राज्यातील विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशना निमित्त राज्य सरकारकडून राज्यातील जनतेसाठी खास राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत ग्रामीण भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेस, मुख्य प्रवाहापासून लांब असलेल्या आदिवासी समाजाच्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही निर्णय घेतले. या निर्णयाचा फायदा ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागात राहणाऱ्या नागरिकांनाही होणार आहे. राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आलेले …
Read More »मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीसांच्या मागे; जरांगेच्या आरोपाला राजकिय वास
राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस लांबत चालल्याचे दिसू लागल्याने मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरावली सराटे येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत मुंबईतील सागर बंगल्यावर येणार असल्याचा इशारा दिला. या आरोपावरून काँग्रेस, शिवसेना उबाठा गटाकडून सावध भूमिका व्यक्त केली. त्यानंतर अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार …
Read More »चहापानावर विरोधकांनी टाकलेल्या बहिष्काराची कारण मिमांसा वाचली का?
उद्या सोमवारपासून राज्यातील अर्थसंकल्पिय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने राज्याचा अर्थसंकल्प जरी सादर होणार असला तरी पुढील महिन्यात लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अर्थसंकल्पिय अधिवेशन फार दिवस चालविता येणार नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पिय अधिवेशनात फक्त अंतरिम अर्थसंकल्प सादर करून पावसाळी अधिवेशनात सविस्तर अर्थसंकल्प …
Read More »गुजरातमधील पहिल्या आणि सर्वाधिक लांबीच्या समुद्रावरील सुदर्शन सेतूचे उद्घाटन
गुजरातमधील अरबी समुद्रातील बेत द्वारका देवभूमी ते ओखा या मुख्य भूमिकेची जोडणाऱ्या सर्वाधिक लांबीच्या अर्थात २.३५ कि.मी. लांबीच्या समुद्री पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पार पडले. विशेष म्हणजे पुलाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समुद्रात बुडालेल्या द्वारकेच्या मंदिराजवळ जात दर्शन घेत काही मोर पिसेही ठेवल्याचा एक व्हिडिओ …
Read More »भाजपाच्या वक्तव्यावर संजय राऊत यांचा उपरोधिक टोला, आधी तुमचा पक्ष शिल्लक….
आगामी लोकसभा निवडणूकांचे वारे सध्या देशात जोरात वाहु लागले आहे. त्यातच भाजपाकडून ४०० पारचा नारा दिला आहे. यापार्श्वभूमीवर नुकतेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांना आवाहन करत जिल्हास्तरावरील छोटे पदाधिकारी- पक्षांना भाजपात सामावून घेत संपवून टाका. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आवाहनावर शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी उपरोधिक टोला …
Read More »मनोज जरांगे पाटील यांच्या खळबजनक आरोपावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
राज्यात आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पुढील महिन्यापासून निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच उद्या सोमवार २६ फेब्रुवारीपासून राज्याचे अंतरिम अर्थसंकल्पिय अधिवेशनही सुरु होणार आहे. त्यातच राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीवरून जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे आंदोलन करत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा …
Read More »विजय वडेट्टीवार म्हणाले, सरकारच्या चहापानाला जाऊन त्यांच्या पापाचे वाटेकरी…
सरकारच्या आशिर्वादाने राजकारणाचे गुन्हेगारीकरण सुरू आहे. मराठा समाजाची, शेतकऱ्यांची सरकारने घोर फसवणूक केली आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसली आहेत. घोटाळेबाजांचे, कंत्राटदारांचे सरकारने हित जोपासले आहे. गंभीर पाणी प्रश्नाकडे सरकारने जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी सामाजिक तेढ निर्माण केले आहे. सरकारच्या या नाकर्तेपणामुळे राज्याची प्रतिमा मलिन होत आहे. …
Read More »विजय वडेट्टीवार यांचे सूचक वक्तव्य, एखादा आंदोलक असे आरोप करत असेल तर…
अंतरावली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे आंदोलन सुरु केले. परंतु मागील दोन-तीन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे एकेकाळचे सहकारी अजय बावसकर यांनी जरांगे पाटील यांच्यापासून वेगळं होत मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यपध्दतीवरच आरोप करण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील …
Read More »मनोज जरांगे पाटील गंभीर आरोप करत म्हणाले, माझा बळी हवाय, मग सागर…
राज्यातील मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीनुसार राज्य सरकारने विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेत मराठा समाजाला स्वतंत्र ईडब्लूएस अर्थात अल्प उत्पन्न गटाखालील प्रवर्गात १० टक्के आरक्षण देण्याचा ठराव एकमताने पारित केला. तत्पूर्वी सगेसोयऱ्यांनाही आऱक्षणाचा लाभ देण्याविषयीचा स्वतंत्र दुरूस्तीची अधिसूचनाही पारित केली. त्यानंतरही अंतारावली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी …
Read More »नाना पटोले यांचा इशारा, १० वर्ष देशाला फसवणाऱ्या मोदी सरकारचे काऊंटडाऊन…
नरेंद्र मोदी यांच्या सरकारने १० वर्षात देशाचे नुकसान केले, मोदींनी दिलेली गॅरंटी ही खोटी ठरली आहे. दरवर्षी २ कोटी नोकऱ्या, १५ लाख रुपये, महागाई कमी करणार व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार यासारख्या अनेक गॅरंटी मोदींनी दिल्या पण त्यातील एकही पूर्ण केली नाही. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांना …
Read More »
Marathi e-Batmya