गेल्यावर्षी देखील नागपूर येथील कंपनीत स्फोट होवून झालेल्या दुर्घटनेत निष्पाप कामगारांचा जीव गेला होता. डोंबिवली MIDC मधून दर आठवड्याला स्फोट होवून अपघात होण्याच्या बातम्या येत आहे. या घटना सतत घडत असताना सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. पुढे …
Read More »काँग्रेसची मागणी, नागपूरमधील चामुंडी कंपनीतील स्फोटाची सखोल चौकशी करा मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत द्या
नागपूर अमरावती रोडवरील धामणालिंगा परिसरातील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीत स्फोट होऊन ६ निरपराध कामगारांचा जीव गेल्याची घटना अत्यंत दुःखद आहे. दारुगोळा बनवणाऱ्या या कंपनीत झालेल्या स्फोटाची सखोल चौकशी करून मृतांच्या नातेवाईंकांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत दिली पाहिजे, तसेच जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च करुन प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत द्यावी, अशी …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा निर्धार; आम्ही परत येऊ, वंचित परत येईल भाजपा नागनाथ तर काँग्रेस सापनाथ
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत आघाडी न झाल्याने वंचित बहुजन आघाडीला स्वतंत्र निवडणूक लढवावी लागली. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या समर्थकांनी वंचित बहुजन आघाडी पक्ष भाजपाची बी टीम असल्याची टीका केली. यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एक्स ट्विटरच्या माध्यमातून आज संताप व्यक्त करत मी भाजपाची बी टीम आहे …
Read More »परराष्ट्र मंत्रालयाची स्पष्टोक्ती, लडाख आणि जम्मू काश्मीर भारताचा भाग चीन आणि पाकिस्तानच्या संयुक्त निवेदनावर भूमिका
भारताने गुरुवारी चीन आणि पाकिस्तानच्या ताज्या संयुक्त निवेदनात जम्मू आणि काश्मीरचे “अनावश्यक” संदर्भ नाकारले आणि केंद्रशासित प्रदेश आणि लडाख हा भारताचा अविभाज्य भाग “आहे, आहेत आणि नेहमीच राहतील” असे ठासून सांगितले. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ आणि चीनचे पंतप्रधान ली कियांग यांच्यात झालेल्या चर्चेनंतर ७ जून रोजी बीजिंगमध्ये संयुक्त निवेदन जारी करण्यात …
Read More »अजित पवार यांचे आदेश, सर्व पायाभूत विकासप्रकल्पांची कामे वेळेत गतीने मार्गी लावा राज्यातील विकासप्रकल्पांचा सविस्तर आढावा
राज्याचा दीर्घकालीन विकास डोळ्यासमोर ठेऊन विविध विभागांच्या मार्फत विकासकामे सुरु आहेत. नागरिकांच्या दृष्टिने महत्वाच्या असणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे. नागरिकांना विकासकामांचा प्रत्यक्ष लाभ होण्यासाठी राज्यात सुरु असलेली, प्रगतीत असलेली आणि प्रस्तावित विकासकामे नियोजनानुसार ठरलेल्या वेळेत गतीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात झालेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या …
Read More »नाना पटोले म्हणाले, जागावाटप मेरिटनुसार झाले तरच मविआचा फायदा नीट परीक्षेतील फक्त ग्रेस मार्क्स रद्द करुन चालणार नाही, परीक्षाच रदद् करून सीबीआय चौकशी करा
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असले तरी यापेक्षाही अधिक यश मिळू शकले असते. आता विधानसभा निवडणुकीत आघाडी म्हणून लढताना मेरीटनुसारच जागा वाटप झाले तर चांगला निकाल लागू शकतो. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणूनच विधानसभा निवडणूक लढवणार असून राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील संघटनात्मक बांधणीवर भर देणार असून राज्यातील भाजपाचे …
Read More »मनोज जरांगे पाटील यांची उपोषणाच्या आंदोलनाला एक महिन्यासाठी स्थगिती सगेसोयरेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची सरकारला एक महिना मुदत
मराठा आरक्षणप्रश्नी आणि सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याच्या प्रमुख मागणीसाठी पुन्हा एकदा राज्य सरकारच्या विरोधात मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण आंदोलनाचे हत्यार उपसले. परंतु मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चवथ्या दिवसापासून ढासळायला सुरुवात झाली. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना सलाईन लावण्यात आली. मात्र दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य …
Read More »महायुतीच्या नेत्यांच्या गैरहजेरीत सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज राज्यसभेसाठी सकाळी निर्णय लगेच दुपारी अर्ज दाखल
महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडूण जाणाऱ्या एका जागेकरीता अजित पवार यांच्या पत्नी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांच्याकडे पाहिलं जात असताना मात्र महायुतीचे तथा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांपैकी एकही नेता यावेळी उपस्थित …
Read More »शरद पवार यांचा थेट इशारा, मला सरकार बदलायचय, चार-सहा महिने थांबा इंदापूर आणि पुरंदरमध्ये शेतकऱ्यांशी बोलताना दिला इशारा
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत अपराजित म्हणून असलेल्या भाजपाला बहुमताच्या जवळपास फिरकू न देण्याचे आव्हान देशभरातील विरोधकांनी केले. इंडिया आघाडीने भाजपा आणि भाजपा प्रणित आघाडीला २९० जागांवर रोखले. तर काँग्रेसला ९९ जागांवर तर इंडिया आघाडीला २३५ जागांवर रोखले. तर त्यातच महाराष्ट्रात ४८ जागांपैकी भाजपा प्रणित महायुती सरकारला तर १७ जागांवर रोखत …
Read More »विधान परिषदेच्या निवडणूकीत शिवसेना उबाठा+ काँग्रेस विरूध्द भाजपा लढत शिंदे गटाच्या शिवसेनेचे दीपक सावंत यांच्यासह अनेकांची माघारः २६ जून रोजी मतदान
विधान परिषदेच्या चार जागेसाठी ८८ उमेदवारांनी दाखल केलेले अर्ज वैध ठरले. मात्र यातील शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अर्ज माघार घेतल्याने मुंबईतील ८ जण रिंगणात आहेत. तर कोकणात मनसे पाठोपाठ शिवसेना उबाठा गटाच्या किशोर जैन आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतली. तर …
Read More »
Marathi e-Batmya