‘शासन आपल्या दारी’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महालाभार्थी पोर्टलचा उपयोग करून घेण्यात येणार असून यामुळे या योजनेची व्याप्ती वाढणार आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे याबाबत आज एक सादरीकरण करण्यात आले. जास्तीत जास्त नागरिकांना सहज सुलभ लाभ मिळावेत म्हणून या पोर्टलचा देखील उपयोग व्हावा, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी केली. …
Read More »महाविकास आघाडीची वाटचाल विसर्जनाकडे भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका
सत्तेचा मलिदा चाखण्यासाठी एकत्र आलेल्या महाविकास आघाडीला सत्ता गेल्यामुळे घरघर लागली आहे. लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांआधी मोठा भाऊ कोण याचे दावे सुरु झाल्याने महाविकास आघाडीची वाटचाल विसर्जनाकडे सुरु झाली आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते …
Read More »सुप्रिया सुळे पहिल्यांदाच म्हणाल्या, मी वानखेडेंचा मुद्दा संसदेत मांडणार… एका बॉलीवूड स्टारच्या मुलाचे असे हाल तर सर्वसामान्यांचे काय
कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर समीर वानखेडे चर्चेत आले होते. याच प्रकरणात आर्यन खानला सोडण्यासाठी समीर वानखेडेंनी २५ कोटी रुपयांची खंडणी शाहरुख खानकडे मागितली होती असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्याच संदर्भात त्यांची सीबीआय चौकशी सुरु आहे. सीबीआय चौकशीचा आजचा दुसरा …
Read More »आशिष शेलार म्हणाले, …म्हणून उद्धव ठाकरेंना नाकारले…५० चा आकडाही पार नाही करू शकत राज ठाकरे यांनाही दिला इशारा
गेल्या २५ वर्षात मुंबईकरांनी उद्धवजींच्या नेतृत्वाला आणि त्यांच्या शिवसेनेला प्रत्येक निवडणुकीत नाकारले. कायम घरचा रस्ता दाखवला. आमच्या समर्थनामुळे तुमचे आकडे खाली जात असतानाही तुम्ही खुर्च्या उबवत होता कारण हिंदुत्वासाठी आम्ही तुम्हाला समर्थन देत होतो. आता परिस्थिती बदलली आहे. आज तुमच्यासमोर भाकीत करतो की, उद्धवजींची शिवसेना येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ५० …
Read More »डिएनए टेस्ट करावी लागेल, अजित पवारांच्या त्या वक्तव्यावर संजय राऊत यांचे प्रत्युत्तर भाजपा-भाजपा युतीतही हा प्रश्न आला होता
कर्नाटक राज्याचा निकाल लागण्याच्या काही दिवस आधी राज्यात महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभा होत होत्या. या सभेच्यावेळी मविआतील काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्याकडून जी भूमिका मांडली जायची नेमक्या त्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून भूमिका मांडली जात होती. त्यामुळे आघाडीत बिघाडीत निर्माण झाल्याचे चित्र निर्माण होण्यास सुरुवात झाली. मात्र कर्नाटक विधानसभेचा …
Read More »अजित पवार यांची स्पष्टोक्ती, हे गणित आहे, म्हणून आता आपण मोठा भाऊ… महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे वक्तव्य
कर्नाटक राज्याचा निकाल लागल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांना आणखी वर्षभराचा कालावधी शिल्लक राहिलेला असताना पुढील रणनीती ठरविण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. तसेच आगामी निवडणूकांची पूर्वतयारी म्हणून जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी समितीही स्थापन करण्यात आली. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीतील या गणितामुळे …
Read More »शरद पवार यांचा भाजपावर निशाणा, काही शक्ती जात-धर्मावरून लोकांमध्ये संघर्ष निर्माण… देशाला ५० वर्षे मागे नेण्याचा प्रयत्न करतायत
आज देशामध्ये चित्र बदलते आहे. आज काही शक्ती आहेत ज्या देशाला ५० वर्षे मागे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. जात-धर्म यावरुन सामान्य लोकांमध्ये संघर्ष निर्माण करण्याची खबरदारी घेत आहेत. आज ज्या राजकीय पक्षाच्या हातात देशाची सत्ता आहे ती सत्ता कष्टकरी लोकांसाठी, समाजातील लहान घटकांसाठी वापरायची समज या राजकर्त्यांना नाही आहे. जातीच्या …
Read More »अजित पवार म्हणाले, अंगाशी आले की लोक जाणीवपूर्वक गप्प बसतात… डॉ प्रदीप कुरूलकर यांच्या अटकेवरून भाजपावर साधला निशाणा
‘हनी ट्रॅप’ प्रकरणी आणि देशातील संवेदनशील माहिती पाकिस्तानी यंत्रणेला दिल्याप्रकरणी डीआरडीओचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना अटक करण्यात आली. डॉ कुरुलकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे; तसेच जलदगती न्यायालयात हा खटला चालवावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी कुरूलकर यांचे संबंध असल्याची …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, …सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई का होत नाही? कायदा सुव्यवस्थेसंदर्भात काँग्रेस शिष्टमंडळाने घेतली अतिरिक्त पोलीस महासंचालकांची भेट
महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य असून सामाजिक एकोपा राखण्यात महाराष्ट्राचा लौकिक आहे परंतु मागील काही महिन्यातील घटना पाहता राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम काही लोक करत असल्याचे दिसत आहे. दोन धर्मात तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न काही संस्था, संघटना करत आहेत. काही लोक भडकाऊ विधाने करुन वातावरण गढूळ करत …
Read More »मनिष सिसोदीयांची कवितेतून जनतेला साद तर मोदींवर टीकास्त्र,… तो चौथी पास राजा का,… समाज माध्यमातून भरलेच व्हायरल
दिल्लीच्या दारू धोरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी राजधानी दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया सध्या तुरुंगात आहेत. मनिष सिसोदिया यांनी तुरुंगातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेवर पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. एका चौथी पास राजाच्या राजमहलचा (राजमहाल) पाया हादरत आहे असा खोचक टोला त्यांनी एका कवितेतून लगावला आहे. …
Read More »
Marathi e-Batmya