केंद्रातील भाजपा सरकार असो वा राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार दोन्हीही शेतकरी विरोधी आहेत. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या मदतीची घोषणा विधानसभेत करुनही अजून शेतकऱ्यांना ती मिळालेली नाही. राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर शेतकरी महासन्मान निधीच्या नावाखाली तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांना आकर्षित करण्याचा डाव आहे परंतु शिंदे फडणवीस सरकारच्या या षडयंत्राला शेतकरी बळी पडणार …
Read More »विरोधकांच्या मागणीवर मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, मजकूर तपासून कारवाई करा कारवाई करण्याचे मुख्य सचिवांना निर्देश
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये त्यांच्याबद्दल अनेक आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या आहेत, याबद्दल अनेक राजकीय संघटना, सामाजिक संस्थांनी शासनाकडे आक्षेप नोंदवले. या आक्षेपांची …
Read More »भाजपाची प्रदेश महिला मोर्चाची कार्यकारणी जाहिरः यांना प्रदेश पदाधिकारी म्हणून संधी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मोर्चाच्या प्रदेश
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मोर्चाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. नवीन प्रदेश कार्यकारिणीत १२ उपाध्यक्ष ,८ सरचिटणीस, १४ चिटणीस आणि कोषाध्यक्ष यांचा समावेश आहे. उपाध्यक्षपदी प्रा. वर्षा भोसले, वैशाली चोपडे, गिता कोंडेवार, लता देशमुख, मंगल वाघ, आम्रपाली साळवे, रितू तावडे, शौमिका महाडिक, कांचन कूल, अॅड. …
Read More »संभाजी ब्रिगेड आणि ठाकरे गटात बिगडले? खा अरविंद सावंत यांनी दिली चर्चेची माहिती ऑगस्ट महिन्यात संभाजी ब्रिगेड आणि ठाकरे गटाची बैठक होणार
साधारणतः वर्षभरापूर्वी उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात शिवसेनेच्याच ४० आमदारांनी बंड पुकारत भाजपाशी सवता सुभा केला. त्यानंतरही शिवसेनेच्या ठाकरे गटासोबत संभाजी ब्रिगेडने युती करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर संभाजी बिग्रेड आणि उध्दव ठाकरे यांच्यात आज मंगळवारी ३० मे शिवसेना भवन येथे बैठक पार पडली. या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आल्याची …
Read More »मोदी सरकारच्या ९ व्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपाची ८० कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याची योजना भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची माहिती
मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे देशभर महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येणार असून या द्वारे ८० कोटी लोकांपर्यंत मोदी सरकारची कामगिरी पोहोचवली जाणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या अभियानात केंद्रीय मंत्री, भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय पदाधिकारी असे २२७ प्रमुख नेते लोकसभेच्या …
Read More »चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकरांचे निधनः काँग्रेससह या नेत्यांनी वाहिली श्रध्दांजली दिल्लीतील मेदांता रूग्णालयात उपचारा दरम्यान निधन
गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेले काँग्रेसचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांची प्राणज्योत मालवली आहे. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून एअर अॅम्ब्युलन्सद्वारे त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. मृत्यूसमयी बाळू धानोरकर यांचे वय ४७ वय होते. त्यांच्या पश्चात पत्नी वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर, दोन मुले, …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे मुंबईसह राज्यातील महापालिका व यंत्रणांना दिले ‘हे’ आदेश नालेसफाई ते उपकरणे, औषध साठा अशा विविध बाबींच्या तयारीचा मान्सून पूर्व आढावा
एकवेळ मालमत्तेचे नुकसान भरून काढता येते. पण जीवाचे नाही. त्यामुळे आगामी पावसाळ्यात आपत्तीमुळे जीवितहानी होऊ नये यासाठी दक्ष रहावे. शोध मोहीम -बचाव आणि सुटकेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. या काळात सर्व अधिकाऱ्यांनी २४ तास फोन सुरु ठेवावेत. आपत्तीवर मात करण्यासाठी जिल्हा-विभाग ते राज्यस्तरीय सर्व यंत्रणांतील अधिकाऱ्यांनी उत्तम संपर्क आणि समन्वय …
Read More »नाना पटोले म्हणाले,…मीच प्रदेशाध्यक्ष राहणार महाराष्ट्र सदनातून सावित्रिबाई व अहिल्यादेवींचे पुतळे हटवल्याचा प्रकार संतापजनक
महाराष्ट्रात सदनात सावरकर जयंती साजरी करताना राजमाता अहिल्याबाई होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे बाजूला करण्यात आले. समाजाच्या प्रेरणास्रोत असलेल्या या दोन महान व्यक्तींचा अपमान होणे ही संताप आणणारी घटना असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी जनतेची जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले …
Read More »जितेंद्र आव्हाड यांचा दावा,… तर मविआच्या २०० पेक्षा कमी जागा येणार नाहीत कर्नाटकचा फॉर्मुला महाराष्ट्रातही राबविणार
महाविकास आघाडी सरकार पाडून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. शिवसेनेत बंडखोरी झाल्याने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. परिणामी महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर, शिंदे- फडणवीस सरकारने बहुमत सिद्ध करून सत्तेच्या चाव्या आपल्या ताब्यात घेतल्या. त्यातच राज्यातील सत्ता हस्तगत केल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारकडून महाविकास आघाडीच्या आमदार-खासदारांसोबत सापत्नपणाची वागणूक द्यायला सुरुवात केली. …
Read More »ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिबल यांनी सांगितला, सेंगोल शब्दाचे दोन अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेंगोल प्रतिष्ठापनेवरून साधला निशाणा
नव्या संसद भवनाचं रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी तामीळनाडूच्या आदिनमकडून सेंगोल या राजदंडाचा स्विकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करत तो लोकसभेत विधीवत अध्यक्षांच्या आसनासमोर प्रतिष्ठापित करण्यात आला. या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना बोलवण्यात आलं नाही म्हणून काँग्रेससह १९ विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता. सत्ताधारी …
Read More »
Marathi e-Batmya