राजकारण

उध्दव ठाकरे यांनी ठणकावलं, जे मोदींनी धाडस केले नाही ते बिळातन बाहेर आलेले उंदीर करतायत भाजपाने आता त्यांचं हिंदूत्व स्पष्ट करावं

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेचा कोणताही संबंध नसल्याचा मोठा दावा केला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटलांच्या या भूमिकेवर शाब्दिक हल्ला चढवला. तसेच भाजपाचं हिंदुत्व नेमकं आहे तरी काय? असा सवाल केला. …

Read More »

संजय राऊत यांचा हल्लाबोल, पलायन करणारी; पळपुट्यांना घेऊन सरकार बनवणारी भाजपा… डॉ.मिधें आणि ४० आमदारांनी जाहिर करावं आम्ही गुलाम

बाबरी मस्जिद विध्वंस प्रकरणी श्रेय घेण्यापासून लांब पळणारी भाजपा आता त्याच श्रेयासाठी आक्रमक झाल्याचे दिसून येत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे शिवसेनेत पडलेली दुफळी यासाठी महत्वाची मानली जात असून भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा विद्यमान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबरीचा ढाचा पाडण्यासाठी शिवसेना किंवा शिवसेना प्रमुख बाळासाहेब …

Read More »

चंद्रकांत पाटील यांनी बाबरीप्रकरणी थेट उपस्थित केला स्व. बाळासाहेबांच्या सहभागावर प्रश्न बाबरीचा ढाचा शिवसेनेने नाही तर बजरंग दलाने पाडला

संबध देशात मंडल-कमंडलु राजकारणाचा परिणाम १९९२ च्या डिसेंबर महिन्यात बाबरी मशीदच्या विध्वंसात झाली. त्यानंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशालाच या घटनेचे परिणाम भोगावे लागले. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने २०१९ साली या प्रकरणी भाजपा आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांना निर्दोष सोडले. त्यानंतर बाबरीचा विध्वंसाचे श्रेयावरून त्यावेळचे भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केलेले वक्तव्य आणि तत्पूर्वी …

Read More »

राष्ट्रवादीसह या तीन पक्षांना प्रादेशिकतेचा दर्जा, तर आम आदमी राष्ट्रीय पक्ष केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय

केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह पश्चिम बंगालमधील ममता बँनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या पक्षांना असलेला राष्ट्रीय पक्ष …

Read More »

जयंत पाटील यांची टीका, शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीकडे सरकारचा सहानुभूतीचा दृष्टीकोन… पहिल्यांदाच देवाच्या दर्शनासाठी अख्खं सरकार जाते हा प्रकार पहिल्यांदाच दिसतो

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीकडे सरकारचा सहानुभूतीचा दृष्टीकोन दिसत नाही. अवकाळी पाऊस वेगवेगळ्या भागात पडत आहे. पंचनामे ताबडतोब करणे व तात्काळ मदत करणे अशी भूमिका राज्य सरकारची दिसत नाही याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आज राष्ट्रवादी भवन येथे बैठकीला …

Read More »

काँग्रेस प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत ‘हे’ ६ ठराव मंजूर करत व्यक्त केला निर्धार भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्याचा संकल्प: नाना पटोले

राहुल गांधी यांच्यावर भाजपा सरकारने राजकीय सुडबुद्धीने कारवाई केली हे सर्वश्रुत आहे. यामागचा घटनाक्रम पाहिला तर ते सर्व स्पष्ट होते. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचे भाजपाचे प्रयत्न सुरु होते पण जुनी खोटी केस उकरून कारवाई केली गेली. देशात लोकशाही व्यवस्था व संविधान राहिलेले नाही. काँग्रेसला जनतेचा पाठिंबा वाढत आहे, …

Read More »

संजय राऊत म्हणतात PM ची डिग्री दाखवा; तर शरद पवार म्हणाले, हे जास्त महत्वाचं आहे का ? बेकारी, महागाई, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न महत्वाचे

मागील काही दिवसांपासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री दाखविण्याच्या केलेल्या मागणीवरून गुजरात उच्च न्यायालयाने केजरीवाल यांना २५ हजार रूपयांचा दंड ठोठावला. त्यावरून देशात पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांच्या डिग्रीचा विषय चर्चेत आला असताना राज्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ती डिग्री बोगस असल्याचा आरोप …

Read More »

संजय राऊत यांची टीका, …शक्ती प्रदर्शनासाठी अयोध्येला जायची गरज नाही ते तर…. गद्दारांना रस्त्यात पकडून मारलं पाहिजे हा बाळासाहेबांचा विचार

राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्यावतीने पहिल्यांदाच अयोध्या दौरा करत तेथील रामाचे दर्शन घेत राम मंदिर उभारणीच्या कामाची पाहणी केली. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर चांगलाच निशाणा साधत अयोध्या दौऱ्यात रामाच्या दर्शनापेक्षा शक्ती प्रदर्शनाचा विषय जास्त होता अशी खोचक टीका करत आम्ही अनेकदा अयोध्येत जाऊन रामाचं दर्शन घेतलं. …

Read More »

अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांनंतर काढले उध्दव ठाकरे, फडणवीसांचे वाभाडे माईक दिसला की काय बोलायचे कळत नाही

मागील काही दिवसांपासून राज्यात विविध पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकावर टीका करताना भलतेच शब्द वापरण्यात येत आहे. तसेच राज्यात अवकाळी पावसामुळे आणि वाढत्या महागाई, बेरोजगारी आदी प्रश्नी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून कोणतेही निश्चित धोरण जाहिर करण्यात आलेले नसताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वैयक्तिक राजकिय श्रध्देच्या प्रश्नावरून अयोध्या दौऱ्यावर गेले. त्यावरून अजित पवार यांनी …

Read More »

त्या वक्तव्यावरून चंद्रकांत पाटील म्हणाले, नावाप्रमाणे शरद पवार खरेच पॉवरफुल नेते विरोधकांचे दात आणि नखे गळून पडतील

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्योगपती गौतमी अदानी यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अदानी उद्योग समूहाच्या कथित गैरकारभाची चौकशी करण्यासाठी जेपीसी अर्थात संयुक्त संसदीय समितीपेक्षा सर्वोच्च न्यायालयाची समिती अधिक उपयुक्त आणि प्रभावी ठरेल, असे वक्तव्य शरद पवारांनी मांडले होते. यावर राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील …

Read More »