काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत झालेल्या धम्मचक्र प्रवर्तक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला दिल्ली सरकारमधील आम आदमी पार्टीचे मंत्रीही हजर होते. या कार्यक्रमात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धम्म स्विकारताना २२ प्रतिज्ञांचे पालन करण्यासंबधी अट घालत त्याचे पठण करून घेतले होते, त्या प्रतिज्ञांचे पठण त्यावेळी करण्यात आले. त्यानंतर या कार्यक्रमाचा …
Read More »सचिन पायलट म्हणाले, पंतप्रधान मोदींनी कौतुक केल्यानंतर काय झालं ते सर्वांनी पाह्यलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाक्याचा संदर्भ देत केली टीका
राजस्थान विधानसभेच्या निवडणूका झाल्यापासून सचिन पायलट आणि अशोक गेहलोत गटामधील संदोपसंदी काही केल्या संपायला तयार नाही. मध्यंतरी तत्कालीन काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी या संदोपसुंदीवर मार्ग काढण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची ऑफर अशोक गेहलोत यांना दिली. मात्र अशोक गेहलोत यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद स्विकारण्याची तयारी दाखविली …
Read More »अतुल लोंढेंचा आरोप, फडणवीसांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न
वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी भारतीय जनता पक्षाकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे. हा प्रकल्प शिंदे फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणामुळेच गुजरातमध्ये गेला आहे. पण त्याचे खापर मात्र महाविकास आघाडी सरकारवर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. वेदांता व वेदांता-फॉक्सकॉन हे दोन वेगळे प्रकल्प आहेत पण फडणवीसांकडून याबाबत जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात …
Read More »सुषमा अंधारे यांचा गुलाबराव पाटील यांना टोला, मी जर तीन महिन्याचं बाळ तर…
मी जर तीन महिन्यांचं बाळ, तर बाळाला काहीही करायचा अधिकार आहे. गुलाबभाऊ मला तीन महिन्यांचे बाळ म्हणत असतील तर बाळ जसा सर्व खोड्या करतो, त्या करण्याचा मला सर्व अधिकार आहे, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना हाणला. महाप्रबोधन यात्रेतील फलक चोरण्यावर …
Read More »उदय सामंताच्या पत्रकार परिषदेसाठी एमआयडीसीची अशीही तत्परता? माहितीच्या अर्जावर काही तासात उत्तर
राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात आणि राज्यातील कोणत्याही शासकिय कार्यालयात माहिती अधिकार कायद्याखाली अर्ज केला तर किमान १५ ते ३० दिवसात कधी उत्तर मिळाल्याचा अनुभव कदाचीत विरळाच असेल. मात्र राज्याचे उद्योग मंत्री असलेल्या उदय सामंत यांना घ्यावयाच्या पत्रकार परिषदेसाठी तात्काळ माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने एमआयडीसी विभागाने माहिती अधिकारात तात्काळ माहिती …
Read More »अब्दुल सत्तारांचे आदित्य ठाकरेंना आव्हान, दोन अडीच वर्षे कशाला मी आताच राजीनामा देतो… त्यांच्याही आणि त्यांच्या वडीलांचा दौरा पाहिला...
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले आर्थिक नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेना आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांना गद्दार संबोधत आव्हान देत म्हणाले की, तुम्हीही राजीनामा द्या मी ही राजीनामा देतो एकदा होवूनच जाऊ द्या असे थेट आव्हान दिले होते. तसेच लोकांच्या दरबारातच निर्णय होईल असेही म्हणाले होते. त्यावर …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचे आदेशः शारीरिक शिक्षक, ग्रंथपाल पद भरती करा
उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत अनुदानित महाविद्यालयात शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहायक पदांचा आढावा घेऊन संबंधित पदे भरण्यासंदर्भातील कार्यवाही करावी. राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या प्रलंबित अनुदान दरात ६० टक्के वाढ करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण विभागातील रिक्त पदांचा तसेच वस्त्रोद्योग विभागातील …
Read More »बच्चू कडू म्हणाले, पहिली वेळ आहे म्हणून माफ करतो शरद पवारांवरही साधला निशाणा
मागील काही दिवसांपासून खोक्यावरून भाजपासमर्थक आमदार रवी राणा आणि शिंदे समर्थक प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांच्यात चांगलाच वाद निर्माण झाला होता. मात्र या वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केलेल्या टीकेवरून दिलगीरी व्यक्त केली. त्यानंतर आज बच्चू कडू …
Read More »सर्वोच्च न्यायालयः ठाकरे गट- शिंदे गटाशी संबधीत सुनावणीची तारीख ठरविणार
मागील चार महिन्यापासून राज्यातील सत्ता संघर्षावरील याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरु आहे. दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत पुढील तारीख निश्चित करण्यात येणार असल्याचे न्यायालयाने सांगत २९ नोव्हेंबरपर्यंत उध्दव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटांना आपले म्हणणे लिखित स्वरुपात सादर करण्याचे आदेश दिले. उध्दव ठाकरे यांच्या …
Read More »बेळगावात मराठी भाषिकांसाठी मार खाणाऱ्या मुख्यमंत्री शिंदेंना सीमावासियांचा विसर ठाकरे सरकार असताना अनेक योजना मात्र शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात सीमावासियांकडे पाठ
राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात त्यावेळचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकावित मविआ सरकारला उलथवून टाकले. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न झाले. त्यावेळी विधानसभेत बहुमत सिध्द करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या जून्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले की, …
Read More »
Marathi e-Batmya