घेतली तर न्यायालयात त्यावर जलद सुनावणी होत नाही. मात्र आता महिलांवरील अत्याचारा प्रकरणातील आरोपीच्या विरोधात पोलिस स्थानकात न जाता घरूनच पोलिस तक्रार दाखल करता येण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच …

Read More »

केंद्रीय मंत्रिमंडळाने विज्ञान धारा योजनेला दिली मंजूरी १० हजार ५७९ कोटी रूपयांचा निधीही मंजूर

केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘विज्ञान धारा’ योजना सुरू करून विज्ञान आणि तंत्रज्ञान निधीमध्ये मोठ्या फेरबदलाला मंजुरी दिली. हा नवीन उपक्रम विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षमता, संशोधन आणि नवकल्पना वाढविण्याच्या उद्देशाने तीन विद्यमान छत्री योजनांचे एका एकीकृत केंद्रीय क्षेत्रातील कार्यक्रमातंर्गत विलीनीकरण करण्यात येणार आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या योजनांचे एकाच योजनेत विलीनीकरण …

Read More »

राहुल गांधी यांचा हल्लाबोल, मिस इंडियात एकही दलित आदिवासी ओबीसी महिला नाही जणगणना करण्याची गरज

मिस इंडिया ब्युटीसाठी निवड झालेल्यांची यादी मी पहात होतो, पण त्या स्पर्धेत एकही दलित, आदिवासी किंवा ओबीसी समाजातील एकही महिलेची निवड करण्यात आली नव्हती असा हल्लाबोल काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी करत केंद्र सरकारवर हल्लाबोल चढवला. राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, मिस इंडियाची यादी तपासली की …

Read More »