ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी जातनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे पण केंद्र सरकार मात्र तशी जनगणना करत नाही. काही राज्य सरकारांनी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारनेही इतर राज्य सरकारप्रमाणे आपल्या राज्यातही जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज विधानसभेत केली. प्रसार माध्यमांना माहिती देताना नाना …
Read More »संजय राऊत यांचा टोला, काही दिवसांनी मुख्यमंत्री खाकी पँट आणि काळी टोपी… मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या रेशीमबाग भेटीवरून केली टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक अर्थात आरएसएसचे सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांना वंदन केलं. तसेच, आरएसएसचे दुसरे संघचालक माधवराव गोळवरकर यांच्या स्मृतींनाही मुख्यमंत्री शिंदेंनी अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार प्रसाद लाड उपस्थित होते. यानंतर एकनाथ शिंदे यांनी …
Read More »शेतकरी हैराण, सत्तार खातो गायरान महाराष्ट्राला धोका, मंत्र्यांना खोका...आजही महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक...
महाराष्ट्राला धोका, मंत्र्यांना खोका… खाऊन खाऊन ५० खोके, माजलेत बोके माजलेत बोके… शेतकरी हैराण, सत्तार खातो गायरान… कुणी उद्योग घ्या, कुणी सबसिडी घ्या तुम्ही खोके घ्या… अशा घोषणा देत आजही महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर उतरत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आज हिवाळी अधिवेशनाचा नववा दिवस असून गायरान जमीन …
Read More »अजित पवार यांचा आरोप, गायरान जमीनप्रकरणात सत्तारांनी एजंटामार्फत पैसे घेतले चौकशी होईपर्यंत मंत्री पदाचा राजीनामा घ्या
तत्कालीन महसूल राज्यमंत्री आणि विद्यमान कृषीमंत्री यांनी गायरान जमीन नियमबाह्य पद्धतीने वाटप केली असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असल्याने विद्यमान मंत्र्यांची सखोल चौकशी करा आणि चौकशी होईपर्यंत मंत्री पदाचा राजीनामा घ्या अशी जोरदार मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज स्थगन प्रस्तावाद्वारे केली. तसेच मंत्री सत्तार यांनी गायरान जमिन …
Read More »फडणवीसांनी सत्तारांना क्लिन चीट देत केली टीईटी घोटाळ्याची चौकशी जाहिर विधानसभेत भाजपा आमदार संजय कुटे यांच्या मागणीवर फडणवीसांचा निर्णय
विधानसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी दिलेला टीईटी घोटाळ्यावर चर्चा करण्याची मागणी स्थगन प्रस्तावाद्वारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली होती. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ती नाकारल्यावर विरोधी बाकावरील सदस्यांनी सभात्याग केला. मात्र याच मुद्यावरून भाजपाचे आमदार संजय कुटे यांनी प्रश्न उपस्थित केला. विशेष म्हणजे संजय कुटे यांना अध्यक्ष राहुल …
Read More »देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, अंमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी टास्क फोर्स विधानसभेत केली आमदारांच्या मागणीवर जाहिर केला निर्णय
अंमली पदार्थाची तस्करी रोखणे आणि युवा पिढीला यापासून दूर ठेवण्यासाठी राज्य शासनाने टास्क फोर्स तयार केला आहे. त्याबरोबरच अंमली पदार्थ विरोधी विभागाचं विकेंद्रीकरण करून त्याचे बळकटीकरण करण्याचा विचार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य सुनील प्रभू यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर …
Read More »भाजपा म्हणते, आमचा करेक्ट कार्यक्रम करण्याची हिंमत अजितदादांमध्ये नाही अजित पवार यांच्या आव्हानाला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रत्युत्तर
बारामतीच्या आपल्या एकाच दौऱ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांना इतकी भिती वाटली की, ते माझा करेक्ट कार्यक्रम करायला निघाले आहेत. पण आपला करेक्ट कार्यक्रम करण्याची हिंमत अजितदादांमध्ये नाही. त्यांनी नागपुरात येऊन अशी भाषा करू नये. आपण त्यांचे कोणतेही आव्हान स्वीकारण्यास तयार आहोत, अशा शब्दात भारतीय जनता …
Read More »विरोधकांनी सभात्याग केल्याचा फायदा उचलत नवा लोकायुक्त कायदा विधानसभेत मंजूर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले सभागृहाचे आभार
विधानसभेचे नियमित कामकाज सुरु झाल्यावर प्रश्नोत्तराचा तास आणि त्यानंतर लक्षवेधी सूचनांवर चर्चा सुरु होती. लक्षवेधीवरील टीईटी परिक्षेतील घोटाळ्याप्रकरणी चौकशी करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केले. या निर्णयाच्या विरोधात महाविकास आघाडीने सभात्याग केला. विरोधक बाहेर पडल्याचे दिसताच विधानसभा अध्यक्षांनी लोकायुक्त विधेयक मंजूरीसाठी आवाज दिला. विशेष म्हणजे सभागृहातील प्रथा पंरपरेनुसार विधेयक …
Read More »अजित पवारांच्या मागणीवर फडणवीस म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री शाहंना पत्राद्वारे कळविणार मुंबईवर दावा सांगणे खपवून घेणार नाही
विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन खाली विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्र सरकारने काल विधानसभेत कर्नाटक सरकारच्या विरोधात ठराव मंजूर केला. त्यानंतरही कर्नाटकचे विधि मंत्री मधुस्वामी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विरोधात वक्तव्य केले. तसेच मुंबईवर दावाही केल्याची माहिती सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. यावरून अजित पवार यांनी कर्नाटकला ताकीद देण्याची मागणी केली. …
Read More »अजित पवार म्हणाले, ताकीद द्या… कर्नाटकचे मुख्यमंत्री, आमदार, मंत्री सातत्याने महाराष्ट्राच्या भावना दुखावण्याचा व महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचे काम करत आहेत
कर्नाटकचे विधी मंत्री मधूस्वामी यांनी मुंबई केंद्रशासित करावी अशी मागणी त्यांच्या विधानसभेत केली आणि मुंबईत २० टक्के कन्नड लोक राहतात असा जावईशोधही लावला आहे. कर्नाटकचे विधानपरिषदेचे आमदार लक्ष्मण सौदी यांनी मुंबई तर कर्नाटकचीच आहे असा दावा करुन मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. महाराष्ट्रात कन्नड नाहीत का? असा …
Read More »
Marathi e-Batmya