राजकारण

अखेर या गोष्टीसाठी मुंडे भाऊ-बहिण आले एकत्र मुंडे भाऊ बहीण एकत्र आल्याने वैद्यनाथ साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध

बीड जिल्ह्यातील राजकारणात कट्टर विरोधक असलेल्या धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या भाऊ-बहिणीने जिल्ह्यातील राजकारणात प्रथमच एकत्र आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणुक जाहिर झाल्यानंतर पुन्हा बहिण-भावामध्ये कोण बाजी मारणार अशी चर्चा सुरु असतानाच अखेर ही निवडणूक बिनविरोध झाली. …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, पंढरीच्या आषाढी वारीसाठी टोल माफ रस्त्यांची दुरूस्ती, स्वच्छता-पाणी-आरोग्य सुविधांवर लक्ष द्या- मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करण्यात यावे. यंदा वारीसाठी अधिक गर्दी होऊ शकते. त्यामुळे वारकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी घ्या, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. वारीसाठी येणाऱ्या वाहनांना परतीच्या प्रवासासह टोल माफ करण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. पंढरीत दर्शनासाठी येणाऱ्या …

Read More »

नाना पटोले यांची टीका, … पण अहिल्यादेवींसारखा कारभारही करुन दाखवा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी कधीच द्वेषाचे राजकारण केले नाही

शिंदे-फडणवीस सरकारने अहमदनगरचे नामकरण अहिल्यादेवीनगर करण्याची घोषणा केली, त्याचे काँग्रेस पक्ष स्वागतच करत आहे. पण मुळात या सरकारकडे जनतेला सांगण्यासारखे काहीच नाही म्हणून शहरांची नावं बदलण्याचे काम सुरु आहे. शहराचे नाव तर बदलले पण राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी ज्या पद्धतीने समाजकार्य केले, सर्वधर्म समभावाला घेऊन पुढे गेल्या, त्या विचारांवर शिंदे-फडणवीस …

Read More »

पंकजा मुंडे यांच्या त्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,…. विपर्यास मी भाजपाची, पण भाजपा माझा नाही

पंकजा मुंडे, भाजपा माझ्या पाठीशी आहे असंच म्हणाल्या मात्र त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा खुलासा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना स्पष्ट केले. मी भाजपाची आहे, पण भाजपा थोडीच माझा आहे’, असे जाहीर वक्तव्य करून भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी आपला उद्ग्वेद व्यक्त केल्यानंतर सर्वत्र चर्चांना उधाण आले. त्यानंतर …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, गोसीखुर्द जलपर्यटन प्रकल्प २०२४ पर्यंत पूर्ण करा पर्यटनाला चालना देणाऱ्या विविध प्रकल्पांना शिखर समितीची मान्यता

राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत विविध पर्यटन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. राज्यात पर्यटनवाढीसाठी मोठा वाव असून प्रत्येक विभागातील पर्यटनस्थळांचा दर्जा वाढवितानाच पर्यटकांच्या सोयीसाठी त्याठिकाणी चांगले रस्ते, दळणवळणाची साधने, निवासाची दर्जेदार व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. सह्याद्री अतिथीगृह …

Read More »

जयंत पाटील यांचा विश्वास,… तर शेतकरी शेतात मोती पिकवतील कोविडच्या भयंकर परिस्थितीत निळवंडे धरणाचे काम एका निर्णायक टप्प्यावर आणून ठेवले याचे समाधान

कोविडची भयंकर परिस्थिती असताना देखील आम्ही न थांबता निळवंडे धरणाचे काम एका निर्णायक टप्प्यावर आणून ठेवले याचे आज समाधान वाटत आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली भावना व्यक्त केली. सोलापूरचे माजी आमदार दिलीपराव माने यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सोलापूर येथे आले …

Read More »

देशाची नवी संसद म्हणजे सोमालियाच्या जून्या संसदेची डिझाईनः काँग्रेस आणि तृणमुलचा आरोप २३० कोटी रूपयांना कॉपीकॅट

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला देशाच्या प्रमुख राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि उपराष्ट्रपती धनकड यांना पूर्णतः बाजूला सारल्यावरून देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठविली. तसेच पंडित जवाहरलाल नेहरू यांचा एक नवा इतिहास (?) ही भाजपाकडून पुढे करण्यात आला त्यावरही काँग्रेससह अनेकांनी टीकेची झोड उठविली. तरीही नव्या संसद …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, अहमदनगर जिल्ह्याचे नाव आता अहिल्यानगर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मागणी करताना मुख्यमंत्री शिंदे यांची तातडीने घोषणा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी उत्तम राज्य कारभाराचा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी भारताला प्रशासकीय संरचनेची मोठी देणगी दिली आहे. अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. त्यांच्या नावामुळे जिल्ह्याचा मान मोठा होणार असल्याचेही ते म्हणाले. चौंडी, ता.जामखेड येथे …

Read More »

जयंत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांच्या आदेशावर टोला, …फारच पोकळ आदेश शिंतोडे उडवण्याचे काम सातत्याने महाराष्ट्रात चालू आहे;त्याचा निषेध...

सरकारने संबंधित वेबसाईटवर कारवाईचे आदेश दिले असले तरी ते पोकळ वाटतात. त्यामुळे तो मजकूर तात्काळ काढून टाकण्यात यावा. आणि ज्यांनी हा मजकूर लावला त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा ही मागणी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली. गेले …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, कालव्यांच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही निळवंडेच्या कामाला गती देण्यात येईल- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

निळवंडे धरण लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा व ऐतिहासिक आहे. निळवंडे धरण कालव्यांच्या उर्वरित कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. हे शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. धरणामुळे विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांना मोबदल्यापासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. …

Read More »