आता राज्यातील शिक्षण संस्थांना समूह विद्यापीठ स्थापण्याकरिता मार्गदर्शक तत्त्वांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे विद्यापीठांवरील भारही कमी होऊन शैक्षणिक संस्थांचे एक शक्तीशाली जाळे तयार होऊन विद्यार्थ्यांना अधिक संधी प्राप्त होतील. राज्यपाल हे कुलपती या नात्याने या समूह विद्यापीठांच्या कुलगुरुंची नियुक्ती करतील. …
Read More »छगन भुजबळ यांना पाडल्यास मराठ्यांचे १६० आमदार पाडू
मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापले असतानाच आता ओबीसी नेत्यांनीही पुढाकार घेत आंदोलनाला सुरुवात केली आहे . मराठा नेत्यांकडून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना टार्गेट करून निवडणुकीत पाडण्याचा ईशारा दिला गेल्याने आता भुजबळांच्या मदतीला ओबीसी नेतेही उतरले असून भुजबळांना पडल्यास राज्यात ६० टक्के लोकसंख्या असलेले ओबीसी, मराठ्यांचे १६० …
Read More »राज ठाकरे यांच्या शंकेवर मनोज जरांगे पाटील यांचे प्रतिआव्हान
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला २४ डिसेंबरची डेड लाईन देऊन महाराष्ट्राच्या तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला प्रारंभ केलेले मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत मनसे नेते राज ठाकरे यांनी शंका उपस्थित केली. मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही असे सांगतानाच जरांगे यांचा बोलावता धनी कोण असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. दरम्यान …
Read More »शरद पवार यांचा इशारा,….त्यांचा बंदोबस्त कसा करायचा हे मला चांगले माहितीय
मी इतकी वर्षे राजकारणात आहे. तसेच नेहमीच शेतकऱ्यांच्या आर्थिक हितासाठी राबत आलो आहे. कधी शेतकऱ्यांना फसवलं नाही. परंतु सध्या काही जणांकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजूर केलं जात. त्याच्या नावाचे पैसे भलत्याच्याच खात्यावर जमा होते आणि नंतर तिसराच कोणीतरी ते पैसे उचलतो. अशा गोष्टी कोणी नेताच करत असेल त्याची माहिती द्या …
Read More »उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, त्यांचा उमेदवार म्हणून प्रीट हिट द्यायची अन् आम्ही काय केल तर…
सध्या क्रिकेटचे दिवस आहेत. त्यामुळे त्याचे काही नियम असतात. तशी निवडणूक असली की त्याची आचारसंहिता असते. मात्र नुकतेच मध्य प्रदेशातील निवडणूक प्रचारा दरम्यान देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी धर्माच्या आणि अयोध्या वारीच्या नावावर मतं मागितल्याचे सर्वांनी पाह्यलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाने आपल्या नियमात बदल केला असेल तर …
Read More »सुप्रिया सुळे यांचा सवाल, हा आनंदाचा शिधा आहे की, गोरगरीब जनतेची क्रुर थट्टा…
देशासह महाराष्ट्रातील ऐन सणासुदीच्या काळात जीवनाश्वक वस्तुंच्या दरात होणारी वाढ या पार्श्वभूमीवर आणि भाजपाप्रणित एकनाथ शिंदे यांचे सरकार किती जनसामान्यांच्या प्रती सहानुभूतीदारक आहे हे दाखविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्यावर्षी दिवाळी- दसऱा सणासुदीच्या अनुषंगाने राज्यातील गोरगरीब जनतेसाठी १०० रूपयात सणासाठी लागणाऱ्या वस्तू देण्याची घोषणा केली. ती योजना पुढील सणासुदीच्या काळातही …
Read More »देवेंद्र फडणवीस यांची टीका, काँग्रेस नेते निवडणूक काळात मंदिरात, आणि संपली की…
निवडणूक आली की काँग्रेस नेते मंदिरात जातात आणि निवडणूक संपली की बँकॉकमध्ये जातात. हेच नेते राम आणि रामसेतू दोन्हीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत, अशी परखड टीका महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मध्य प्रदेशात केली. मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा आज थंडावल्या. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी सौंसर आणि …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, सर्वांच्या विचार आणि स्वप्नातील महाराष्ट्र घडवणार
आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व सर्व जाती-जमातींच्या विचारांचा आणि स्वप्नातला महाराष्ट्र घडविण्यासाठी शासन वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आदिवासी बांधवांचा गौरव वाढवतानाच त्यांच्या विकासासाठी जनजातीय गौरव दिवस व सांस्कृतिक महोत्सवसारख्या अभियानाच्या रुपाने आणखी एक पाऊल पुढे टाकले …
Read More »जयराम रमेश यांचा सवाल, मतदानासाठी पीएम किसानचा हप्ता रोखला होता का?
देशातील विविध राज्यांच्या विधानसभा निवडणूकीचे मतदान जवळ आले की, केंद्रातील मोदी सरकारकडून महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी जाहिर केलेल्या योजनांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा केले जातात. त्याच सरकारी योजनांच्या पैशातून जनतेची मतं खरेदीचा प्रयत्न भाजपाकडून केला जात असल्याची चर्चा दस्तुरखुद्द भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये सातत्याने ऐकायला मिळत होती. त्याच चर्चेच्या अनुषंगाने काँग्रेसचे नेते जयराम रमेश …
Read More »राज्यपाल रमेश बैस म्हणाले, आदीवासींनी संस्कृती टिकवली तर चांगला रोजगार मिळू शकतो
इंग्रजीच्या वाढत्या प्रभावामुळे लोक त्यांच्या बोली भाषेपासून दूर जात आहेत, आपल्या बोली भाषा नाहीशा झाल्या तर संस्कृती नष्ट होईल. म्हणून नवीन पिढीला मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषा शिकण्याबरोबरच आपल्या बोली भाषा समृद्धपणे जोपासण्याचे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. नंदुरबार येथे आज राज्यस्तरीय ‘जनजातीय गौरव दिवस व आदिवासी सांस्कृतिक …
Read More »
Marathi e-Batmya